✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 08/08/2022 वार - सोमवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
◆२००८- चीन मधील बीजिंग येथे २९ व्या ओलीम्पिक स्पर्धांना सुरुवात.
◆१९९८-संरक्षण संशोधन आणि विकाससंस्थेच्या (DRDO)सात प्रयोगशाळा औद्योगीक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.
◆१९४९ - भुतानच्या राष्ट्राची स्थापना.
◆१९६३ - इंग्लंडच्या बकिंगहॅमशायर काउंटीत दरोडेखोरांनी रेल्वेतून २६,००,००० ब्रिटीश पाउंड लुटले.
💥 जन्म :-
◆१९३२-दादा कोंडके,अभिनेते,निर्माते.
◆ १९२१ - वुलिमिरी रामलिंगस्वामी, भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ.
◆ १९४० - दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.
◆१९५२ - सुधाकर राव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
◆१९६८ - अबेय कुरूविला, भारतीय क्रिकेट खेळाडू.
◆ १९८१-रॉजर फेडरर ,स्विस लान टेनिस खिलाळू.
💥 मृत्यू :-
●१९९९-गजानन नरहर सरपोतदार ,चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इस्रोचं गिफ्ट, बेबी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण, SSLVच्या मदतीने ईओएस -02 आणि आझादीसॅट उपग्रह अवकाशात झेपावले*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *पुढील 48 तासात राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर चार दिवस अतिवृष्टीची शक्यता, मुंबईलाही तीन दिवस ऑरेंज अलर्ट, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *भारताच्या हळदीला जगभरातून मागणी, यंदा देशातून हळदीची दोन लाख टन निर्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *नाशिक पंचायत समितीच्या आवारातील रानभाज्या महोत्सवास नाशिककरांचा उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत असून दिवसभरात एक लाखापर्यतची उलाढाल होत आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) बायोगॅस प्लँट व द्रवरूप शेणखत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याबाबतची माहिती गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *कॉमनवेल्थ बॉक्सिंगच्या महिलांच्या 48-50 किलो वजनी गटात भारताच्या निकहत जरीनची 'सुवर्ण' कामगिरी, दिवसभरातील तिसरं सुवर्णपदक, भारताची पदकसंख्या 48 वर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
*🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••
*मनोरंजनात्मक बालगीते👇*
*व्हिडीओ-लिंक👇*
https://youtu.be/YnF12Kt8NbY
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
*सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*जय जवान, जय किसान*
शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या देखील भरमसाठ होती. त्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी समजल्या जायचे. कामाच्या मोबदल्यात धान्य देण्याची त्या काळाची प्रथा सर्वाना सोईस्कर होती. म्हणूनच शेतीकाम करणाऱ्या लोकांना मान सन्मान मिळत होता. आत्महत्या म्हणजे काय असते हे तेंव्हाच्या शेतकऱ्यांना मुळी ओळखीचे नव्हते. यावरून आपण अंदाज बांधू शकतो की, किती चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना अच्छे दिन होते. ..........
खालील ब्लॉगवर पूर्ण लेख वाचन करता येईल.
https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_24.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया whatsapp करावे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ संकलन
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *आपल्या शरीरात किती हाडे आहेत ?* 📙
या प्रश्नाचं उत्तर कोणताही शाळकरी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी देऊ शकेल. कारण त्यांच्या पाठ्यपुस्तकात शरीरातल्या एकूण हाडांची संख्या दिलेली असते. ती आहे २०६. ते उत्तर तसं बरोबरही आहे. ते संपूर्णतया अचूक आहे असं मात्र म्हणता येणार नाही. कारण आपण जन्मतो तेव्हाची संख्या मोजली तर त ती सहज ३०० ते ३५० भरेल. जसजसं मूल वाढू लागतं तसतशी यातली काही हाडं एकमेकांमध्ये मिसळून जातात. ती अशी जोडली जातात, की त्यांचं आता एकच एक एकसंध हाड बनतं. आपल्या कवटीच्या हाडांमध्ये ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात दिसून येते. मेंदूला संरक्षण देणारा जो कवटीचा भाग असतो त्यात जन्मतः २२ हाडं असतात. मूल चार वर्षांचं होईपर्यंत यातली बरीचशी एकमेकांशी सांधली जाऊन प्रौढ व्यक्तीच्या डोक्याच्या कवटीत फक्त आठ हाडं राहतात. आपल्या कंबरेच्या हातातही अशी सांधेजोड होत राहते. सरासरीने चार वर्षांवरील व्यक्तीच्या शरीरात २०६ हाडं राहतात.
याला अर्थात काही अपवाद जरूर आहेत. काहीजणांच्या शरीरात अतिरिक्त फासळ्या असतात. त्याच्या छातीतला पिंजरा अधिक हाडांचा बनलेला असतो. काहीजणांच्या हाताला किंवा पायाला किंवा दोन्हींनाही सहा सहा बोटं असतात. त्यांच्या हाडांची संख्या साहजिकच जास्त भरते. काही जणांच्या मणक्यातही जास्त हाडं असतात.
आपल्या हातांमध्ये आणि पायांमध्ये सर्वात जास्त हाडं असतात. एका बोटामध्ये तीन हाडं असतात आणि ती बोटं तळहाताला ज्या सांध्यानं जोडली जातात त्यात आणखी. त्यामुळे एका हातात किंवा पायात ३०-३० हाडं असतात. म्हणजे या चार अवयवांचीच मिळून १२० हाडं होतात. छातीच्या पिंजऱ्यातल्या २४ फासळ्या आणि त्यांना जोडणारं मधलं छातीचं हाड मिळून २५ होतात. तीच गत मणक्याची. माकडहाडापासून ते मानेपर्यंत एकूण २६ मणके असतात. म्हणजे यांचीच मिळून बहुतेक संख्या होते. बाकी मग फुटकळ पण महत्त्वाची हाडं आहेत. शरीरातलं सर्वात जास्त लांब हाड असतं मांडीचं. ते आपल्या एकूण उंचीच्या पावपट असतं. सर्वात लहान हाड आपल्या कानातलं. ते असतं केवळ २.५ मिलीमीटर लांबीचं; पण आपल्या कानाच्या पडद्यांवर तरंग उमटवण्याची फार मोठी भूमिका ते पार पाडतं. त्याच्याशिवाय आपल्याला ऐकूच येणार नाही. गंमत म्हणजे जिराफाची मान आपल्या मानेच्या दसपट लांब असली तरी दोन्हींमध्ये हाडांची एकूण संख्या सारखीच आहे.
*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून*
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*" यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणे "*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••
१) भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कोण आहेत ?
२) कोणत्या पक्ष्याचे अंडे सर्वात मोठे असते ?
३) पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा आहे ?
४) नांदेड जिल्ह्यातील घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध गाव कोणते ?
५) गुरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी कशाला प्राधान्य देतात ?
*उत्तरे :-* १) मा. जगदीप धनखड २) शहामृग ३) ०.३% ४) माळेगाव ५) कुरण शेती
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● अरुण वि. देशपांडे, पुणे
● गजानन सावंत
● संतोष हसगुंडे
● चंदू नागुल
● अवधूत पाटील सालेगावकर
● बळीराम शिवाजी खांडरे
● शिलानंद बुद्धेवार
● बालाप्रसाद सूर्यवंशी
● रावजी मारोती बोडके
● रवी वाघमारे
● संतोष वाधवे
● लक्ष्मण कामशेट्टी
● नागेश कानगुलवार
● ऋषिकेश सोनकांबळे
● देवण्णा पाशावार
● अतुल उदाडे
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*संत तुकाराम महाराज यांचा अतिशय सोपा दिसणारा अभंग आहे,'बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले ॥' येथे तुकोबा एक खूप मोठं मानसशास्त्रीय गूढ कमीत कमी शब्दांत उकलून देत आहेत. जसे बोलतो तसेच वागणारा माणूस भेटला तर त्याला मी वंदन करीन, असे तुकोबा म्हणतात. म्हणजे अशी माणसे दुर्मिळ आहेत का ? असा प्रश्न पडतो. माणसाचे आचरण त्याच्या चारित्र्याशी विसंगत असेल तर असण्यात आणि भासवण्यात एक दरी निर्माण होते. आपण ज्यांना चांगली माणसं म्हणतो त्यांच्याही असण्यात आणि दाखवण्यात व्यक्तिमत्वात दरी असतेच.*
*असण्याच्या आणि भासवण्याच्या मध्ये केवढी दरी आहे हे पाहिले पाहिजे. ती जेवढी मोठी तेवढा माणूस लहान आणि ती जेवढी लहान तेवढा माणूस मोठा, असे एक समीकरण मांडता येईल. असे होण्याच्या मागे एक बाह्य कारण आहे. आपल्या कृतीचे समर्थन करणे ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी गुन्हेगारही गुन्हा का करावा लागला याचं समर्थन करत असतो. म्हणूनच मग 'बोले तैसा चाले' अशी व्यक्ती दुर्मिळ असते. आणि अशी व्यक्ती सापडलीच तर तो परीस असतो, तो इतरांचेही सोने करू शकतो.*
*॥ रामकृष्णहरी ॥*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
या जगात आतापर्यंत विद्वान माणसे शरीराने जरी या जगातून गेली असली तरी ती आपल्या विचारांनी अमरच झालेली आहेत.कारण त्यांचे विचार हे सर्वसामान्य माणसेही आपल्या जीवनात आदर्श विचार मानून त्या विचारांच्या मार्गावरुन चालतात म्हणजे विचार रुपाने ते सदैव आपल्या जीवनात पाठराखण करत असतात.म्हणतात ना ' मरावे परी कीर्तीरुपी उरावे ' म्हणजेच विद्वान माणसे आपल्या जीवनात सदैव आपल्या विचारांच्या,कार्याच्यारुपाने आपल्यामध्येच असतात हे ध्यानात ठेवून आपणही त्यांचा मार्ग अनुसरावा म्हणजे आपणासही विचाररुपी अमरत्व प्राप्त होईल.
© व्यंकटेश काटकर, नांदेड.
संवाद..9421839590/ 8087917063.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*प्रयत्नांची मर्यादा*
एका शिकारी कुत्र्याने एका सशाचा पाठलाग सुरू केला. पण अखेर ससा पळून जाण्यात यशस्वी झाला. ते पाहून त्या कुत्र्याच्या मालकाने त्याला विचारले, ' एका सशाने पळण्यात तुला हरवावे?'
यावर तो कुत्रा म्हणाला,
" धनी , माझे धावणे हे पोटासाठी शिकार मिळविण्याकरिता होते, तर त्या सशाचे धावणे हे स्वतःचा जीव वाचविण्यासाठी होते. तेव्हा त्याची गती माझ्या गतीपेक्षा अधिक असणे हे सहाजिकच नाही का?"
तो ससा त्याचा जीव वाचविण्यासाठी धावणारच हा त्याचा जीवाचा प्रश्न आहे हे त्याला कळून चुकले आणि तो अतोनात प्रयत्न करणार.
*तात्पर्यः जेव्हा एखाद्याच्या जीवावर बेतते तेव्हा आलेल्या प्रसंगातून स्वतःला वाचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना मर्यादा नसते.*
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें