शुक्रवार, 27 दिसंबर 2019

28 डिसेंबर 2019 शनिवार

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 28/12/2019 वार - शनिवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
●१६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.
●१८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले.
● १८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले.
● १८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार.

💥 जन्म :-
● १८९९ - गजानन त्र्यंबक माडखोलकर, मराठी साहित्यिक व पत्रकार.
● १९३२ - धीरूभाई अंबाणी, भारतीय उद्योगपती.
● १९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती.

💥 मृत्यू :-
● १९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय.
● १९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक.
● १९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी.
● २००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत.
● २००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक.
● २००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ.
● २००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे.
● २००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सरसकट 10 टक्के कराची शिफारस ; आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून मध्यमवर्गीयांना दिलासा मिळण्याची शक्यता*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात दिग्गजांसह नवख्या चेहऱ्यांना संधी; तिन्ही पक्षांकडून नावं जवळपास निश्चित*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *महाराष्ट्रात असलेल्या आठ न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पैकी फक्त दोन ठिकाणी, म्हणजे कोल्हापूर व नांदेड येथे डीएनए प्रयोगशाळा नव्हते, परंतु येत्या वर्षात साधारणपणे मार्च महिन्यापर्यंत, या दोन्ही ठिकाणी हे विभाग सुरू करण्यात येतील.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *एसटीच्या चालकांसोबत वाहकांनाही ऑन ड्युटी मोबाईल वापरण्यास बंदी; वाहकांमधून तक्रारींचा सूर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मराठीचा अभिमान बाळगा, दीक्षांत सोहळ्यात इंग्रजी भाषण करणाऱ्यांना राज्यपालांचा खोचक सल्ला; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाच्या 15 व्या दीक्षांत सोहळ्यात वक्तव्य*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *मुंबईत एकीकडे सीएएविरोधात तर दुसरीकडे सीएएच्या समर्थनात रॅली, ऑगस्ट क्रांती मैदानात भाजपची जाहीर सभा, तर आझाद मैदानात विद्यार्थ्यांकडून निषेध*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *मुंबई :- वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रणजी करंडकात रेल्वेची ऐतिहासिक कामगिरी, 41 वेळा रणजी विजेत्या मुंबईवर पहिल्यांदाच मात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*विशेष बातमी : 10 ते 12 जानेवारी दरम्यान  होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका जाहीर ; संमेलनाच्या व्यासपीठावर एकही राजकीय व्यक्तीला स्थान नाही ; कवी पद्मश्री ना.धों. महानोर यांच्या हस्ते उदघाटन ; समारोप प्राचार्य रा.रं. बोराडे उपस्थित राहतील*
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                  *गुरुदक्षिणा*

मोटे सरांना मोबाईलवर बोलल्यापासून डॉ.गिरीश अस्वस्थ वाटत होता. त्यांच्या चेहर्‍यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदाच मोटे सरांनी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करणे डॉ.गिरीशच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्यासाठी मोटे सरांना डॉ.गिरीश ज्या दाते मेमोरियल ............

वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html     

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?* 🔬

जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.
पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.
*असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.*

*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?*
        तामिळनाडू

2)  *पाठीच्या कण्यात एकूण किती मणके असतात ?*
        33

3)  *अमेरिकेतील गुलामगिरीची प्रथा कायद्याने कोणी बंद केली ?*
        अब्राहम लिंकन

4)  *भारतीय घटनेत भारताचा उल्लेख कसा केला आहे ?*
        संघराज्य

5)  *'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?*
       पं जवाहरलाल नेहरू

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 साई पाटील, धर्माबाद
      श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस
👤 वृषाली वानखडे, अमरावती
      सामाजिक कार्यकर्ती & साहित्यिक
👤 श्रीधर सुंकरवार, नांदेड
👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद
👤 अजय तुम्मे
👤 योगेश शंकर ईबीतवार, येवती
👤 नंदकिशोर सोवनी, पुणे
👤 ओमसाई सितावार, येवती
👤 ओमकार ईबीतवार

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*रंग, शब्द, स्वरास एकाग्रचित्ताची समाधी लागली की, अवीट सौंदर्याचा आविष्कार घडतो. राष्ट्रे मोठी होतात ती एकाग्रचित्तानं, प्रामाणिकपणे काम करणा-या माणसांच्या बळावर; आळशी माणसांवर नव्हे. जीवन सुखाने जगण्यासाठी, आनंदासाठी, हसण्यासाठी, गाण्यासाठी, खेळण्यासाठी आहे; रडण्यासाठी नव्हे. आळशी माणसांवर रडण्याची वेळ येते. आळसाची सवय झाली की, माणूस आळशीपणाचा गुलाम बनतो. खरंतर आळशी माणूस बंद पडलेल्या घड्याळासारखाच असतो. परमेश्वराने माणसाला दोन हात आणि एक तोंड दिले आहे. याचाच अर्थ, दोन हातांनी काम करा आणि तोंडाची भूक भागवा.*

*माणसाच्या हाताची पाच बोटे म्हणजे एक सुंदर महाकाव्यच ! बोटांचा जिथं स्पर्श होईल तिथं स्वर्ग निर्माण होईल. यासाठी आळसाला कायमची सुट्टी द्या. आळशीपणा हेच अनेक दुर्गुणांचं उगमस्थान असतं. प्रेमाने प्रेम वाढते, द्वेशाने द्वेष, यशाने यश, विश्वासाने विश्वास वाढतो; तसे आळसाने आळस वाढतो. आपल्यासाठी कोणीतरी काम करावे आणि आपल्याला आरामात जगता यावे, ही आळशी माणसाची वृत्ती. आळशीपणाने सतत आराम करण्यात वेळ घालवणे म्हणजे जिवंतपणी आत्महत्या करण्यासारखे आहे. आळस माणसाच्या मनाला जडलेला कर्करोग आहे, असे हेडवूड नावाच्या विचारवंताने म्हटले आहे. 'दैव देईल ते मी घेईल' असे म्हणणारे लोक आळशीच. कष्ट करून मला मिळेल ते घेईन असे म्हणणारे लोक उद्योगी असतात.*
         *'हे ईश्वरा माझे हाती काम दे*
         *परी ते करण्याची शक्ती दे.'*

       ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
   ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
           *--संजय नलावडे, मुंबई*
         *मोबाइल  - 9167937040**
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*मित्रांनो*
*मानवी मेंदू सर्वांनाच मिळाला आहे पण कोण कसा वापर करतो हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.*
*मानवी संगणक' शकुंतला देवी एक अदभुत किमयागार ठरली आहे.*
*साधे गणित सोडवायचे असले तरी आपल्याला कंटाळा येतो, मग गणितातील समस्या अंकगणित, गुणाकार, भागाकार, समीकरणे, सुत्रे यामध्ये कोण पडणार? मात्र त्यासाठी ईश्वर कृपेचा वरदहस्त लाभलेल्या शकुंतलादेवी  भारतात जन्मल्या.*
*तर शकुंतला देवी यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1929 रोजी कर्नाटकमधील बंगळूर येथे झाला. विशेष म्हणजे वयाच्या 3 ते 5 व्या वर्षातच त्या गणितज्ञ झाल्या, त्यावेळी त्यांचे साधारण शिक्षणही झाले नव्हते.*
*बीबीसी लंडन या संस्थेने त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले. त्यावेळी त्यांनी फक्त संगणकावरच सोडविण्यासारखा प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी क्षणार्धात तोंडी उत्तर देऊन सर्वांना अचंबित करून सोडले.*  
*अत्यंत किचकट अंकगणितातील प्रश्न त्यांनी तोंडी सोडवून दाखवून जगातील सर्व शास्त्रज्ञांना त्यांची नोंद घेण्यास भाग पाडले. शकुंतलादेवी संख्याशास्त्राबरोबरच फलज्योतिष्यशास्त्रातही आपली बुद्धिमत्ता वापरत असत.*
*मानवी संगणक म्हणून ओळख* : *1977 मध्ये शकुंतलाचा सामना डॅलस युनिव्हर्सिटीत कॉम्प्यूटर 'युनिव्हॅक' शी झाला. शकुंतलाला 201 अंकाचे 23 वे वर्गमूळ काढायचे होते. ते सोडविण्यास त्यांना 50 सेकंद लागले. तर 'युनिव्हॅक'ला 62 सेकंद घेतले. तेव्हापासून शकुंतला जगभरात मानवी संगणक म्हणून ओळखली जाते.*
*विशेष कामगिरी* :
*1982 मध्ये नावाची ‘गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड’ मध्ये नोंद.*
● *1988 मध्ये वाशिंगटन डी.सी. मध्ये ‘रामानुजन मॅथेमॅटिकल जीनियस अवार्ड’ ने सन्मानित.*
● *मृत्युच्या एक महिन्यापूर्वी 2013 मध्ये मुंबईमध्ये ‘लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड’ ने सम्मानित.*
● *84 व्या जन्मदिवशी 4 नोव्हेंबर 2013 रोजी गूगलने त्यांच्या सन्मानार्थ ‘गूगल डूडल’ ठेवले.*
*आपणास जमले तर बघा, मेंदूला योग्य दिशा आणि चालना द्या.*

*अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी किंवा त्या संकटाला तोंड देण्यासाठी जी व्यक्ती सदैव तयार असते तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होते. संकटं ही प्रत्येकाच्या जीवनात कमी-जास्त तर असणारच.... पण संकटाला पाहून दूर पळून जाणारी फार असतात.कारण एकीकडे  त्यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता नसते,ते हतबल होतात,त्यांची मानसिकता नसते,दूरचा विचार करत नाहीत त्यामुळे त्यांचा जगण्याचा त्यांच्यावरच विश्वास नसतो.त्यामुळे संकटासमोर शरण जातात.तर दुसरीकडे काही व्यक्ती कोणत्याही संकटाला तोंड द्यायला तयार असतात.काही असो आपण त्या संकटाला तोंड दिलेच पाहिजे जर नाही दिले तर आपण जगणार कसे ? आपल्यासमोर उभे आयुष्य आहे ते कसे जगणार ?आज आपण सामोरे नाही गेलो तर जगण्याला अर्थच काय राहणार ? नाही आपल्याला जगायचे तर मग पुढे कसे जीवन जगणार ? जगायचेच असेल तर पहिल्यांदा आपला आपल्यावर आत्मविश्वास ठेवायला हवा आणि त्या आत्मविश्वासावरच पुढे पुढे पाऊल टाकायला हवे आणि त्याप्रमाणे जगायला हवे अशी सकारात्मक विचार घेऊन जगणारी व्यक्तीच जीवन चांगल्याप्रकारे जगू शकते. अशा आशादायी, ध्येयवादी असणा-या व्यक्तींचे अनुकरण करायला हवे  आणि  कोणत्याही संकटाला तोंड देणा-या अशा व्यक्तीकडे पाहिले तर अनुकरण करणा-या व्यक्तीला अधिक बळ मिळते आणि पुढील संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार होते.
म्हणून कोणत्याही संकटाला न घाबरता सामोरे जाऊन जीवन जगायला शिकले पाहिजे.तरच जीवन जगण्याला अर्थ आहे.
अन्यथा जीवन व्यर्थच आहे असे समजावे.

© व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                 *समाधान*

मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'
तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला.
माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..!

तात्पर्यः शक्य तेवढया मिळालेल्यात समाधानी राहणे हेच योग्य.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें