✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 10/07/2019 वार - बुधवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
१८०० - कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना.
१९९२-आर्वी येथील 'विक्रम इनसट भू-केंद्र' राष्ट्राला अर्पण
२००० - नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार.
💥 जन्म :-
१९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री.
१९२३ - गुरूनाथ आबाजी कुलकर्णी, कथाकार.
१९४९ - सुनील गावसकर, विक्रमवीर, माजी कर्णधार
💥 मृत्यू :-
१९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक.
२००५ - जयवंत कुलकर्णी, मराठी पार्श्वगायक.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ * राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन बंद करण्यावर पुनर्विचार करण्यासाठी शासनाची समिती गठीत. 10 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *नोकरीत स्थानिक युवकांना 70 टक्के आरक्षण, देणार असल्याचं राज्याचे जनसंपर्क मंत्री पीसी शर्मा यांनी केलं स्पष्ट*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात देश उभारणीत संघाचे स्थान यावर विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रात धडे शिकविण्यात येणार आहे. त्यावरून उफाळला वाद*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात तीन टक्के वाढ, महागाई भत्ता नऊ टक्यावरून बारा टक्यावर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *खूशखबर! राज्यभरात म्हाडाच्या १४,६२१ घरांची लॉटरी लवकरच, मुंबईकरांच्या पदरी मात्र निराशा; गिरणी कामगारांसाठी ५ हजार ९० घरे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *आता खातेधारकाच्या परवानगीशिवाय त्याच्या बँक खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत!*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भुवनेश्वर-बुमराह यांनी किवींना रोखले, पण पावसाने सर्वांना लटकवले, उर्वरीत सामना आज खेळविणार : न्यूझीलंडच्या संथ वाटचालीत विलियम्सन व टेलर यांचे अर्धशतक*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत...
*लघुकथा - सायकल*
https://storymirror.com/read/story/marathi/3xqk1aq5/saaykl/detail
वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ कथालेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *केस का गळतात ?* 📙
दररोज थोड्या प्रमाणात केस गळणे नैसर्गिक आहे ; परंतु काही वेळेस अचानक केस गळावयास लागतात. आजारपणानंतर स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर असे केस गळायला लागतात. पुरुषांमध्ये प्रौढावस्थेत केस विरळ होत जाऊन टक्कल पडण्याचे प्रमाण जास्त असते. केस गळण्याची अनेक कारणे आहेत. लहान मुलांमध्ये कुपोषणामुळे केस गळतात. केसांच्या व केस ज्या त्वचेत असतात तेथील त्वचेच्या पोषणासाठी प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व अ, इ यांची आवश्यकता असते. लहान मुलात प्रथिनांच्या अभावामुळे प्रथम केसांचा रंग भुरकट होतो. कुपोषण होतच राहिल्यास असे केस थोडे ओढल्यास लगेच उपटले जातात. यात केसांची मुळे कमकुवत झाल्याने असे होते.
मोठ्या आजारांमध्ये आहार नीट घेतला जात नाही, तसेच रोगांच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जातात. यामुळे केसांचे पोषण होत नाही व आजारानंतर केस गळावयास लागतात.
त्वचेचे आजार झाल्यास असे जसे खूप कोंडा होणे, चाई लागणे, उवा होणे यामुळेही केस गळतात. केस विंचरताना खूप ओढाताण झाल्यासही केस गळतात.
यकृताच्या आजारांमध्ये गलगंड या आजारात केस गळतात. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकामुळे व अनुवंशिकतेमुळे टक्कल पडण्याचे प्रमाण स्त्रियांपेक्षा अधिक असते. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन हे संप्रेरक अधिक असल्याने व या संप्रेरकांवर केसांची वाढ अवलंबून असल्याने टक्कल पडण्याचे प्रमाण कमी असते.
जसे वय वाढते तसे चयापेक्षा अपचयाचे प्रमाण वाढत जाते. साहजिकच पेशींच्या निर्मितीपेक्षा नाशाची प्रक्रिया वाढते. केसांचे पोषणही कमी होते. ते लवकर गळतात व नवीन केस येण्याची प्रक्रिया मंदावते यामुळे प्रौढावस्थेनंतर केस विरळ होत जातात.
*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश मराठी - इंग्रजी सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*Haste makes waste*
( घाईने कामात चुका होतात. )
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1) *'राष्ट्रीय एकता दिन' केव्हा साजरा केला जातो ?*
31 ऑक्टोबर
2) *जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात आहे ?*
भारत
3) *महात्मा गांधी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?*
बापूजी
4) *'गुरुदेव' ही उपाधी कोणास दिलेली आहे ?*
रविंद्रनाथ टागोर
5) *'नेताजी' या नावाने कोणास ओळखले जाते ?*
सुभाषचंद्र बोस
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● महेश पांडुरंग लबडे
● मिलिंद चवरे
● नागनाथ वाढवणे
● डी बी जगताप
● लक्ष्मण मुंडकर
● प्रकाश एलमे
● संतोषकुमार यशवंतकर
● शिवाजी वासरे
● चरणसिंग चौहाण
● विठ्ठल रामलू चिंचलोड
● साईनाथ गायकवाड
● गणेश अंगरवार
● कृष्णा चिंचलोड
● बालाजी दुसेवार
● युवराज माने
● पिराजी चन्नावर
● प्रियंका घुमडे
● लक्ष्मीकांत पोलादे
● अभिजित वऱ्हाडे
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.*
*काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.*
*"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."*
संजय नलावडे, चांदीवली, मुंबई
9167937040
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
नागिन के तो दोये फन,
नारी के फन बीस
जाका डसा ना फिर जीये,
मरि है बिसबा बीस।
सारांश
महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील.
काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत.
वासनेच्या मागे नको धावू मना
पहा त्या रावणा काय झाले
चंद्रा पडली भगे इंद्र झाला काळा
नारद चुकला चाळा भजनाचा
अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते.
जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात
बुडती हे जण न देखवे डोळा ।
येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं.
एकनाथ डुमणे, मुखेड
📱 9096714317
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*सवयीचा परिणाम*
एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायलाप्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई.
अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्याच्याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्या बाहेर निघून गेला.
पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते. एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते.
पिंज-यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला.
तात्पर्य: जास्त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें