✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 27/09/2019 वार - शुक्रवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*जागतिक प्रवासी दिन*
💥 ठळक घडामोडी :-
◆२००२ - मराठीमाती या मराठी संकेतस्थळाची सुरूवात.
💥 जन्म :-
◆१९०७ - भगत सिंग, भारतीय क्रांतिकारी.
◆ १९७४ - पंकज धर्माणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
◆ १९८१ - लक्ष्मीपती बालाजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
💥 मृत्यू :-
◆१९७२ - एस.आर. रंगनाथन, भारतीय गणितज्ञ.
◆२००८ - महेंद्र कपूर, विख्यात भारतीय पार्श्वगायक.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *कर्नाटक विधानसभेतील अपात्र उमेदवार सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यामुळे कर्नाटकातील निवडणुका पुढे ढकलल्याचे निवडणूक आयोगाकडून देण्यात आली माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *शेतात ज्वारी कापणीचे काम करताना अंगावर वीज पडून पाच जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील धरणगावमधील घटना*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *विधानसभा निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा वेळापत्रकात बदल, 21 आणि 22 ऑक्टोबरच्या परीक्षा रद्द*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *पुण्यात अवघ्या काही तासात तब्बल 106 मिलीमीटर पाऊस, 13 जणांचा मृत्यू तर अनेकजण बेपत्ता, मदतकार्य सुरु, पुढील काही तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाचा इशारा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *पीएमसी बँकेच्या खातेधारकांना मोठा दिलासा, आता महिन्याला 10 हजार रुपये काढता येणार, तर बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्ती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *शिखर बॅंक घोटाळ्यासंबंधित माझ्याकडील पुराव्यात शरद पवारांचं नाव कुठेही नाही, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडूनही पवारांना क्लिनचीट*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधारपाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
बुलेटीनची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.
https://b.sharechat.com/8oXP6XDnj0
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*जसे चारित्र्य तसे जीवन*
https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/38.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
👁 *आपल्या डोळ्याचे कार्य नेमके कसे चालते ?* 👁
डोळ्यांनी आपण जग बघतो तर जग आपल्या डोळ्यांतून आपल्या मनाचा थांग घेण्याचा प्रयत्न करीत असते. डोळे मनातील भाव कवचितच लपवू शकतात.
पृष्ठवंशीय प्राण्यांच्या डोळ्यांची रचना बरीचशी सारखी असते. याउलट कीटक जाती, काही जलचर यांचे डोळे त्यांच्या देहाच्या मानाने खूपच मोठे व वेगळ्या प्रकारचे असतात. वेगळेपणाचा मुख्य भाग म्हणजे त्यांचा डोळा हा 'डोळा' नसून अनेक संवेदनाक्षम मज्जातंतूंची ती एक सलग जाळीच असते. त्यामुळे कीटकांच्या डोळ्यांना 'कंपाऊंड आइज' असेही म्हटले जाते.
माणसाला रंगदृष्टी असून रंगज्ञान उत्तम असते. अन्य प्राण्यांच्या बाबतीत याची नक्की कल्पना आपल्याला नाही. रंगांच्या असंख्य छटा तात्काळ ओळखता येणे व जेमतेम एक दशांश मिलिमीटर एवढ्या लहान बिंदूला वेगळे वा सुटे पाहता येणे ही मानवी डोळ्यांची वैशिष्टय़े म्हणता येईल.
मानवी डोळ्याच्या शास्त्रीय वर्णनापेक्षा त्याची प्रमुख वैशिष्टे जर बघितली तर डोळ्याला मेंदूखालोखाल संरक्षण दिले आहे, असे लक्षात येते. जोराचा पाऊस, तीव्र ऊन, धुळीचे वादळ या सर्वांपासून अंगभूत संरक्षण डोळा मिळवतो. सतत नकळत होणारी पापण्यांची उघडझाप, डोळ्यांच्या बाहुल्या प्रकाशाच्या तिरपीनुसार आपसूक कमी जास्त होणे व डोळ्यांत जाणारी धूळ सतत अश्रूंच्या मदतीने धुतली जाऊन ते स्वच्छ राहणे या क्रिया इतक्या नकळत सहज घडत असतात की, त्या सांगितल्यावरच लक्षात येतात. यावरूनच आपण नेहमी उद्गारतो, 'डोळ्याची पापणी लवण्याच्या आत अमुक एक गोष्ट घडली'.
काॅर्नियातुन म्हणजे बुबुळावरील पारदर्शक आवरणातून प्रकाशकिरण यातून डोळ्यात प्रवेश करतात. त्यांच्या तीव्रतेनुसार डोळ्याची बाहुली लहान मोठी होऊन मग ते डोळ्याच्या भिंगातून आतील भागात जातात. डोळ्याच्या आतील पोकळीत रंगहीन पारदर्शक तैलद्रव भरलेला असतो. मागील बाजूला असलेला पडदा व दृष्टीपटल यावर भिंगातून आलेल्या किरणांची प्रतिमा पडते. हा पडदा दोन प्रकारच्या पेशींनी बनलेला असतो. सुमारे बारा कोटी रॉड्स व साठ लाख कोन्स यांनी एका डोळ्याचा रेटिना बनतो. डोळ्याच्या आतील किमान ७२ टक्के भाग पडद्याने व्यापलेला असतो व मेंदूशी या भागाचा ऑप्टिक नर्व्हतर्फे संबंध जोडला जातो. राॅड्सवर कमी प्रकाशात करड्या, काळ्या, पांढऱ्या रंगाचा परिणाम होतो; तर कोन्सवर हिरव्या, लाल व निळा रंगछटांचा परिणाम होतो. रॉडसना दंडगोल व कोन्सना शंक्वाकृती पेशी असेही संबोधले जाते. पण डोळ्यांच्या संदर्भात व्यवहारात कॉर्निया, रेटिना, रॉड, कोन व लेन्स हे शब्दच जास्त परिचित आहेत. उदा. कॉर्नियाचे रोपण, रेटिनाची डिटॅचमेंट, डोळ्यांत लेन्स बसवणे इत्यादी.
रेटिनाकडून मेंदूकडे पाठवले जाणारे संदेश हे 'कोडेड' स्वरूपात जातात. या कोडबद्दल अद्याप पुरेसे स्पष्टीकरण उपलब्ध नाही. ते झाल्यास अंध माणसास डोळ्यांशिवाय सुद्धा पाहता येईल, अशी एक शक्यतस शास्त्रज्ञ वर्तवतात. डोळ्याकडून येणाऱ्या संदेशांचे वाचन मेंदूतील मागील बाजूच्या भागात होते. डोक्यावर मागील बाजूला जोरात टप्पल मारल्यास प्रथम डोळ्यांसमोर काजवे चमकतात ते यामुळेच.
दोन डोळय़ांमुळे लांबचे व जवळचे अंतर वा खोली याचा नेमका अंदाज आपल्याला येतो. ज्यावेळी डोळ्यांच्या भिंगातून रेटिनावर पडणारी प्रतिमा अलीकडे वा पलीकडे पडते, त्यावेळी चष्म्याची जोड देऊन दुरुस्ती करावी लागते. डोळ्याची लेन्स अपारदर्शक झाली, तर त्यालाच 'मोतीबिंदू' असे म्हणतात. यावेळी ही लेन्स काढुन कृत्रिम लेन्स बसवली जाते. बुबुळाच्या पुढचा पारदर्शक पडदा म्हणजे कार्निया 'अ' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वा अन्य काही कारणांनी अपारदर्शक बनला, तर नवीन कॉर्नियाचे रोपण करता येते. दृष्टीदान म्हणजे मृत माणसाचा कॉर्निया मृत्यूनंतर लगेच काढून हे रोपण केले जाते.
जगाच्या पाठीवरील माणसांचे डोळे वेगवेगळे भासण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डोळ्यांच्या बाहुल्यांचे रंग. या रंगछटांचे खेळच डोळ्यांकडचे आपले लक्ष खिळवून ठेवतात. घारे, निळे, करडे, तांबूस, काळे, पिंगट असे रंग माणसाच्या नजरेची आठवण देत राहतात.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*" छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगरानेनाही तर छोट्या दगडाने ठेच लागते "*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1) *सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?*
राष्ट्रपती
2) *'अग्निपंख' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?*
डॉ ए पी जे अब्दुल कलाम
3) *जगातील सर्वात मोठे पठार कोणते ?*
तिबेटचे पठार
4) *जगातील सर्वात उंच इमारत कोणती ?*
बुर्ज खलिफा
5) *जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?*
भारत
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● सद्दाम दावणगीरकर
● नरेश केशववार
● अजित कड
● डॉ. प्रतिभा जाधव
● अनिल आर्य माकणे
● गोविंद कदम
● डॉ. उमेश पांचाळ
● राजू बेंबडे
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*परिस्थिती कितीही कठीण असली तरी तोंड लपवून, मस्तक झुकवून जगू नका. दु:खांचे युग आले तरी हसतमुख राहून जगा. प्रसंग कितीही वाईट असला तरी हिंमतीने सामोरं जाता आलं पाहिजे....*
*न मुंह छुपाके जियो*
*और न सर झुकाके जियो...*
*गमोंका दौर भी आये*
*तो मुस्कुरा के जियो...*
*ढगांनी झाकले गेले तरी तारे नष्ट होत नाहीत. संकटांच्या अंधाररात्री ह्रदयाचे दिप उजळून जगा. जीवनातील कुठला क्षण मृत्यूची ठेव म्हणून आरक्षित झाला आहे हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. मानवी जीवन अखंड प्रवाही असून ते कोणत्याही टप्प्यावर कायमचे थांबू शकत नाही. म्हणून प्रत्येक मुक्कामानंतर पुढे पुढे जातच जीवन जगलं पाहिजे....!*
*ये जिंदगी किसी मंजिल पे*
*रूक नही सकती.....*
*हर एक मकाम के आगे*
*कदम बढा के जियो...*.
••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*सज्जनहो,*
*🤝🏻खरा संग आणि योग्य मित्र जीवनाचे सोने केल्याशिवाय राहत नाही.*
*संत कबीर याच महत्व सांगताना म्हणतात.---*
*मुरख संग न किजिए,लोहा जलि न टिराइ।*
*कदली-सीप-भूवंग मुख,एक बुंद तिहँ भाइ।।*
*मूर्खाची संगत संकटात नेते.मूर्खाची संगत करणं म्हणजे लोखंडाच्या* *नावेत प्रवास केल्यासारखे आहे.आणि ती नाव* *तळालाच घेवून जाते.*
' *जसा संग, तसा रंग।'*
*महाभारतातील कुंतीपुत्र कर्ण दानशूर होता.प्रचंड ,पराक्रमी महायोद्धा होता.* *परंतु कमजोर चारित्र्याची संगत. त्यामुळे त्याने* *कौरवांची बाजू घेतली.*
*शेवटी त्यांचं पतन झालं आणि* *पराभव सुद्धा।*
*या उलट बिभीषण होता ,मारुतीचे* *ऐकून त्याने रामाची संगत धरली.खूप विरोध* *झाला.मला कुठलीच अपेक्षा नाही फक्त रामासारखा मित्र हवा असे* *सांगून सर्व संपत्ती रावणाच्या स्वाधीन करतो.त्याचं लंकेचा तो अधिपती बनतो.सुदामा आणि कृष्ण यांचीही संगत आपणास ठाऊक आहे.असे* *असतांनाही कुसंगतीचे आकर्षण माणसाला खेचण्याचा प्रयत्न करते, तेव्हा* *सावधान । भले मित्र कमी असतील* *चालेल,पण परिसाच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा.*
*🙏अशोक कुमावत🙏*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
नाते असे तयार करा की,ती शेवटपर्यंत कायम टिकून राहिली पाहिजे.जर असे नाते बनवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातील स्वार्थीपणाला तिलांजली द्यायला हवी आणि त्याबरोबरच प्रेम,जिव्हाळा,मैत्री, आपुलकी इ.गुणांना प्राधान्य देऊन खरे माणुसकीचे दर्शन निर्माण करुन जो काही एकमेकांतला असलेला दूरावा दूर करून एक अजोड आणि अतूट नाते निर्माण करायला शिकले पाहिजे तरच आपल्या मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल यात शंकाच नाही.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*लोभाची शिक्षा*
एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली. तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले. ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस
तात्पर्य – लोभाने माणसाच्या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्यक आहे.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें