मंगलवार, 3 दिसंबर 2019

04 डिसेंबर 2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 04/12/2019 वार - बुधवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
         *भारतीय नौसेना दिवस*   

💥 ठळक घडामोडी :- 
१८२९ - भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्‍यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला.
१९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध) - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली.
१९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध)-ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला.

💥 जन्म :-
१९१९ - इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान.
१९३२ - रोह तै-वू, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
१९४३ - फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक.

💥 मृत्यू :- 
१९७५ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका.
१९८१ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *मुंबई : आम्ही कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. तसेच रद्द केलेली नाहीत. उलट ही कामे गतीने कशी पूर्ण होतील, याकडे आम्ही लक्ष देत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. *
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *मुंबई : दूरसंचार कंपन्यांकडून आता ५० टक्के शुल्कवाढ केली जाणार आहे. एअरटेल, व्होडाफोन-आयडिया कंपनीची कालपासून तर जिओची दरवाढ ६ डिसेंबरपासून*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन मोठया उत्साहात किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *श्रीनगर : पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन भारतीय नागरिक ठार झाले*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतरही लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही आवाजी मतदानाने सुरक्षा एसपीजी विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर झाल्याने यापुढे केवळ विद्यमान पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच एसपीजी सुरक्षा मिळणार आहे आणि माजी पंतप्रधान तसेच त्यांच्या कुटुंबीयांना ही सुरक्षा मिळणार नाही, हे या नव्या विधेयकामुळे स्पष्ट होत आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *आगामी वर्षातील एक जून पासून एक राष्ट्र एक रेशन कार्ड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील महत्वाकांक्षी योजना लागू होणार आहे. यामुळे देशभरात कुठे ही स्वस्त धान्य उपलब्ध होणार आहे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *अर्जेन्टीनाचा स्टार फुटबॉलर लियोनेल मेसीने सहाव्यांदा पटकावला 'बॅलन डी'ओर पुरस्कार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
           *कळी उमलण्याआधी .......*

https://storymirror.com/read/story/marathi/9fu28ady/klii-umlnnyaa-aadhii/detail

कथावाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *लिंबू पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होते का ?* 📙
जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. या आम्लाचा अन्नपचनासाठी खूप उपयोग असतो. जठरातील पेशीमधून हे अाम्ल स्रवत असते. या आम्लाचे प्रमाण कमी झाले तर अजीर्ण होते. अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. या उलट आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास आम्लपित्ताचा त्रास होतो. तोंडात आंबट पाणी येते. छातीत जळ जळ होते. पोटात जळजळ होते. जठराचा व्रणही होऊ शकतो. किंवा लहान आतडय़ांच्या पहिल्या भागात व्रण होतो. 
आम्ल पित्त असणाऱ्या लोकांनी तिखट, तेलकट, आंबट पदार्थ खाऊ नये असा सल्ला दिला जातो. कारण अशा गोष्टींनी आम्ल जास्त प्रमाणात तयार होते. साहजिकच आम्लपित्ताच्या व्यक्तीला अजूनच त्रास होईल. अशा व्यक्तीने खायचा सोडा घेतल्यास त्याची जळजळ कमी होते. कारण आम्लाचा प्रभाव अल्कली मुळे कमी होतो. जेल्युसील सारख्या गोळ्यांनीही रुग्णाला बरे वाटते. 
लिंबू पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होते का याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहा. लिंबात देखील सौम्य असे एक अाम्लच असते. आम्लपित्त कमी होण्याची दोन स्पष्टीकरणे देता येईल. एक म्हणजे हायड्रोजन आयर्न असतील (H+) तर आम्ल निर्मितीची व स्त्रवणाची जठारातील पेशींची क्रिया मंदावते. दुसरे म्हणजे लिंबू आपण पाण्यात टाकूनच पितो. साहजिकच या पाण्यामुळे जठरातील आम्ल सौम्य होते. या दोन गोष्टींमुळे काही लोकांमध्ये लिंबू पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होत असावे.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो, ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा केव्हा अस्तित्वात आला ?*
       2 फेब्रुवारी 2007

2)  *भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कोणत्या वर्षी झाला ?*
       1995

3)  *अल्कोहोलमध्ये काय असते ?*
       कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन

4)  *पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे पार पडली ?*
       ब्राझील ( 1992 )

5)  *अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला ?*
        11 सप्टेंबर 2001

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      
 
👤 उमाकांत शिंदे, नांदेड
👤 बबन साखरे
👤 शेख आलीम
👤 वैशाली बाळासाहेब भामरे

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.*

*काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* 
*"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."*

   ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●••
     🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
       *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
         📱 9167937040
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

 *मित्रांनो,* 
 *जिच्या उदरातून मानवी देह मिळाला त्या नारीचा सन्मान हा फक्त दिखाऊ* *पणा असल्याची चर्चा सुरू झाली.टी. व्ही.,वर्तमानपत्र, चौका-चौकात,राजकीय,सामाजिक* *बांधिलकी म्हणून सगळ्यांच्या गप्पा रंगतील, सगळे वेगवेगळ्या* *शिक्षा सुचवतील. न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल.* *खटला कोपर्डी सारखा 7,8 वर्षे चालेल.सगळे थोड्याच दिवसात विसरून जातात.* 
 *पण  कोपर्डीची र्निर्भया,हैद्राबादची डॉ.प्रियांका रेड्डी,उल्लासनगरची रिंकू पाटील,अंजना जाधव अशा अनेक* *निर्भया परत येतील का?* 
 *पुन्हा असे कृत्य घडणार नाही असा न्याय कुणी देईल का?* 
 *त्यांच्या कुटूंबाच्या मनातील दडलेल्या ,आक्रोश करणाऱ्या*  *मुलीला कुणी बाहेर काढले का?* 
 *हो हे घडू शकते ,पण त्यासाठी पुन्हा महातम्यांनाच अवतार घ्यावा लागेल.* 
 *कारण आताच्या समाजातील मनात ,मनगटात,मेंदूत ना शिवाजी* *महाराज आहे ना कुणी कृष्ण.* 
 *गीतेतील श्रीकृष्ण द्रौपदीला कौरावांपासून वाचवितो,वस्त्रहरण* *थांबवितो. महावीर वर्धमान इंद्रियांवर विजय मिळवून जितेंद्रिय बनवून* *दाखवितात.अशोकवनात सीता एकटी राहूनही रावण तिला* *स्पर्श करीत नाही.शिवाजी महाराजांच्या* *काळात कल्याणच्या सुभेदाराची सून पळवून आल्यावर* *महाराजांनी तिला आईची उपमा देऊन सत्कार* *केला.* 
 *राज्यातील लेकीबाळीवर हात टाकणाऱ्या रांजाच्या पाटलाचे हात* *कलम केले.* 
 *महात्मा गांधींच्या अंथरुणात सुंदर तरुणींना झोपविले होते तरीही त्यांनी आपले ब्रम्हचर्य व्रत समाजाला पटवून* *दिले,त्यापासून तसूभरही हालले नाहीत.* 
 *स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या स्वागतासाठी सर्वात सुंदर वेश्या आणली आहे हे समजताच कार्यक्रम* *त्याग केला व सामीलही झाले पण स्वतःचे चारित्र्य सिद्ध करून दाखविले.* 
 *लुधियाना येथील कर्तारसिंह सराबा दरडेखोर गणला गेला पण त्याच्या मुलुखात एखाद्या आई-बहिणीकडे* 
 *कुणाची वाकडी नजर गेली तर तो गोळ्या घालून जागीच यम दाखयायचा.* 
 *आज खऱ्या अर्थाने या भावांची गरज आहे.ही सर्व परिस्थिती बदलायची असेल तर पुन्हा आपल्यातूनच या* *महापुरूषांचा अवतार धारण करावा लागेल.* 

 *अशोक कुमावत* 
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

प्रत्येकाच्या जीवनात निराशा ही सवतीसारखी नेहमी मनाला छळत असते.ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मनाला विचलीत करते.अशा स्थितीतून तिला हद्दपार करण्यासाठी काही ना काहीतरी करण्यासाठी तो आशेकडे धावतो आणि त्यातुन सुटका करून घेतो.अर्थात जीवनात निराशेने घर केले तर नक्कीच आशेचा शोध घेऊन निराशेला बाजूला सारतो आणि जीवन निराशेतून मुक्त करतो.निराशा जरी जीवनात आली तरी घाबरायचे नाही तिला हिमतीने तोंड देत आशेचा शोध घ्यायला शिकले पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.हीच आपल्या जीवनाची खरी परीक्षा आहे.

© व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🥗🥙🥗🥙🥗🥙🥗🥙🥗🥙
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
              *हेतल चा अनुभव*

हेतल दुपारी शाळेतून घरी आली. घराला कुलूप होते. कारण तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले व घरात आली. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलला. ती हात पाय धुऊन खाऊ शोधु लागली. अचानक जोरदार पाऊस पडू लागला. तिने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळ कडे गेले. बराच उशीर झाला आहे, असे म्हणून ती जवळच्या खुर्चीत बसली. तिला हळूहळू पावसाचे गाणे आठवू लागले. ती हळूहळू गुणगुणू लागली. आता पावसाचा आवाज कमी झाला व तिने खिडक्या उघडल्या. तरीपण रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. हळूहळू पाऊस थांबला. पानाआड लपलेले पक्षी बाहेर आले व त्यांनी आपल्या पंखाना  झटकले. बाहेर लख्ख ऊन पडले. बाहेर कसं स्वच्छ सुंदर वाटत होते. आता संध्याकाळ झाली. दारावरची बेल वाजली +डिंग डाँग) आई आली असे म्हणतात हेतल पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले. आणि आईबाबा तिचा  समोर उभे होते. इतक्यावेळ कंटाळलेली हेतल आईला जाऊन बिलगली. हाच  होता तिचा अनुभव.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

1 टिप्पणी: