✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 21/06/2019 वार - शुक्रवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*आंतरराष्ट्रीय योग दिन*
*उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.*
*दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस.*
💥 ठळक घडामोडी :-
• १९८९ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही वाचास्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
• १९९१ - पी.व्ही.नरसिंह राव भारताच्या पंतप्रधानपदी.
💥 जन्म :-
•१९२३ - सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक.
• १९८२ - विल्यम, इंग्लिश राजकुमार.
💥 मृत्यू :-
• १९२८ - नाथमाधव तथा द्वारकानाथ माधव पितळे, मराठी कादंबरीकार.
• १९४० - केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.
• १९५७ - योहानेस श्टार्क, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
• १९८४ - अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
*जि प शाळा बिरसी,गोंदिया*
📱 9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *महाराष्ट्रामधील सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक, त्यासाठी कठोर कायदा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली घोषणा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *कृषीविषयक सर्व योजनांचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागेल अशी सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जलधारा, 22-23 जूनला उर्वरित कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *नवी दिल्ली - मत्स्य उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर, पहिल्या क्रमांकावर येण्याची क्षमता आहे असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज नांदेडमध्ये राज्यस्तरीय योगशिबिराचे आयोजन, योगगुरू रामदेव बाबा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावली उपस्थिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *सरकारी सेवेत 30 वर्षांहून अधिक काळ असलेल्या कर्मचाऱ्यांचं पुनरावलोकन, शारीरिकदृष्टया अकार्यक्षम किंवा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *शिखर धवन, भुवनेश्वरकुमार नंतर भारताला तिसरा धक्का, विजय शंकरलाही झाली दुखापत, भारतीय संघात चिंतेचे वातावरण पसरले आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत...
*लघुकथा - वेळ नाही मला*
https://storymirror.com/read/story/marathi/xbrom5jq/vel-naahii-mlaa/detail
वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ कथालेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ : आळंदी*
वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्यानंतर १५४० मध्ये भव्य समाधी मंदिर बांधण्यात आले . ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या तपसामर्थ्याचा प्रभाव दाखविण्यासाठी वाघावरून आलेल्या चांगदेवाचे गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवून दाखविल्याची आख्यायिका आहे. ती भिंत येथे आहे. त्यांच्याशिवाय येथे विठ्ठल रखुमाई, राम, कृष्ण, मुक्ताई यांची मंदिरेही येथे आहेत. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. आषाढात येथून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते. आळंदी ते पंढरपूर हे अंतर दीडशे किलोमीटर आहे. पण भक्तीरसात चिंब भिजलेले वारकरी पावसापाण्याची तमा न बाळगता पायी हे अंतर पार पाडतात.
आषाढ महिन्यात संत ज्ञानेश्र्वरांची पालखी आळंदीहून पंढरपूरला जाते. त्यात असंख्य वारकरी सामील होतात. आळंदी ते पंढरपूर हे अंतर (सुमारे २०५ कि. मी.) भाविक विठू माउलीच्या नामाचा गजर करत, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत, चालत पार करतात. आळंदी येथे अजानवृक्षाखाली संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतली म्हणूनच या स्थानास संजीवन समाधी म्हटले जाते. कीर्तन-प्रवचन-वेदाभ्यास यासाठीचे महाविद्यालय येथे आहे. संस्कृत व अन्य धार्मिक ग्रंथांचा अभ्यास तेथे अविरत सुरू असतो.ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान, विठ्ठल-रखुमाईचे मंदिर, मुक्ताईचे मंदिर, सोन्याचा पिंपळ अशी अनेक स्थाने या तीर्थस्थानी भक्तिभावाने पाहण्यासारखी आहेत.
इंद्रायणी काठी , देवाची आळंदी
लागली समाधी , ज्ञानेशाची
ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव
नाचती वैष्णव , मागेपुढे
मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड कैवल्याचे
उजेडी राहिले उजेड होऊन
निवृत्ती , सोपान , मुक्ताबाई
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1) *भारतात लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?*
2 रा
2) *उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?*
21 जुन
3) *उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता ?*
22 डिसेंबर
4) *अमेरिका या देशाची राजधानी कोणती ?*
वाशिंग्टन
5) *गुजरात या राज्याची राजधानी कोणती ?*
गांधीनगर
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● धाराजी जोगदंड
● संजयकुमार मांजरमकर
● शुभम साखरे
● वीरभद्र बसापुरे
● आनंद जाधव
● राहुल पाटील
● हणमंत जगदंबे
● माधव धोंडापुरे
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मानवी जीवन हे सुखदु:खाच्या वाटेवरूनच पुढे जात असतं. जीवन पटाचं वस्त्र सुख दु:खाच्या धाग्यांनी तयार होत असतं. ते सुंदर जरतारी व्हावं, असं वाटणं स्वभावधर्मच आहे. दु:खाचा सल जाणवल्याशिवाय सुखाचं मोल कळत नाही. तरूणपणी स्वत:च्या सौंदर्याची जाण झाल्यामुळे आपण तारूण्याच्या धुंदीत सौंदर्याचा, सुखाचा आनंद उपभोगतो.*
*हे सुख शाश्वत नसतं. वय आपलं काम करतच असतं. जीवनाचं अखेरचं पर्व, वृद्धावस्था सुरू झाली की, या गोष्टीत आनंद मिळत नाही. आपल्या मायेच्या माणसांनी प्रेमाचं, आपुलकीचं वस्त्र आपल्या अंगावर घालावं असं वाटतं. अशा त-हेने बालपण, तरूणपण व वृद्धावस्था हे जीवनपटाचं तीन अंकी वस्त्र विणलं जातं. आपल्या वाटेला येणारं सुखदु:खाचं वस्त्र जरतारी मानून जीवन व्यतीत करणं हेच आपल्या हातात असतं.*
••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●••
☀☀☀☀☀☀☀☀☀
*संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल- 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
करनी बिन कथनी कथे,
अज्ञानी दिन रात ।
कूकर सम भूकत फिरे,
सुनी सुनाई बात ॥
कर्माविना कैसे वर्म
बरळा अज्ञान भ्रम
गल्लोगल्ली फिरे श्वान
तया भुंकण्याचे कर्म
अर्थ :
अज्ञानी व्यक्ती रात्रंदिवस कामाशिवाय बिन कामाचेच जास्त बरळत असतो. याच्याकडे स्वताःचा विचारही नसतो किवा तर्क लावण्याची कुवतही नसते. ऐकलेल्या , कुणीतरी सांगितलेल्या गोष्टी मग त्या अविवेकी असल्या तरी जशास तशा सांगत फिरतो. अफवांच्या कंड्या पसरवित फिरत असतो. अज्ञानामुळे बालिश वक्तव्ये करीत फिरत असतो. आपण सांगत असलेलंच बरोबर आहे. असा त्याचा भ्रम असतो. परंतु तो आपल्या विचार व वक्तव्याप्रती कधीच सारासार विचारही करीत नाही. जसा मोकाट कुत्रा सारखा या गल्लीतून त्या गल्लीत भुंकत फिरत असतो.
एकनाथ डुमणे, मुखेड
📱 9096714317
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात. परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते.
© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*अंतर्ज्ञान*
दोघं मित्र एका गणपतीच्या देवळात दर्शनासाठी आले होते. देवळाच्या गाभाऱ्यात एक आंधळा बसला होता. ते पाहून रमेश गोविंदाला म्हणाला, ‘ ‘ह्या बाजूला बसलेल्या त्या व्यक्तिला पाहिलसं का ? तो आंधळा आहे पण गावातील विद्वान पंडित आहे. ” रमेशचे म्हणणे गोविंदाला पटेना. शेवटी गोविंदा त्या आंधळ्याजवळ गेला. त्याला आपली ओळख सांगून गोविंदा त्याच्याशी गप्पा मारू लागला. गप्पा मारता मारता तो जन्मापासून आंधळा आहे हे गोविंदाच्या लक्षात आले. पण तो पंडित आहे यावर त्याचा विश्वास बसेना. म्हणून गोविंदाने त्याला विचारले, ‘ ‘या देवळाच्या गाभाऱ्यात आपण रोज कुणाचं चिंतन करता? आपल्या अभ्यासाचा नक्की विषय कोणता आहे?” यावर तो आंधळा म्हणाला, ‘ ‘मी खगोलशास्त्राचा अभ्यासक आहे. ” हे त्याचे उत्तर गोविंदाला पटेना. ‘ ‘तुम्हाला अजिबात दिसत नाही मग तुम्ही ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण कसं करता?” या त्याच्या संशयाने विचारलेल्या प्रश्नावर आंधळा स्वतःच्या छातीवर हात ठेवून म्हणाला, ‘ ‘अरे, ह्याच्या आतील सर्व ग्रह ताऱ्यांचे मी निरीक्षण आणि अभ्यास करत असतो. आता तरी कळलं का?”
तात्पर्य : बाह्य ज्ञानापेक्षा अंतर्ज्ञान जाणून घेण्यातच विद्वत्ता आहे.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें