सोमवार, 5 अगस्त 2019

05 ऑगस्ट 2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
          ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 05/08/2019 वार - सोमवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                    *नागपंचमी*
         
💥 ठळक घडामोडी :-
१९१४ - जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा  अमेरिकेच्या  क्लीव्हलँड  शहरात सुरू झाला
१९८१ - अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनने संपावर असलेल्या ११,३८१ हवाई वाहतूक नियंत्रकांना नोकरीतून काढून टाकले

💥 जन्म :-
१८९० - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
१९६९ - वेंकटेश प्रसाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.

💥 मृत्यू :-
८८२ - लुई तिसरा, फ्रांसचा राजा

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *प्रधानमंत्री आवास योजनेची ४ लाख २१ हजार घरे पूर्ण, राज्य सरकारची माहिती; १० लाख ५१ हजार ९० जणांनी केली होती नोंदणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत; श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू, जम्मू-काश्मीरमध्ये वेगवान हालचाली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *दोन लाख नोकऱ्यांवर गदा; वाहन क्षेत्रात दोन दशकांतील सर्वात मोठी मंदी, प्रवासी वाहनांच्या विक्रीत आठ महिन्यांत मोठी घसरण*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *कोल्हा'पूर' ! कोयना, राधानगरी, अलमट्टीमधून विसर्ग सुरू; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, कोल्हापूर जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता लागू होणार सातवा वेतन आयोग*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *सरकारी रुग्णालयांतील कर्मचारी १९ ऑगस्ट रोजी खासगीकरण विरोधात राज्यव्यापी संपावर जाण्याचा इशारा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *India vs West Indies: भारताचा वेस्ट इंडिजवर २२ धावांनी विजय; मालिकाही खिशात, तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-० अशी आघाडी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *सुरक्षित प्रवास करू या*
     
 आजकाल प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. प्रवासाला निघलेला व्यक्ती सुखरूप घरी परत आल्यावर घरातले सर्व सदस्याचे जीव भांड्यात पडल्यासारखे होते. हायवेचे रस्ते तर जणू अपघाताचे माहेरघरच बनले आहेत. दररोज किती तरी अपघात होतात आणि कित्येक लोकांचे जीव जातात याची काही गिनती नसते. इकडे छोट्या रस्त्यावर सुध्दा अपघात.........

https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_26.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  📙 *खडकाचं वय कसं मोजतात ?* 📙
     
जगातली सजीवसृष्टी कार्बनच्या मेरूदंडावर उभी राहिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक सजीवाच्या प्रत्येक अवयवात कार्बनची रसायनं उपस्थित असतात. याचाच आधार घेऊन विलार्ड लिबी यांनी सजीवांच्या पुरातन अवशेषांचं वय शोधण्याची एक प्रक्रिया विकसित केली. त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कारही प्राप्त झाला.
हवेतला कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेतून वनस्पती कार्बोदकं तयार करतात. प्रत्येक सजीवांच्या अन्नसाखळीची सुरुवात तिथूनच होते. हवेत कार्बनची दोन रूपं उपस्थित असतात. एक स्थिर आणि बहुसंख्य असलेलं बारा अणुभाराचं समस्थानिक आणि दुसरं अस्थिर व किरणोत्सर्गी असलेलं चौदा अणुभाराचं समस्थानिक. या दोन्हींच्या वस्तुमानात फरक असल्यामुळे त्यांची वेगवेगळी ओळख पटवणं सोपं जातं; पण त्यात दोन्हींचेही रासायनिक गुणधर्म सारखेच असल्याने हवेतून कार्बन डायऑक्साइड शोषून घेताना वनस्पती त्यांच्यात भेदभाव करत नाहीत. त्यामुळे हवेत या दोन रुपांचं आपापसात जे गुणोत्तर असतं तेच जिवंत वनस्पतींमध्येही दिसून येतं. कारण किरणोत्सर्गामुळे जरी त्यातल्या चौदा अणुभाराच्या रूपाचा थोडासा र्‍हास होत असला तरी सतत हवेतून त्याची भरपाई होत असल्यामुळे जोवर ती वनस्पती जिवंत आहे तोवर त्यांच्या अंगचं या दोन रूपांचं आपापसातलं गुणोत्तर हवेतल्या त्यांच्या गुणोत्तराइतकंच राहतं.
ती वनस्पती मृत पावली की परिस्थिती बदलते. आता हवेतून नव्यानं कार्बनडायऑक्साइड अंगात शिरत नसल्याने त्यातल्या १४ अणुभाराच्या रूपाच्या र्‍हासाची भरपाई होत नाही. ज्या वेगानं तो क्षय होतो त्याच वेगानं त्यांचं गुणोत्तरही बदलत जातं. किरणोत्सर्गी रूपाचा र्‍हास त्याच्या अर्धायनात मोजला जातो. जेवढ्या काळात मूळ राशीतला पन्नास टक्के भागाचा र्‍हास होतो त्या कालावधीला त्या रूपाचं अर्धायन असं म्हणतात. चौदा अणुभाराच्या कार्बनचं अर्धायन ५७६० वर्ष आहे. म्हणजेच तेवढा कालावधी उलटला की त्या वनस्पतीच्या अवशेषातील बारा अणुभाराच्या रूपाची मात्रा तेवढीच राहते; पण चौदा अणुभाराच्या रूपाची मात्रा निम्मी होते. म्हणजेच गुणोत्तर दुपटीनं वाढतं. तसं झाल्यास त्या अवशेषाचं वय ५७६० वर्षे आहे, असं निदान करता येतं. या पद्धतीलाच रेडिओकार्बन डेटिंग असे म्हणतात.
सर्वच पुरातन अवशेषांमध्ये कार्बन असतोच असं नाही. उदारणार्थ, खडकांसारख्या असेंद्रिय निर्जीव पदार्थांमध्ये कार्बन नसतो. शिवाय किरणोत्सारी कार्बनचं अर्धायन तेवढंसं जास्त नसल्यामुळे त्याच्या दसपटीने म्हणजेच साधारण ५० हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांच्या वयाचं निदान अचूकपणे करता येतं. त्याहून पुरातन असलेल्या पदार्थांबाबतच्या निदानात संदेह निर्माण होतो.
एक स्थिर आणि एक किरणोत्सारी अशा दोन मूलद्रव्यांच्या जोड्या मिळाल्या तर हीच पद्धत अवलंबली जाऊ शकते. अशा अनेक जोड्या आता शोधून काढल्या गेल्या आहेत. युरेनियमची खनिजं खडकांमध्ये असतात. त्याच्या क्षयमालिकेत अशा जोड्या सापडतात. त्यांचा आधार घेऊन खडकांचं वय मोजण्याची रेडिओमेट्रिक डेटिंग पद्धत विकसित केली गेली आहे. तिची मदत घेऊन कोणत्याही खडकाचं वय किती हे आता अचूकपणे सांगता येणं शक्य झालं आहे.

- *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून*     

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*आजची प्रश्नमंजुषा*

1)  *उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?*
      तामिळनाडू

2)  *शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते ?*
     राजमाता जिजाऊ

3)  *भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?*
      श्रीमती इंदिरा गांधी

4)  *'जागतिक महिला दिन' केव्हा पाळला जातो ?*
      08 मार्च

5)  *भारतात डमडम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?*
      कलकत्ता

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  श्रीराम पा. जगदंबे
●  सय्यद जाफर
●  दत्तात्रय सितावार
●  किरण सोनकांबळे
●  साईनाथ जायेवाड
●  देवराव कोलावाड
●  मनोज मानधनी
●  सचिन वसरणीकर
●  शेख वाजीद
●  विकास कांबळे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*आपण जे बोलायला हवे ते बोलत नाही. जे बोलू नये ते बोलून जातो. जे पोटी असते ते ओठी येते असे म्हणतात. काही वेळा पोटी काही नसताना भलतेच ओठी येते. अनवधानाचे ते बोलणे सावरण्यासाठी मग खूपच बोलणे सोसावे लागते. काही लोक खूपच बडबडतात. काहींचे मौन बोलके असते. शांतपणे अविरत श्रमाची कास धरणा-यांचे यशच खूप काही बोलून जाते. नाहीतर बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असणा-यांची संख्या बरीच आहे. न्यायालयातील उलटतपासात साक्षीदाराने काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये याला खूप महत्व आहे.*

*रामदासांनी शिवरायांचे मोठेपण सांगताना 'शिवरायांचे कैसे बोलणे' असा शब्दप्रयोग करून, त्यांच्या पदपथावर चालण्यास सांगितले. संतांच्या बोलण्याला अनुभूतीचा आधार असतो. महापुरूषांच्या बोलण्याला त्यांच्या जीवनकार्याची धार असते. चर्चिलच्या प्रभावी बोलण्याने दुस-या महायुद्धात ब्रिटनच्या लोकांना लढण्याचे धैर्य वाढले. अब्राहम लिंकनच्या बोलण्याने अमेरिकेची फाळणी टाळली गेली. मार्टिन ल्यूथर किंगच्या ''गुणवत्ता त्वचेच्या रंगावर नाही तर चारित्र्यावर ठरेल' या वक्तव्याने जगभर प्रभाव पाडला. गांधीजीचा 'चले जाव' , सुभाषबाबूंचा 'जयहिंद'  आणि क्रांतीकारकांचा 'वंदे मातरम' ह्या एकाच शब्दाने इंग्रजांना पळता भुई थोडी झाली. नाहीतर,'बालिश बहु बायकात बडबडला' असे बडबडणारे तर अनेक असतात.*

               *॥ रामकृष्णहरी ॥*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
        *श्री संजय नलावडे, मुंबई*
       *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
    प्रेरणादायी विचार
*माणूस म्हणुनी जन्मा आलो,*
*माणूस म्हणुनी जगेन मी।*
*खर आहे,एक हिंदी गीत मला भावले.*
*तू *हिंदू बनेगा ,न मुसलमान बनेगा।*
*इन्सान की औलाद है।*
*इन्सान बनेगा।*
*बघा जमलं तर माणूसच बना.*
*खूबसूरत चेहरा भी*
*बूढ़ा हो जाता है*
*ताकतवर जिस्म भी*
       *एक दिन ढल जाता है*
  *🤴ओहदा और पद भी*
    *एक दिन खत्म होता है।*
*लेकिन एक अच्छा इंसान*   
*हमेशा अच्छा इंसान ही रहता है।*

          *अशोक कुमावत*
    ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते  )*
*जि. प.शाळा--माणिकखांब,*
*ता.इगतपुरी, जि. नाशिक.*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

काही लोकांच्या बाबतीत पैसा म्हणजे सर्वस्व आहे आणि पैशामुळे काहीही मिळवता येते.
पैशामुळे तुम्हाला तुमच्या भौतिक सुविधा मिळवता येतात परंतु इतरांचे मन मिळवता येत नाही.इतरांचे मन जिंकायचे असेल तर या ठिकाणी पैसा चालत नाही.त्यासाठी हवे तुमचे उदार अंतःकरण,तुमची दुस-याबद्दलची आत्मियता,प्रेम इतरांना दिलात तर तेही तुमच्यावर अधिक प्रेम करायला लागतील.यासाठी तुमच्या जवळ असलेल्या पैशाची गरज नाही.एवढे सत्य आहे पैशाने सारे काही खरेदी करता येईल पण जगात असलेल्या सर्व जीवांचे मन आणि प्रेम कधीच खरेदी करता येत नाही.मग तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे ?

© व्यंकटेश काटकर, नांदेड
९४२१८३९५९०/८०८७९१७०६३        
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                 *कर्म हीच पूजा*
                
एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता प्रपंच सुटेल असे वाटले . पण नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे . "
रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय  करणार  ? "
त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार . "
परमहंसांनी विचारले , " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार न ? " तेव्हा त्याबाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या . त्यावर रामकृष्ण म्हणाले . " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. " 
तुम्ही तुमच्या नातवंडानाच तुमचा श्रीकृष्ण समजून वागा. मनातला भाव चांगला ठेवा म्हणजे तुम्हाला सर्वत्रच भगवंत दिसेल आवश्यक नाही मुर्तीतच देव पाहणे.तुम्ही तुमच्या नित्यकर्मात पण देवाचे दर्शन घेऊ शकता.

*तात्पर्य : नित्य कर्मामध्ये भगवतभाव ओतला की ते कर्म नाम साधनेच्या दर्जाचे होते व तेच कर्म पूजा ठरते.*
*'कर्मे ईशू भजावा.'*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें