सोमवार, 19 अगस्त 2019

20-08-2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
          ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 20/08/2019 वार - मंगळवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

◆ *भारतीय अक्षय ऊर्जा दिन*
◆ *सद्भावना दिन* ◆ *जागतिक डास दिन*

💥 ठळक घडामोडी :-
◆ २००८- कुस्तीगीर सुशीलकुमार याला बीजिंग ओलीम्पिक मध्ये ब्रॉंझ पदक मिळाले.
◆१९९७ - सूहाने हत्याकांड - अल्जिरियामध्ये ६० व्यक्ती ठार. १५ अधिक व्यक्तींचे अपहरण.

💥 जन्म :-
◆१९४४ - राजीव गांधी, भारताचे माजी पंतप्रधान.
◆ १९४६ - एन.आर. नारायण मुर्ती, भारतीय उद्योगपती.

💥 मृत्यू :-
◆ २०१३-नरेंद्र दाभोळकर ,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व थोर समाजसुधारक,विचारवंत यांची पुणे येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
◆ २०१३- जयंत साळगावकर, ज्योतिर्भास्कार,लेखक व उद्योजक.
◆१९९७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
*जि प शाळा बिरसी,जि गोंदिया*
📱  9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *नवी दिल्ली - जम्मू काश्मीर मुद्द्यावरुन भारत-पाक यांच्यातील संबंध ताणले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जवळपास ३० मिनिटे झाली चर्चा, त्यात द्विपक्षीय संबंध आणि सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाच्या मुद्द्यावर करण्यात आली चर्चा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *पूरग्रस्तांना दिलासा, एक हेक्टरवरील पूरग्रस्त शेतीचं पीककर्ज माफ, कोसळलेल्या घरांचीही पुनर्बांधणी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा *
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 98 टक्के मतदान, शिवसेनेचे अंबादास दानवे तर आघाडीचे बाबुराव कुलकर्णी रिंगणात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना अमिताभ बच्चन यांच्याकडून 51 लाखांची, तर रिलायन्स इंडस्ट्रीजकडून 5 कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांकडून बिग बींना धन्यवाद *
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मुंबई-पुणे रेल्वे सेवा कालपासून पूर्ववत, सर्व गाड्या वेळापत्रकानुसार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांकडून जम्मू-काश्मीरमध्ये विद्येचा प्रसार होण्याची शक्यता, पुण्यातील शैक्षणिक संस्थांचा पुढाकार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 92 व्या वर्षी झाले निधन, त्यांना फ्रेश मॉर्निंग बुलेटीन कडून भावपुर्ण श्रद्धांजली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*जागतिक फोटोग्राफी दिन - 19 ऑगस्ट*

https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_19.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे काय ?* 📙

सूक्ष्मदर्शक भिंगाचा वापर प्रथम लहान वस्तू बघण्यासाठी केला गेला. मग जिवाणूंचा शोध लावला गेला. त्यांच्याबद्दलचे संशोधन चालू असतानाच पेशींच्या अंतर्गत हालचालींबद्दल औत्सुक्य निर्माण झाले होते. पण सूक्ष्मदर्शक यंत्रांची ताकद कमी पडू लागली होती. पेशीतील न्युक्लियस दिसत होता; पण त्याच्या पुढे फारसे जाता येत नव्हते. याच सुमाराला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागला.
हा काम कसा करतो ? अतिशय काळजीपूर्वक व जास्तीत जास्त पातळ गोष्टींचे निरीक्षण करण्यासाठी याचा वापर करतात. अगदी पातळ असा केस या मायक्रोस्कोपखाली बघितल्यास जाड मनगटाएवढ्या दोरखंडासारखा दिसतो. सर्वसाधारणपणे १०,००० ते ५०,००० पट मोठी प्रतिमा करण्याची याची शक्ती असते.
एका तीव्र स्रोतातून इलेक्ट्रॉनचा झोत चुंबकीय क्षेत्रातून एकवटून पाहावयाच्या गोष्टींवर सोडला जातो. तपासणी करावयाच्या वस्तूंमधील प्रत्येक अणूची दखल हा झोत घेतो व त्याचा एक आराखडा समोरच असलेल्या इलेक्ट्रॉन शोधकातर्फे टीव्हीच्या पडद्यावर दिसू लागतो. योग्य त्या पद्धतीत झोताचे केंद्रीकरण झाल्यावर गरजेप्रमाणे त्याचे फोटो घेता येतात. झोतातले इलेक्ट्रॉन्स नेमके काय करतात ? प्रकाश लहरींपेक्षा यांची पृथक्करण शक्ती कितीतरी पटींनी जास्त असल्याने वस्तूची प्रतिमा जवळपास एक लक्ष पट मोठी दिसू शकते. मुख्यत्वेकरून जेनेटिक्समधील संशोधन, डीएनए व आरएनए या संदर्भातील प्रयोग, विषाणूंचा शोध यांसाठी या मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. भारतातील फार मोठय़ा शहरांतील मोजक्या प्रयोगशाळांत अत्यंत कुशल वैज्ञानिक यांचा उपयोग करतात.
HIV वरचे संशोधन, H1 N1 या विषाणूने होणाऱ्या स्वाइन फ्लू बद्दलचे संशोधन हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपशिवाय शक्य नव्हते. बायोटेक्नॉलॉजी संदर्भातही अनेक बाबतीत याचा वापर अत्यावश्यक ठरतो.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*       

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *महाराष्ट्राचे राज्यफुलपाखरू कोणते ?*
      राणी पाकोळी

2)  *घोड्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?*
       तबेला

3)  *जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?*
       मौसीनराम व चेरापुंजी (भारत)

4)  *शुद्ध पाण्याला काय नसते ?*
       रंग,वास,चव

5)  *पाण्याच्या अवस्था किती व कोणत्या ?*
       3 ( स्थायू,द्रव, वायू )

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  हरीश बुटले, पुणे
●  इरेश्याम झंपलकर, कुंडलवाडी
●  विजय दिंडे, हुनगुंदा
●  गणेश येवतीकर
●  शशांक बामनपल्ले, नायगाव
●  दीपक पाटील
●  सतीश दिंडे
●  जयपाल दावनगीरकर
●  विवेक सारडे
●  प्रमोद मुधोळकर
●  आदित्य रावजीवार
●  कांतीलाल घोडके

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*भारतभूमी संत-महंतानी, समाजसुधारकांनी पावन केली आहे. लोककल्याणासाठी चंदनासारखा देह झिजवत त्यांनी मानवता समृद्ध केली. काही अलौकिक प्रलोभनांमध्ये भोळ्याभाबड्या लोकांना अडकवून स्वत:ची वैभवी दुकानं थाटणं हे संतांचं ध्येय नसतं. त्यांच्या माणूसधर्माच्या शिकवणूकीचं आपल्याला मोल नसतं. संतांच्या जीवनात कुठलाच झगमगाट नसतो, चमत्कार नसतात. 'माणूस' घडवणं हेच त्यांचं ध्येय असतं. संतांना ना स्वत:ची जात असते, ना कोणता धर्म!  कुठल्या विशिष्ठ विचारांचा त्यांच्यावर पगडा नसतो. ते स्वत:च्या वाटेवरुन स्वतंत्रपणे चालत राहतात.*

*स्वर्ग-नरकाच्या जटील जाळ्यात संत अडकत नाहीत. कुणाला अडकवत नाहीत. जमिनीवरल्या सहज जगण्याचे व अंतरीच्या शाश्वत सुखाचे मंत्र ते देत राहतात. त्यांचं नातं केवळ सत्याशी असतं, सत्य कटू असतं. म्हणून आपण दगड मारतो सत्याच्या पुजा-यांना. यात संत असतात तसे वैज्ञानिक-विचारवंतही असतात. खरंतर या महामानवांच्या निमीत्तानं आपण सत्यालाच दगड मारत असतो. सत्याचा मार्ग गर्दीचा नसतो, पण खडतर असतो. म्हणूनच येशूला आपण क्रूसावर चढवलं. बुद्ध-महावीर यांना दगड मारले. एडिसनला मंदबुध्दी ठरवलं आणि गॅलिलिओला वेड्यात काढलं. विचारवंताना गोळ्या झाडणारेही आपणच. किती निष्ठुर आहोत आपण ! इमानाला सजा व दांभिकाची पूजा ! सत्याच्या मुखवट्यांना हार घालायचे, महानतेचे मुकुट चढवायचे ही आपली व्यवस्था, हे आपले करंटेपण.*

             *॥ रामकृष्णहरी ॥*
☀☀☀☀☀☀☀☀☀
         *श्री. संजय नलावडे, मुंबई*
       *मोबाइल- 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
 
*मित्रांनो,*
*🏻संतांनी म्हटले आहे की ,*
*निंदकाचे घर असावे शेजारी।*
*तरीही आपण एक गोष्ट मनावर* *पक्की कोरून ठेवा की*
*आईना बदलनेसे चेहरा नही बदलता।*
*चेहरा बदलो आईना खुदही बदल* *जायेगा।*
*यश पचविणे एक वेळ सोपे; पण* *आरोप रिचवणे खूप कठीण. '* *हेचि फल काय मम* *तपाला ' ? याचा वारंवार मनाच्या* *खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे* *सोपे नाही.*
   *कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे? वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. 🤭अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते.*
  *आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते. शेवटी काय तर ''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू  शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,, ''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,, ''लोक तर निसर्गाला पण नाव ठेवतात.*
                              *
      *अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

   जेव्हा एकाच बिंदूतून कितीतरी रेषा काढलेल्या आपण पाहिलेल्या आहेत तरीही त्या एकमेकांना एकाच बिंदूत छेदून पुढे सरळ मार्गाने निघून जातात आणि त्याच रेषा परत एकाच बिंदूत एकत्रीत येऊन मिळतानाही पाहिले आहे.असा जर आपण विचार केला तर आपले हृदय आणि मनही एकच आहे.आपणच आपल्या हृदयातून आणि मनातून अनेक माणसांना जोडण्याचे काम करत असतो.त्यात काहींना काही कारणाने जवळ करतो तर काही माणसे आपल्यापासूनच जवळ येऊन दूर जातात.जे दूर जातात त्यांचा विचार करु नका,कारण त्यांना स्वातंत्र्य आहे.परंतु जी माणसे तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांना दूर करुन नका कारण त्यांना तुमचे मन आणि हृदय कळलेले असते.कारण तुम्ही त्यांचे केंद्रस्थानी बिंदूस्थानी आहात.तुम्हीच त्यांचे आधारही आहात आणि त्यांची प्रेरणाही आहात.सा-यांना जवळ करण्याचे बिंदूसारखेच काम करायला शिकले पाहिजे तरच जीवन समृद्ध होईल.

© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०./८०८७९१७०६३.     
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                *एकीचे बळ*

एका वृद्धाने सदान्- कदा भांडणार्‍या आपल्या मुलांना हातभर लांबीची एकेक काठी मोडायला सांगणे
एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्‍या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण पालथ्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली.
वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता न येणे
पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले.संघटित राहून केलेल्या कार्यास यश नक्कीच प्राप्त होते.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें