सोमवार, 30 दिसंबर 2019

31 डिसेंबर 2019 मंगळवार

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 31/12/2019 वार - मंगळवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       *वर्षातील शेवटचा दिवस*

💥 ठळक घडामोडी :- 
● १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना.


💥 जन्म :-
● १८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव
● १९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर
● १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला
● १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान
● १९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स 


💥 मृत्यू :- 
● १९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे
● १९९७: स्वरराज छोटा गंधर्व


*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा विधिमंडळ परिसरात संपन्न झाला. एकूण ३६ आमदारांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह २६ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर दहा आमदारांनी राज्यमंत्रिपदाची घेतली शपथ*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड होताच काटेवाडीत आनंदाला उधाण गुलालाची उधळण , फटाक्याची आताषबाजी करत आनंदोत्सव साजरा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *दोन लाखांवरच्या शेतकरी कर्जदारांसाठी कर्जमाफीची नवी योजना आणणार तर, नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठीही विशेष योजना राबवणार असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *बिपीन रावत भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, केंद्र सरकारकडून घोषणा, लष्करप्रमुखपदावरून रावत आज निवृत्त होणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी पोलिसांचा 'मास्टर प्लान', पोलिसांकडून 250 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सना नोटीस तर फेसबुकवरून 12 पेजेस डिलीट*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *मुंबईतून तब्बल 26 खासगी रेल्वे धावणार, रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न, 10 ते 15 दिवसात खासगी रेल्वेसाठी निविदा निघणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसेसावळी (खटाव) शाखेत रविवारी अज्ञात व्यक्तींनी धाडसी दरोडा टाकला. यामध्ये बँकेतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे १ कोटी ६५ लाख ९६ हजार १५९ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे सातारा आणि सांगली जिल्हा परिसरात एकच खळबळ उडाली आहे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
 *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा*

अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू .........


वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.


http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html      


लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       📙 *मुरमान्स्कचे बंदर* 📙

जगातील सर्वात उत्तरेकडचे बंदर म्हणजे मुरमान्स्कचे बंदर. रशियाच्या उत्तरेकडच्या भागातील बव्हंशी भाग कायमचा गोठलेला असतो. विशेषत: हिवाळ्यात तर विचारायलाच नको. बॅरेंट्स समुद्रातील कोला खाडीजवळील एक भाग मात्र तेथील समुद्रप्रवाहामुळे बाराही महिने गोठतच नाही. संपूर्ण उत्तरेकडील समुद्राचे निरीक्षण करताना हा न गोठणारा बिंदू शोधून काढला तो दुसर्‍या निकोलस झारने. १९१६ साली बंदराची जागा नक्की केली जाऊन बंदर उभारणीसाठी तंत्रज्ञ तेथे पाठवले गेले. या शेवटच्या झारला भूगोल व विज्ञान दोन्हींची विलक्षण जाण होती. देशाला बारमाही बंदर हवेच, या कल्पनेने त्याला पूर्ण झपाटले होते. त्यातूनच या बंदराची उभारणी त्याने सुरू केली. मात्र बंदर पूर्ण होण्यापूर्वीच त्याची सत्ता जाऊन क्रूर हत्या झाली.
१९१६ साली बंदरबांधणी झाली. त्या वेळी जेमतेम लाकडी घरातून उभारले गेलेले छोटेसे गाव आज आता मोठे शहर झाले आहे. सहा लाख वस्तीचे परिपूर्ण नांदते, रसरसते शहर ही सुद्धा या टोकाच्या हवामानातील एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणावी लागेल.
झारची सत्ता गेली, तरी बंदर मोठ्या चिकाटीने उभे राहिले. ६९ अंश उत्तर अक्षांश व ३३ अंश पुर्व रेखांशांवर हे बंदर उभे आहे. आसपासचे वातावरण बहुधा वर्षभर शून्याच्या आसपास असते. रात्रीच्या वेळी उणे पंधरा ते उणे तीस सेंटिग्रेड यादरम्यान ते खाली जाते. आर्क्टिक प्रदेशातील झोंबरे वारे सतत वाहत असतातच.
नोव्हेंबर महिन्यात इथला सूर्य शेवटचा मावळतो, तो एकदम संक्रांतीनंतरच उगवतो. प्रत्यक्ष बंदराच्या आसपास समुद्र जरी गोठत नसला तरी थोडा लांबचा टप्पा क्वचित गोठू लागतो. बंदरातील हिमफोड्या नौका ताबडतोब त्या दिशेने जाऊन रस्ते मोकळे करून देतात.
अन्नधान्य, इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बाहेरून आणावा लागतो. पण मुरमान्स्क येथे दोन गोष्टींची उणीव नाही. खनिज तेल व मासे यांची प्रचंड साठवण व निर्यात या बंदरातून जगभर होते. सैबेरियन भागातून तेलाच्या विहिरीतून काढलेले तेल पाइपातून येथे आणून मग ते ठिकठिकाणी पाठवले जाते. या बंदराची भरभराट याच कारणामुळे होत गेली आहे.
दोन्ही महायुद्धांमध्ये रशियाची रसद व नाविक हालचालींची ताकद मुरमान्स्क बंदरातच एकवटली होती. तिथपर्यंत पोहचायची सवय व या हवामानाला तोंड देण्याची ताकद फक्त रशियन नौदलातील नावीकांना होती. रशियाची पश्चिम बाजू जर्मनांनी व्यापली असल्याने या बंदरातून सर्व आवश्यक तो पुरवठा केला गेला व रशिया महायुद्धातून सुखरूप बाहेर येऊ शकला.
आज भौगलिक उपयुक्ततेनुसार मुरमान्स्कचे स्थान अढळ बनले आहे, ते युरोपकडून जपानकडे वा जपानकडून युरोपकडे होणाऱ्या मोठ्या जलवाहतुकीमुळे. या वाहतुकीला मार्ग दोन. दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून. मध्यंतरी अनेक वर्षे सुवेझचा कालवा बंद होता, तेव्हा ही वाहतूक उत्तरेकडून वळवली गेली होती. आजही जेव्हा जेव्हा मध्य आशियात अस्वस्थपणा येतो, तेव्हा हाच रस्ता वापरला जातो. त्या प्रत्येक वेळी रसदीसाठी, मधल्या मुक्कामासाठी, दुरुस्तीसाठी मुरमान्स्कचा थांबा अटळ राहतो.
दोन्ही ध्रुवांवर मानवाने पाय रोवला असला तरी जवळपास तितक्याच दुर्गम हवामानात पाय रोवून बारमाही व्यावहारिक जीवन जगायचे म्हणजे मुरुमान्स्कमध्ये काम करायचे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

अडचणी येतात आणि जातात. फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात.
~ वपु काळे | पार्टनर

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *कलकत्याहून वंदेमातरम हे वृत्तपत्र कोण प्रकाशित करत असे ?*
        अरविंद घोष

2)  *महाराष्ट्राचे वर्तमान उपमुख्यमंत्री कोण आहेत ?*
        अजित पवार

3)  *'माझे सत्याचे प्रयोग' या आत्मकथनात्मक ग्रंथाचे कर्ते कोण ?*
        महात्मा गांधी

4)  *संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीतील नकाराधिकार (व्हीटो) असलेल्या कायमच्या सदस्य राष्ट्राची संख्या किती ?*
         5

5)  *महाराष्ट्रात शेकरू ( उडणारी खार ) कोठे आढळते ?*
        भीमाशंकर

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 रामचंद्ररेड्डी सामोड, येताळा
👤 ताहेर पठाण, धर्माबाद
👤 किरण अबुलकोड, समराळा
👤 अमोल बुरुंगुले
👤 शशांक पुलकंठवार
👤 सचिन चव्हाण

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*आपल्याला कोणी विचारले, कसे आहात, की आपले उत्तर असते "ठिक आहे, बरं चालले आहे" पण, झकास चालले आहे, मजेत आहोत." असे म्हणणारे कमीच असतात. परंतु शेजा-याचे, परिचिताचे कसे काय  चालले आहे, असे विचारले तर मात्र आपले उत्तर बदलते. अर्थात तेही शेजारी किती सख्खे आहेत, परिचित किती जवळचे आहेत वगैरेवर अवलंबून असते. "ते एकदम मजेत आहेत. त्यांना काय धाड भरली आहे." वगैरे उत्तरे आपण देतो. आपल्याबद्दल बोलताना असणारी सावधगिरी इतरांच्या बाबतीत फारशी नसते.*

*अर्थात हेही सारे सगळ्यांच्याच बाबतीत खरे असते असे नाही. स्वत:बद्दल गैरसमज असणारी मंडळीही असतात. आपण खूप विद्वान आहोत, खूप यशस्वी आहोत, खूप सुखी आहोत, असे मानणारे लोकही असतात. 'सुख' म्हणजे काय ? एक कल्पना? मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे, असे म्हटले जाते. पण सुखाच्या कल्पनेमागे धावणा-या माणसाला पाहून ते खरे वाटत नाही. समर्थ रामदास म्हणतात--*
  *"जगी सर्व सुखी असा कोण आहे.*
   *विचारी मना तूचि शोधूनी पाहे."*

            *॥ रामकृष्णहरी ॥*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
       *संजय नलावडे, मुंबई*
      *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*मित्रांनो*
*आज 31 डिसेंबर* *2019*
*गेल्या दोन वर्षांपासून मी अखंड सुप्रभात ही लेखन मालिका चालू* *चालू ठेवली आहे.काही* *वाचतात,काही बघतात, काही डिलीट करतात,काही कॉपी पेस्ट करून* *फॉरवर्ड करतात,काही प्रतिसाद देतात,काही आठवण* *_काढतात.काहीही असो पण निमित्ताने  भेटतात.जी जी_*
*माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!*
*चला..*
*या वर्षाचा हा अखेरचा दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्री व नात्यांबद्दल खुप सारे धन्यवाद..!!*
*तुमच्या या मैत्रीची साथ*
*अशीच कायम असू द्या...*
*नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...*
✳ *आपला सदैव ऋणी*

- *अशोक लक्ष्मण कुमावत.*
*एम.ए. एम.एड.*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

     ज्याप्रमाणे प्रत्येक वस्त्रामध्ये आडवा आणि उभा तागा एकमेकांच्या साथीने मिळून घेतलेला असतो तेव्हा ते वस्त्र किंवा कापड तयार होते.त्याचप्रमाणे संसारातही पती-पत्नी आपल्या संसाररुपी वस्त्राला नेहमी जपत असतात.कुठे जरी फाटले तरी त्या संसाररुपी वस्त्राला आपल्या विचाररुपी सुईने आणि समजदारीच्या दो-याने सतत त्या संसाररुपी वस्त्राला शिवत राहतात.कितीही त्याला ठिगळ लागले तरी चालेल पण त्या ठिगळरुपी,वस्त्ररुपी संसारुपी गोधडी जीवनाच्या शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी ही दोन धागे कार्यरत असतात.जर का त्यापैकी एकजरी धागा कमकुवत झाला तर ते संसारुपी वस्त्र वस्त्र म्हणून राहत नाही किंवा त्याला वस्त्रही म्हणत नाही.मग त्याला वापरुन वापरुन राहिलेली चिंधी म्हणून बाजूला फेकून दिली जाते.मग संसाररुपी वस्त्र एकसंघ राहत नाही.संसारात दोघांनाही तेवढाच अधिकार आहे तेवढा वस्त्रामध्ये आडवा आणि उभा धागा एकमेकांत गुंतून आहे.

© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🏠🌷🏠🌷🏠🌷🏠🌷🏠
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                     *परीस*

एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड
येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा
दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग
तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या
गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच गेले नाही....

तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी
परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या
नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी मार्गदर्शकाच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही
असतो किंवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो ....... पण फार कमी
लोक या परीसाला ओळखू शकतात.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

रविवार, 29 दिसंबर 2019

30 डिसेंबर 2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 30/12/2019 वार - सोमवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
            *रिझाल दिन - फिलिपाईन्स*

💥 ठळक घडामोडी :- 
● १८०३ - अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह.
● १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला.
● १९५३ - जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत - १,१७५ डॉलर.
● १९९६ - आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार.
● २००४ - भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार.

💥 जन्म :-
● १८६५ - रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म.
● १८७९ - रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञानी.
● १८८७ - कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.'भारतीय विद्याभवन' चे संस्थापक.

💥 मृत्यू :-
● १९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ.
● १९७४ - शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी.
● १९९२ - शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर.
● २००१ - हर्षद महेता, भारतीय शेअर दलाल.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *ठाकरे सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार, अजित पवार, धनंजय मुंडे, आव्हाड, अशोक चव्हाण शपथ घेण्याची शक्यता, तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला 3 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता *
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या दोन तर आरजेडीच्या एका नेत्याने घेतली शपथ, राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह अनेक नेते शपथविधीला उपस्थित*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सन्मान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी बच्चन कुटुंबीयांसह दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली.*


••••••••••••••••••••••••••••••••••••

4⃣ *अर्ध्या देशात गोठवणारी थंडी, दिल्लीसह सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी तर दिल्लीतील अनेक भागात तापमानाचा पारा 2 अंश सेल्सिअसपेक्षा खाली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *खिलाडी अक्षय कुमार आणि करीनाचा 'गुड न्यूज' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्या दिवशी 17.56 कोटींचा गल्ला तर दोन दिवसांत 39.34 कोटींची कमाई*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *वेगवान गोलंदाज पीटर सिडलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये सहकाऱ्यांसमोर सिडलने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.*

•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *दक्षिण आफ्रिकेने पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात चिवट वृत्तीच्या इंग्लंडला १०७ धावांनी केले पराभूत.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        *गरज तेथे मदत करा*
     http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_8.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *किरणोपचार म्हणजे काय ?* 📙
*******************************

अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसक अस्त्रामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गांपैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात.
क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही हे बघण्यासाठी होतो.
गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यत: शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

एका ओघळणाऱ्या थेंबामागे, न गाळलेले हजारो अश्रू असतात.


~ वपु काळे | काही खरं काही खोटं


*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला ?*
        लॉर्ड मेकॅले

2)  *भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता ?*
        भारतरत्न

3)  *भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता ?*
       परमवीर चक्र

4)  *स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या देशाने बहाल केला ?*
        न्यूझीलंड

5)  *मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?*
       सेनापती बापट

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 किरण रणवीरकर, साधनव्यक्ती
      गटसाधन केंद्र, धर्माबाद
👤 मारोती छपरे
👤 निवृत्ती लोखंडे
👤 राजेश्वर रामपुरे
👤 साहेबराव कांबळे
👤 आनंद यडपालवार
👤 संजय भोसीकर
👤 भारत पाटील सावळे

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.*


*आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'*


         ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
    🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
         📱 9167937040

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*_मित्रांनो,_*
*सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे.*
*होठोपे सच्चाई रहती है।*
*जहाँ दिलमे सफाई होती है।*
*हम उस देशके वासीं है,जिस देशमे* *गंगा बहती है।*
*अस असलं तरी चेहरा न देखो दिलको देखो।*
*चेहरे ने लाखोंको लुटा।*
*दिल सच्चा और चेहरा झुटा।*
*हे पण तितकेच महत्वाचे आणि खरे* *आहे.*
*मनुष्याचं चारित्र्य कमकुवत करणारे दोन मुख्य अवगुण म्हणजे--लोभ* *आणि असत्य.मोठमोठ्या गोष्टीविषयी* *असणारा लोभ पटकन लक्षात येतो.*
*पण सूक्ष्म स्तरावर असणारा लोभ लगेच लक्षात येत नाही.*
*या छोट्या आणि सूक्ष्म लालसा म्हणजे,समाजामध्ये,मित्रांमध्ये* *लोकप्रिय होण्याची इच्छा, इतरांच्या तोंडून आपली स्तुती व्हावी ही* *अपेक्षा, आपण जसे आहोत, त्यापेक्षाही अधिक सुंदर* *दिसावं,कष्टाविना सुखसुविधा प्राप्त व्हाव्यात अशा इच्छा.*
*या लालसाच माणसाला अपराध करण्यासाठी प्रवृत्त करतात. तसेच* *खोट बोलायला भाग पाडतात. त्यामुळे आपल्या शब्दांची ताकद नाहीशी होते.*
*झूठे इंसान की ऊंची आवाज सच्चे इंसान को खामोश कर देती हैं l परंतु*
*सच्चे इंसान की खामोशी झूठे इंसान की बुनियाद हिला देती है l*
*सत्य परेशान होता है, पराजित नही।*
*हे लक्षात ठेवून मार्गक्रमण करावे.*
*खरा माणूस पहायला मिळेल.*

*अशोक कुमावत, नाशिक*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.

व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद..९४२१८३९५९०
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *अहंकार आणि गर्व असू नये.*

रामकृष्ण परमहंस आपल भक्तांसमोर प्रवचन देत होते. ते म्हणत होते, हे पहा, तुमच्यासमोर मी बसलेलो आहे, हे तुम्ही पाहता. पण मी एखादे वस्त्र माझसमोर धरले, तर मी तुम्हाला दिसणार नाही. तथापि, पूर्वीप्रमाणेच मी तुमच्याजवळ आहे. कपडय़ाआड असल्याने तुमच्या   दृष्टीस मात्र पडू शकणार नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने अदृश्य होईन. तसाच परमेश्वरसुद्धा तुमच्या-माझ्या सर्वांच्या जवळ असतो. परंतु अहंकाराच्या पडद्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. तुम्ही आपल्या डोळ्यांसमोर लहानसा कापडाचा तुकडा जरी धरला, तरी समोरचा मोठा पर्वत दृष्टीला अगोचर होईल.

तात्पर्यं - अहंकार आणि गर्व यांचा पडदा जोपर्यंत आपण बाजूला करीत नाही, तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार, ज्ञानप्राप्ती आपणाला होणार नाही.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, 27 दिसंबर 2019

28 डिसेंबर 2019 शनिवार

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 28/12/2019 वार - शनिवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
●१६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.
●१८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले.
● १८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले.
● १८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार.

💥 जन्म :-
● १८९९ - गजानन त्र्यंबक माडखोलकर, मराठी साहित्यिक व पत्रकार.
● १९३२ - धीरूभाई अंबाणी, भारतीय उद्योगपती.
● १९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती.

💥 मृत्यू :-
● १९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय.
● १९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक.
● १९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी.
● २००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत.
● २००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक.
● २००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ.
● २००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे.
● २००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सरसकट 10 टक्के कराची शिफारस ; आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून मध्यमवर्गीयांना दिलासा मिळण्याची शक्यता*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात दिग्गजांसह नवख्या चेहऱ्यांना संधी; तिन्ही पक्षांकडून नावं जवळपास निश्चित*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *महाराष्ट्रात असलेल्या आठ न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पैकी फक्त दोन ठिकाणी, म्हणजे कोल्हापूर व नांदेड येथे डीएनए प्रयोगशाळा नव्हते, परंतु येत्या वर्षात साधारणपणे मार्च महिन्यापर्यंत, या दोन्ही ठिकाणी हे विभाग सुरू करण्यात येतील.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *एसटीच्या चालकांसोबत वाहकांनाही ऑन ड्युटी मोबाईल वापरण्यास बंदी; वाहकांमधून तक्रारींचा सूर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मराठीचा अभिमान बाळगा, दीक्षांत सोहळ्यात इंग्रजी भाषण करणाऱ्यांना राज्यपालांचा खोचक सल्ला; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाच्या 15 व्या दीक्षांत सोहळ्यात वक्तव्य*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *मुंबईत एकीकडे सीएएविरोधात तर दुसरीकडे सीएएच्या समर्थनात रॅली, ऑगस्ट क्रांती मैदानात भाजपची जाहीर सभा, तर आझाद मैदानात विद्यार्थ्यांकडून निषेध*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *मुंबई :- वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रणजी करंडकात रेल्वेची ऐतिहासिक कामगिरी, 41 वेळा रणजी विजेत्या मुंबईवर पहिल्यांदाच मात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*विशेष बातमी : 10 ते 12 जानेवारी दरम्यान  होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका जाहीर ; संमेलनाच्या व्यासपीठावर एकही राजकीय व्यक्तीला स्थान नाही ; कवी पद्मश्री ना.धों. महानोर यांच्या हस्ते उदघाटन ; समारोप प्राचार्य रा.रं. बोराडे उपस्थित राहतील*
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                  *गुरुदक्षिणा*

मोटे सरांना मोबाईलवर बोलल्यापासून डॉ.गिरीश अस्वस्थ वाटत होता. त्यांच्या चेहर्‍यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदाच मोटे सरांनी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करणे डॉ.गिरीशच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्यासाठी मोटे सरांना डॉ.गिरीश ज्या दाते मेमोरियल ............

वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html     

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?* 🔬

जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.
पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.
*असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.*

*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?*
        तामिळनाडू

2)  *पाठीच्या कण्यात एकूण किती मणके असतात ?*
        33

3)  *अमेरिकेतील गुलामगिरीची प्रथा कायद्याने कोणी बंद केली ?*
        अब्राहम लिंकन

4)  *भारतीय घटनेत भारताचा उल्लेख कसा केला आहे ?*
        संघराज्य

5)  *'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?*
       पं जवाहरलाल नेहरू

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 साई पाटील, धर्माबाद
      श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस
👤 वृषाली वानखडे, अमरावती
      सामाजिक कार्यकर्ती & साहित्यिक
👤 श्रीधर सुंकरवार, नांदेड
👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद
👤 अजय तुम्मे
👤 योगेश शंकर ईबीतवार, येवती
👤 नंदकिशोर सोवनी, पुणे
👤 ओमसाई सितावार, येवती
👤 ओमकार ईबीतवार

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*रंग, शब्द, स्वरास एकाग्रचित्ताची समाधी लागली की, अवीट सौंदर्याचा आविष्कार घडतो. राष्ट्रे मोठी होतात ती एकाग्रचित्तानं, प्रामाणिकपणे काम करणा-या माणसांच्या बळावर; आळशी माणसांवर नव्हे. जीवन सुखाने जगण्यासाठी, आनंदासाठी, हसण्यासाठी, गाण्यासाठी, खेळण्यासाठी आहे; रडण्यासाठी नव्हे. आळशी माणसांवर रडण्याची वेळ येते. आळसाची सवय झाली की, माणूस आळशीपणाचा गुलाम बनतो. खरंतर आळशी माणूस बंद पडलेल्या घड्याळासारखाच असतो. परमेश्वराने माणसाला दोन हात आणि एक तोंड दिले आहे. याचाच अर्थ, दोन हातांनी काम करा आणि तोंडाची भूक भागवा.*

*माणसाच्या हाताची पाच बोटे म्हणजे एक सुंदर महाकाव्यच ! बोटांचा जिथं स्पर्श होईल तिथं स्वर्ग निर्माण होईल. यासाठी आळसाला कायमची सुट्टी द्या. आळशीपणा हेच अनेक दुर्गुणांचं उगमस्थान असतं. प्रेमाने प्रेम वाढते, द्वेशाने द्वेष, यशाने यश, विश्वासाने विश्वास वाढतो; तसे आळसाने आळस वाढतो. आपल्यासाठी कोणीतरी काम करावे आणि आपल्याला आरामात जगता यावे, ही आळशी माणसाची वृत्ती. आळशीपणाने सतत आराम करण्यात वेळ घालवणे म्हणजे जिवंतपणी आत्महत्या करण्यासारखे आहे. आळस माणसाच्या मनाला जडलेला कर्करोग आहे, असे हेडवूड नावाच्या विचारवंताने म्हटले आहे. 'दैव देईल ते मी घेईल' असे म्हणणारे लोक आळशीच. कष्ट करून मला मिळेल ते घेईन असे म्हणणारे लोक उद्योगी असतात.*
         *'हे ईश्वरा माझे हाती काम दे*
         *परी ते करण्याची शक्ती दे.'*

       ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
   ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
           *--संजय नलावडे, मुंबई*
         *मोबाइल  - 9167937040**
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*मित्रांनो*
*मानवी मेंदू सर्वांनाच मिळाला आहे पण कोण कसा वापर करतो हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.*
*मानवी संगणक' शकुंतला देवी एक अदभुत किमयागार ठरली आहे.*
*साधे गणित सोडवायचे असले तरी आपल्याला कंटाळा येतो, मग गणितातील समस्या अंकगणित, गुणाकार, भागाकार, समीकरणे, सुत्रे यामध्ये कोण पडणार? मात्र त्यासाठी ईश्वर कृपेचा वरदहस्त लाभलेल्या शकुंतलादेवी  भारतात जन्मल्या.*
*तर शकुंतला देवी यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1929 रोजी कर्नाटकमधील बंगळूर येथे झाला. विशेष म्हणजे वयाच्या 3 ते 5 व्या वर्षातच त्या गणितज्ञ झाल्या, त्यावेळी त्यांचे साधारण शिक्षणही झाले नव्हते.*
*बीबीसी लंडन या संस्थेने त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले. त्यावेळी त्यांनी फक्त संगणकावरच सोडविण्यासारखा प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी क्षणार्धात तोंडी उत्तर देऊन सर्वांना अचंबित करून सोडले.*  
*अत्यंत किचकट अंकगणितातील प्रश्न त्यांनी तोंडी सोडवून दाखवून जगातील सर्व शास्त्रज्ञांना त्यांची नोंद घेण्यास भाग पाडले. शकुंतलादेवी संख्याशास्त्राबरोबरच फलज्योतिष्यशास्त्रातही आपली बुद्धिमत्ता वापरत असत.*
*मानवी संगणक म्हणून ओळख* : *1977 मध्ये शकुंतलाचा सामना डॅलस युनिव्हर्सिटीत कॉम्प्यूटर 'युनिव्हॅक' शी झाला. शकुंतलाला 201 अंकाचे 23 वे वर्गमूळ काढायचे होते. ते सोडविण्यास त्यांना 50 सेकंद लागले. तर 'युनिव्हॅक'ला 62 सेकंद घेतले. तेव्हापासून शकुंतला जगभरात मानवी संगणक म्हणून ओळखली जाते.*
*विशेष कामगिरी* :
*1982 मध्ये नावाची ‘गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड’ मध्ये नोंद.*
● *1988 मध्ये वाशिंगटन डी.सी. मध्ये ‘रामानुजन मॅथेमॅटिकल जीनियस अवार्ड’ ने सन्मानित.*
● *मृत्युच्या एक महिन्यापूर्वी 2013 मध्ये मुंबईमध्ये ‘लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड’ ने सम्मानित.*
● *84 व्या जन्मदिवशी 4 नोव्हेंबर 2013 रोजी गूगलने त्यांच्या सन्मानार्थ ‘गूगल डूडल’ ठेवले.*
*आपणास जमले तर बघा, मेंदूला योग्य दिशा आणि चालना द्या.*

*अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी किंवा त्या संकटाला तोंड देण्यासाठी जी व्यक्ती सदैव तयार असते तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होते. संकटं ही प्रत्येकाच्या जीवनात कमी-जास्त तर असणारच.... पण संकटाला पाहून दूर पळून जाणारी फार असतात.कारण एकीकडे  त्यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता नसते,ते हतबल होतात,त्यांची मानसिकता नसते,दूरचा विचार करत नाहीत त्यामुळे त्यांचा जगण्याचा त्यांच्यावरच विश्वास नसतो.त्यामुळे संकटासमोर शरण जातात.तर दुसरीकडे काही व्यक्ती कोणत्याही संकटाला तोंड द्यायला तयार असतात.काही असो आपण त्या संकटाला तोंड दिलेच पाहिजे जर नाही दिले तर आपण जगणार कसे ? आपल्यासमोर उभे आयुष्य आहे ते कसे जगणार ?आज आपण सामोरे नाही गेलो तर जगण्याला अर्थच काय राहणार ? नाही आपल्याला जगायचे तर मग पुढे कसे जीवन जगणार ? जगायचेच असेल तर पहिल्यांदा आपला आपल्यावर आत्मविश्वास ठेवायला हवा आणि त्या आत्मविश्वासावरच पुढे पुढे पाऊल टाकायला हवे आणि त्याप्रमाणे जगायला हवे अशी सकारात्मक विचार घेऊन जगणारी व्यक्तीच जीवन चांगल्याप्रकारे जगू शकते. अशा आशादायी, ध्येयवादी असणा-या व्यक्तींचे अनुकरण करायला हवे  आणि  कोणत्याही संकटाला तोंड देणा-या अशा व्यक्तीकडे पाहिले तर अनुकरण करणा-या व्यक्तीला अधिक बळ मिळते आणि पुढील संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार होते.
म्हणून कोणत्याही संकटाला न घाबरता सामोरे जाऊन जीवन जगायला शिकले पाहिजे.तरच जीवन जगण्याला अर्थ आहे.
अन्यथा जीवन व्यर्थच आहे असे समजावे.

© व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                 *समाधान*

मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'
तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला.
माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..!

तात्पर्यः शक्य तेवढया मिळालेल्यात समाधानी राहणे हेच योग्य.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, 26 दिसंबर 2019

27 डिसेंबर 2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 27/12/2019 वार - शुक्रवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*डॉ पंजाबराव देशमुख जयंती*

💥 ठळक घडामोडी :-
●१७०३ - पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) इंग्लंडमध्ये प्राधान्य.
● १८३१ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला.
●१९४५ - २८ देशांनी जागतिक बँकेची स्थापना केली.
● १९४५ - कोरियाची फाळणी.
●१९४९ - इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.
● १९७८ - ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक.

💥 जन्म :-
● १८९८ - पंजाबराव देशमुख, विदर्भातील सामाजिक नेता, शिक्षण प्रसारक, केंद्रीय कृषिमंत्री.
● १९६५ - सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.

💥 मृत्यू :-
● १९६५ - देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय.
● १९९७ - मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका.
● २००२ - प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा अंदाज, कोल्हापुरात मुसळधार तर नागपूरसह विदर्भातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी, पुण्यातही शिडकावा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *नवी दिल्लीः उत्तर भारतात थंडीने केला कहर, दोन दिवसांपासू या ठिकाणी जबरदस्त थंडी असून केवळ लुधियानात कमीत कमी ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर भारतात आणखी पाच दिवस कडाक्याची थंडी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळावी यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LIC) कडून राबवली जाणारी वय वंदना योजनेसाठी केंद्र सरकारने लाभार्थींना आधार कार्ड केले बंधनकारक*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *एस टी महामंडळाच्या एस टी प्रवासभाडे सवलतीसाठी स्मार्टकार्ड बंधनकारक, 15 फेब्रुवारी 2020 पासून मासिक, त्रैमासिक पासधारक तसेच विद्यार्थ्यांसाठी 1 जून 2020 पासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रीक पद्धतीनं घेणार असल्याचा नवा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या परफॉरमन्स ग्रेड इंडेक्सनुसार शासकीय आणि अनुदानित शाळांना हा नियम असणार आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटी अध्यक्षपदी राजीव सातव यांची निवड, राजीव सातव हे सध्या गुजरातचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *काल या दशकातील शेवटचं सूर्यग्रहण; केरळ, अबुधाबीमध्ये रिंग ऑफ फायरनं डोळ्याचं पारणं फेडलं, तर मुंबईत सूर्य आणि ढगांची लपाछपी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
     *मरावे परी अवयवरूपी उरावे*

जन पळभर म्हणतील हाय हाय ! 
मी जाता राहील कार्य काय ?


गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना .............


वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.


http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.html


लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
         🦈🐟 *मासे* 🐟🦈
       ********************

मासे हे जलचर प्राणी आहेत. श्वसनासाठी त्यांना कल्ले असतात. शरीरामध्ये जवळपास संपूर्ण लांबीचे पाठीच्या कण्याचे हाड असतेच असते. या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्याही माशात आढळणारच.
सजीवांची उत्पत्ती पाण्यात झाली. त्यांतील अनेक पाण्याबाहेर पडले, पण मासे पाण्यातच राहिले. जगातील पृष्ठवंशीय प्रकारच्या एकूण प्राण्यांतील निम्म्याहून अधिक जाती मासेच आहेत. पाण्यातून बाहेर पडलेले अनेक प्राणी वेगाने हालचाल करू शकतात. पण पाण्याच्या घनतेमुळे, वजनामुळे मासे त्या मानाने खूपच कमी वेगवान असतात.
माशांचे शरीर खवल्यांनी भरलेले असते. हे खवलेच त्यांच्या पृष्ठभागाचे संरक्षण करतात. झीज झाल्यावर पुन्हा नवीन खवले येण्याची क्रिया सतत चालूच असते. खवल्यांमुळे माशांच्या हालचाली चमकदार दिसतात. माशांच्या हालचाली मुख्यत: शरीरातील स्नायूंच्या वेड्यावाकड्या आकुंचन प्रसारणातून होतात. यालाच मदत म्हणून त्रिकोणी पंखाकृतीच्या (फिनच्या) जोड्या काम करतात. माशाच्या छातीजवळचा भाग, तेथीलच तळाजवळचा भाग व पाठीवरचा भाग येथे एकेक पंखांची त्रिकोणी जोडी आढळते. माशांच्या जातीनुसार व आकारमानानुसार या पंखांची ताकद बदलत जाते. मुख्य पंख म्हणजे शेपटीचे. त्यांचा वापर सुकाणूसारखा तर केलाच जातो, पण खेरीज वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठीही हे पंख वापरले जातात.
माशांची श्वसनक्रिया कल्ल्यांमार्फत होते. एखादा लांबलचक कंगवा असावा, तशी त्यांची रचना असते. तोंडातून घेतलेले पाणी या कल्ल्यांतून सतत बाहेर टाकले जाते. या क्रियेत येथील रक्तवाहिन्या पाण्यातून प्राणवायू शोषून घेतात. तोंडावाटे घेतलेले अन्न मात्र या कल्ल्यातून बाहेर पडू नये, अशी व्यवस्था आतील कडा वळवून केलेली असते. श्वसनक्रिया व अन्न गिळणे या दोन्ही गोष्टी एकदमच केल्या जाऊ शकतात. त्यामुळे अनेक मासे तोंडाने पाणी घेतानाच येणारे पदार्थ म्हणजे लहान मासे, प्लांक्टन वनस्पती, शेवाळे गिळतात व उरलेले पाणी कल्ल्यांवाटे बाहेर टाकतात.
माशांचे खाद्य मुख्यतः मासेच. पण या खेरीज अनेक अन्य जलचरांची अंडी, अळ्या, शेवाळी या खाद्यांचीसुद्धा सर्व लहान माशांना गरज भासते. समुद्रातील प्रवाळांच्या खडकांमध्ये शिरून तेथील हे आयते खाद्य पटकावणे हा लहान माशांचा दिवसभरचा उद्योगच असतो. हे सर्व खडक ठराविक आकाराचे असल्याने त्यात शिरकाव करणे व बाहेर पडणे यासाठी ठराविक आकाराची जाडीच चालू शकते. पण याखेरीज काही अगडबंब मासे फारसे कष्ट न करता फक्त आ वासून वाटेत येणारे सर्व लहान मासे फस्त करत जातात. एखादा मध्यम आकाराचा शार्क दिवसभरात एखादा टन मासे सहज संपवतो. यावरून त्यांच्या भुकेची कल्पना येऊ शकेल.
मासे व पृथ्वीवरचे अन्य प्राणी यांच्या संवेदना इंद्रियांत फारसा फरक नाही. डोळे तर नेहमीप्रमाणेच काम करतात. कान दिसत नाहीत, पण अन्य प्राण्यांप्रमाणेच तोल सावरणे, ऐकणे या गोष्टींसाठी माशांचे कान उपयुक्त ठरतात. आणखी एका प्रकारे संवेदना जाणवतात. आपल्या कातडीला हात लावल्यावर जशा संवेदना मिळतील, तशाच संवेदना पाण्यातील तरंगांच्या हालचालीतून संपूर्ण लांबीमधील पृष्ठभागातून माशाला मिळतात. याचा वापर करूनच लांबवरचा शत्रू, भक्ष्य, पाण्यावरील अन्य जलचरांचा वावर याचे ज्ञान मासा मिळवत राहतो.
माशाचे आयुष्य किती ? मासे पाळले, तर सांगता येईल, अन्यथा अवघडच. पण मोठे मासे कित्येक म्हणजे पन्नासच्या वर वर्षे जगत असावे. लहान मासे मात्र जेमतेम वर्षभरातच आयुष्य संपवतात. याच काळात वाढ, अंडी घालणे वगैरे सर्व गोष्टी घडतात. पृथ्वीवरील सजीवांमध्ये आकारमान व आयुष्य यांची सांगड निसर्गाने घालून ठेवली आहे. मासे गोड्या पाण्यात असतात, समुद्रात, पाणथळीच्या जागी असतात, तसेच खोल डोहात, चिखलाच्या पाण्यात असतात, तसेच नितळ अशा सरोवरात. अत्यंत आकर्षक माशांप्रमाणेच अत्यंत बोजड विचित्र तोंडाचे माशांचे प्रकारही पाहायला मिळतात. जेमतेम चार ते पाच मिली ग्रॅम वजनाच्या छोटय़ा माशांपासून पस्तीस ते चाळीस टन वजनाच्या शार्क माशांपर्यंत माशांचे वजन आढळते.
मासे खाणे हा मानवी आहाराचा एक नित्याचा भाग आहे. किंबहुना याचा फायदा म्हणून पृथ्वीवर, जमिनीवर निर्माण होणाऱ्या अन्नात आपण बचत करू शकतो आहोत. अत्यंत पौष्टिक असा आहार माशांपासून मिळू शकतो. या सागरी संपत्तीचा पूर्ण विनियोग करणे माणसाला शक्यच होणार नाही, इतकी ती अफाट आहे. जगातील ज्ञात आकडे एकत्र केले, तर वर्षांकाठी दहा कोटी टन मासे समुद्रातून पकडले जातात. यात गोड्या पाण्यातील माशांचा समावेश नाही.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *'हिंदू ऑफ लाईफ' या पुस्तकाचे लेखक कोण ?*
        डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन

2)  *लोकलेखा समिती आपला अहवाल कोणास सादर करतो ?*
        लोकसभा सभापती

3)  *पंचायतराज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार कोणत्या दोन राज्यांनी केला ?*
        राजस्थान व आंध्रप्रदेश

4)  *दागिने तयार करण्यासाठी सोन्यात कोणते धातू मिसळतात ?*
        तांबे

5)  *जिल्हा परिषदेमध्ये सर्वसाधारणपणे किती समित्या असतात ?*
        10

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 पूजा बागुल, साहित्यिक, नाशिक

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*'आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.* 
*परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.*


   ••● 🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●••
            🔹🔹🔹🔹🔹🔹
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*मित्रांनो,*
*किती पुजला देव तरी*
*देव कुणाला पावला नाही,*
*कुठे राहतो कुणास ठाऊक*
*पण अजून कुणाला घावला नाही.*
*ही गाडगेबाबांनी कविता ऐकली होती,आणि देव कुठे असतो हे* *समजत नव्हते,पण काल सकाळी 7* *वाजताच आनंदवन* *ता.वरोरा,जि.चंद्रपूर या बाबा* *आमटे यांच्या गावात पोहचलो आणि* *देव काय असतो,कुठे वसतो, कसा दिसतो,काय करतो या सगळ्या* *प्रश्नांची उत्तरे देत येथील कुष्ठरोगी जनतेने त्यांच्या* *चालण्या,बोलण्या आणि वागण्यातून दाखवून दिले.या महामानवाच्या* *म्हणजेच मुरलीधर* *आमटे(बाबा)व साधना* *आमटे यांच्या समधीस्थळी* *आम्ही नतमस्तक झालो,कारण ही पती पत्नीची समाधी* *शेजारी आणि अद्वितीय आहे.*
*योग जुळून आला म्हणजे आज बाबांची जयंती ,आणि भारतीताईचा* *वाढदिवस साजरा* *करण्याचे भाग्य लाभले.*
*घरची प्रचंड श्रीमती, वतनदारी असूनही बाबांनी सेवा तत्वामुळे घर* *सोडले.1939 ला आनंदवनात* *एक झोपडी आणि रोग्यांच्या सेवेसाठी 2 झोपड्या* *एवढ्यावर सुरू केलेला प्रपंच आज सातासमुद्रापार मोठ्या दिमाखाने* *बाबांची महती सांगतोय.*
*मनाचे बळ इतके प्रचंड की* *कुष्ठरोग्यांच्या सेवेबरोबर बाबांनी ते जंतू शरीरात घालून जगाला मनाच्या* *ताकदिचा नवा संदेश दिला.*
*आज बाबा नाहीत पण बाबांच्या रूपाने भारतभर*  *दिनदलित ,अंध,अनाथ,कुष्ठरोग्यांच्या जीवनात एक देव अधिराज्य करतोय.*
*पुरस्कारांच्या राशी आजही बाबांच्या पायाशी लोळण घालत आहे.*
*बाबांच्या स्नुषा डॉ.भारतीताई विकास* *आमटे यांच्याशी तासभर दिलखुलास गप्पा मारल्या.मनातील* *सर्व प्रश्नांना आम्हीही मोकळी वाट करून दिली* *आणि साठी उलटलेल्या भारतीताईंनी तेव्हढ्याच प्रेमळपणे व* *भावनांच्या गोंगाटात कर्तव्य किती अनमोल असते हे मोठ्या खुबीने* *पटवून दिले.*
*स्वातंत्र्यसैनिकाने व एका खासदाराच्या घरात मोठी झालेली* *भारतीताई एव्हढा मोठा त्याग करू शकते हे त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे* *पाहून विश्वास न बसण्यासारखे होते.*
*ज्यांच्या जवळ कुणी फिरकत नव्हते,ज्यांना समाजाने नाकारले होते* *अशा कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात नवी पहाट दाखवणाऱ्या बाबांना शब्दात मांडणे माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे.* *बाबांना मानाचा मुजरा.*

*अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात.असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत.अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे.अशाठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी   कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे.ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो.या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत.हे कधीही विसरुन चालणार नाही.


*व्यंकटेश काटकर,नांदेड.*
  संवाद..९४२१८३९५९०/
            ८०८७९१७०६३.

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
         *यशाचे बिजगणित*

आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न?
'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, आजोबानी  टाइमपास म्हणून उत्तर दिले. 
'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली. 
आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!' 
'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली.
'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?' 
'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे. 
'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले. 
'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली. 
'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का? 
अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली.
'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते. 
'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्‍या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते. 
''खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे.
पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, 25 दिसंबर 2019

23 डिसेंबर 2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 23/12/2019 वार - सोमवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
          *राष्ट्रीय किसान दिन*

💥 ठळक घडामोडी :- 
 ●१६२० - विल्यम ब्रॅडफोर्ड आणि मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स प्लिमथ, मॅसेच्युसेट्स मध्ये प्लिमथ रॉक या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय.
 ●१९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत.
 ●१९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रँक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात.
 ●१९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.

💥 जन्म :-
●१९६३- गोविंदा,हिंदी चित्रपट अभिनेता
●१९५९-कृष्णम्मचारी श्रीकांत,भारतीय क्रिकेटपटू
 ●१९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती.
● १९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश
 
💥 मृत्यू :-
● १८२४ - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे जेम्स पार्किन्स
● १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती.
● १९६५ - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.
● २००४ - पी. व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *आंदोलनांद्वारे तुम्हाला CAA चा विरोध करायचाच असेल तर तुम्ही माझे पुतळे जाळून आंदोलन करा, पण हिंसाचार, शासकीय मालमत्तेची हानी तसेच गरिबांची वाहने जाळू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केले.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *विलेपार्ले स्टेशन परिसरातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल, इमारतीत काही लोक अडकल्याची शक्यता.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पोलिसांची गाडी पलटली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ओझर्डे गावातच हा अपघात झाला आहे. या गाडीत चार पोलीस कर्मचारी होते.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा, सप्टेंबर 2019 पर्यंतचं 2 लाखाचं कर्ज माफ, सरसकट कर्जमाफीची शेतकरी नेते, विरोधकांची मागणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *महाराष्ट्रात विभागनिहाय मुख्यमंत्री कार्यालय, 50 ठिकाणी 10 रुपयांत शिवभोजन तर पूर्व विदर्भात पोलाद प्रकल्प, मुख्यमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *जवळपास 26.7 कोटी फेसबुक युजर्सच्या डेटा ऑनलाइन लीक झाल्याची माहिती एका संशोधक कंपनीने दिली आहे. यात फेसबुक युजर्सच्या खासगी माहितीचा समावेश आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *कटक मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर चार विकेट्सने मात, मालिका 2-0 ने खिशात, विराट, रोहित, राहुलची अर्धशतकं*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
    *राष्ट्रीय किसान दिनानिमित्त*
*शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर .....!*

वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

https://nasayeotikar.blogspot.com/2016/02/blog-post_20.html?m=1

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये. "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *'भटनागर पुरस्कार' कोणत्या क्षेत्रात दिला जातो ?*
        विज्ञान

2)  *जिल्हा निधीतून पैसा काढण्याचा आणि त्याचे वितरण करण्याचा अधिकार कोणास आहे ?* 
          मुख्य कार्यकारी अधिकारी

3)  *शून्यधारीत अर्थसंकल्पाचे आद्यप्रवर्तक कोण ?*
        पीटर पिहर

4)  *रासायनिक द्रव्यांचे कारखाने महाराष्ट्रात कोठे आहेत ?*
        पनवेल व अंबरनाथ

5)  *पृथ्वी स्वतः भोवती फिरते हे प्रथम कोणत्या भारतीय खगोल शास्त्रज्ञाने सांगितले ?*
       आर्यभट्ट

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    
   
👤 सार्थक सुगंधे, धर्माबाद
👤 चिं. श्रीपाद हणमंलू शंकरोड, येवती
👤 प्रवीण गुंटोड
👤 ज्ञानेश्वर ताटीकुंडलवार
👤 राजू पाटील कुरुंदे

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*आपल्या मुखावाटे आपल्या शरीरात जे अन्न जाते, त्यावर आपण खूप नियंत्रण ठेवतो. आपण आपला आहार सदोदित संतुलित ठेवायचा प्रयत्न करतो. वैद्दकिय सल्ल्यानुसार आवश्यक ते पथ्य पाळतो. जेवायच्या आधी आपण दररोज स्वच्छ हात धुतो. शुद्ध पाणी पितो. वेळोवेळी आपण उपवास करतो. आपल्या तोंडातून जे काही आत जाते ते पोटात जाते आणि शेवटी ते शरीराबाहेर टाकले जाते. हे आपल्याला माहित असूनसुद्धा ही सगळी काळजी आपण घेतोच.*

*पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणा-या शब्दांची तशाच प्रकारची काळजी आपण घेत नाही. ज्या मुखातून आपण परमेश्वराचे गुणगान करतो, त्याच मुखातून आपण खुशाल अपशब्द उच्चारतो. ज्या झ-यातून केवळ निर्मळ पाणी झरले पाहिचे, तो झरा आपणच प्रदूषित करतो. आपल्या अमंगल वाणीने तो झरा आपणच विटाळून टाकतो.*
          
          ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
     🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
         📱 9167937040
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

 *मित्रांनो* 
 *काल दुपारी तीन वाजता पाटोदा,ता.गंगापूर, जि.औरंगाबाद* *येथे पोहचलो.नाव ऐकल्यानंतर तुम्ही पण ओळखलं असणार,पण प्रत्यक्ष अनुभव आणि अप्रत्यक्ष अनुभव यात फरक असतो म्हणून या गावाची प्रत्यक्ष पाहणी केली.* 
 *गावात प्रवेश करताच स्वागताचे फलक,पुरस्कार मिळालेले फलक,समोरच ग्रामपंचायत* *कार्यालय, ते ही स्वप्नातील इमारत आहे की काय अस वाटलं.* 
 *तिथे आशा कार्यकर्ती भाग्यश्री देवडे यांनी स्वागत केले,प्रथम कार्यालयात* *नेले.पाहून आश्चर्य वाटले,3350 लोकवस्तीच्या 7 वी* *शिकलेल्या सरपंच भास्करराव पेरे यांची व्हिडीओ क्लिप आणि प्रत्यक्ष करमत खरोखर वाखाणण्याजोगी* *आहे.* 
 *हा माणूस गावासाठी 24 तास काम करतो.प्रत्येक कर्मचारी प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक* *हजेरी थंब मशीनवर लावतो . गावात कुठे काय चालू आहे ,उदा.शाळेत काय* *चालत,अंगणवाडीत काय चालतय,धोबीघाट,मुख्य चौक,सभागृहात काय चालत ते* *ग्रामपंचायत मध्ये बसून समजते.संपुर्ण गावात प्लेव्हर ब्लॉक,मोफत वायफाय,मोफत शुद्ध* *पाणी,मोफत दळण, मोफत शेतीला पाणी,गरम पाणी,वापरायचे पाणी,प्रत्येक घरासमोर झाडे, त्यांना* *रोज पाणी.अशा  कितीतरी बारीक बारीक गोष्टींचं सूत्रबद्ध नियोजन बघून* 
 *खूप भारावून गेलो.आणि एव्हढी सगळी किमया बघून पैसा आणि पारितोषिक त्यांच्या पर्यंत धावून* *येतात. एक मोठं दालन पुरस्काराने भरलेले. हे सगळं बघून पी एच डी झालेले लोक अस काही का करत* *नाहीत किंवा अनेक पुढारी यांना का अस वाटत नाही की माझा गाव,माझा माणूस,माझा देश* *असा व्हावा.फक्त एकच काम या माणसाने केलं ते म्हणजे निष्काम कर्मयोग,24 तास जनसेवा,* *गावासाठी काहीही करायची तयारी.* 
 *तिथेच त्यांनी सर्वांना चहा दिला ,आणि एक अविस्मरणीय अनुभव घेऊन तेथून विचारांच्या* *मनोयुध्दात निघालो.* 
 *जर प्रत्येक भारतीयांच्या मनात आणि मनगटात हे पेरे नावाचं भूत शिरलं* *तर भारत महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही.* 

 *अशोक कुमावत* 
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
एखाद्याच्या जीवनाचा जीवनसंघर्ष म्हणजे एक चित्रपटच असतो.त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग सुखदु:खाच्या खाचखळग्यांनी ओतप्रोत भरलेले असते.तरीही ते डगमगत नाहीत. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन जीवन जगण्याचे खरे ध्येय ते गाठतातच.परिस्थिती कशीही असो त्याला हाताळण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी ठायी वसलेले असते.म्हणूनच त्यांच्या आदर्शाचा परिपाठ आपण आपल्या जीवनात अनुसरायला हवा.तरच आपल्याला जीवन जगण्याची चांगली प्रेरणा मिळेल.

*व्यंकटेश काटकर,नांदेड.*
  संवाद..९४२१८३९५९०/
            ८०८७९१७०६३.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
              *सिंहाचा जावई*

एकदा एक सिंह जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे सिंह उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, "तुला हवं ते मागं. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.' सिंहाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, "महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?' यावर सिंह म्हणाला, "अरे नाही रे, मी राजा आहे आणि राजा आपले वचन कधीच मोडत नाही. माग तुला काय हवे ते'. यावर उंदीर म्हणाला, "मला तुमचा जावई करून घ्या.' सिंहाने ते मान्य केले. त्याप्रमाणे सिंहाने आपल्या मुलीशी उंदराचे लग्न लावून दिले. सर्व विधी झाले. पण सप्तपदीच्या वेळी नवरीच्या पायाखाली नवरदेव सापडले व चिरडून ठार झाले.
तात्पर्यः
*आपल्या कुवती बाहेरच्या एखाद्या गोष्टीची हाव धरलीतर स्वत:चाच नाश ओढवतो.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
           *राष्ट्रीय किसान दिन*

किसान दिन हा दरवर्षी भारतात २३ डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा हा जन्मदिवस संपूर्ण भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेती संबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

24 डिसेंबर 2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 24/12/2019 वार - मंगळवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
           
*भारतीय ग्राहक दिन*
 
💥 ठळक घडामोडी :-
● १२९४ - पोप सेलेस्टीन पाचव्याने राजीनामा दिल्यावर पोप बॉनिफेस आठवा सत्तेवर.
● १७७७ - जेम्स कूकला किरितिमाती तथा क्रिसमस द्वीप पहिल्यांदा दिसले.
● १८५१ - लायब्ररी ऑफ काँग्रेसला आग.
● १८६५ - अमेरिकेच्या दक्षिणेतील सेनापतींनी कु क्लुक्स क्लॅन या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली.
● १९२४ - आल्बेनिया प्रजासत्ताक झाले.

 
💥 जन्म :-
● १८९९ - पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी, मराठी लेखक.
● १९२५ - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक.
● १९५९ - अनिल कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता.
 
💥 मृत्यू :-
● १८७३ - जॉन्स हॉपकिन्स, अमेरिकन उद्योगपती व दानशूर.
● १९१४ - जॉन मुइर, अमेरिकन निसर्गसंवर्धक.
● १८६३ - एम.जी. रामचन्द्रन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते, 'पाणी'साठी आदिनाथ कोठारेचाही गौरव*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर, 27 किंवा 30 डिसेंबरचा नवा मुहूर्त*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यार असून देशात २२ हजार गावात ग्रामीण कृषी मार्केटच जाळ उभारणार असल्याची माहिती केंद्राच्या शेतकरी उत्पन्न दुप्पट करणे अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ अशोक दलवाई यांनी दिली आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *भाजपला धोक्याची घंटा, एका वर्षात गमावली पाच राज्यातील सत्ता, काँग्रेस-जेएमएमचं सरकार निश्चित ,काँग्रेस, जेएमएम आणि राजद आघाडीला 42 जागांवर आघाडी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंवर पुणे जिल्हाबंदी, कोरेगाव-भीमा इथं होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, 160 जणांनाही नोटीस*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *27 आणि 28 डिसेंबरला कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, दहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम, नाताळ आणि नववर्षानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फटका*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सलामीवीर शिखर धवनचं संघात पुनरागमन तर रोहित शर्मा आणि गोलंदाज मोहम्मद शमीला विश्रांती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
 *साने गुरुजी जयंतीनिमित्त प्रासंगिक लेख*

*मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजी*

पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण सर्वजण साने गुरुजी या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. सदाशिवराव व यशोदाबाई यांच्या पोटी जन्मलेला दुसरा मुलगा असून तिसरे अपत्य म्हणजे साने गुरुजी. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांचे वडील सारा गोळा करण्याचे काम करीत होते. साने गुरुजी यांची आई त्यांना श्याम या नावाने प्रेमाने ........

वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_23.html
            
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                  *मोहम्मद रफी*

मोहम्मद रफी हिंदी सिनेमातील महान प्लेबॅक गायक होता.नाटकांच्या आवाजाचा आणि त्यांच्या आवाजाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी आपल्या समकालीन गायिकांबरोबर ओळखले. त्यांना शायनशाह-ए-तारानुम असेही म्हटले जाते. मोहम्मद रफीच्या आवाजात त्यांच्या आगामी काळात अनेक गायकांनी प्रेरित केले. हे सोनू निगम , मोहम्मद अजीज आणिउदित नारायण च्या नाव आहे - या आता अनेक त्याच्या स्वत: च्या ओळख आहे तरी. 1 9 40 ते 1 980 पर्यंत सुरूत्याने एकूण 26,000 गाणी गायली. [2]मुख्य प्रवाहात हिंदी अतिरिक्त गीते गझल , भजने , देशभक्तीपर गीत, कव्वाली समावेश आणि इतर भाषांमध्ये गाणे गायली. कलाकार त्यांच्या संगीत चित्रित आहेत कोठे गुरु दत्त , दिलीप कुमार , देव आनंद , भारत भूषण , Johnnie वॉकर , जॉय मुखर्जी , शम्मी कपूर , राजेंद्र कुमार , राजेश खन्ना ,अमिताभ बच्चन ,  धर्मेंद्र ,  जितेंद्र  आणि  ऋषी कपूर ते गायक अभिनेता व्यतिरिक्त किशोर कुमारदेखील नाव समाविष्ट आहे.

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *'शेती' हा विषय कोणत्या सुचीमध्ये समाविष्ट आहे ?*
       राज्यसूची

2)  *समुद्राची खोली कोणत्या परिमाणात मोजतात ?*
       फॅदम

3)  *नाताळ' केव्हा साजरा केला जातो ?*
       25 डिसेंबर

4)  *'पुरुज्जीवन राष्ट्रवाद' या संकल्पनाचे जनक कोण ?*
       योगी अरविंद घोष

5)  *स्निग्ध पदार्थाच्या पचनास कोणत्या रसाची आवश्यकता असते ?*
         पित्त

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    
   
👤 निर्मला बोधरे, सहशिक्षिका, पुणे
👤 विठ्ठल मुजळगे, सहशिक्षक, धर्माबाद
👤 रणजित बाळासाहेब गुंजाळ, पत्रकार,

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.*

*संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.*
         *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...?* *आहे....?...की.....?"*
            
   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
         *श्री. संजय नलावडे, मुंबई*
        *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

 *सज्जनहो,* 
 *पी* *.एच. डी.करून  किती* *अभ्यासकांनी जीवन आनंदी व* *कितीचं  सुखकर  झालं माहीत नाही,.* 
 *पण जे कधी शाळेत गेले नाहीत* *त्यांचा अभ्यास पी.एच. डी.करणारे* *करतात हे मात्र  सत्य आणि वास्तव आहे.* 
 *त्याच मुळही तसेच आहे,या लोकांनी* *माणस वाचली,पाहिली,* *लिहिली,अभ्यासली आणि* *माणसाच्याच गराड्यात ही लोक* *राहिली.* 
 *संत ज्ञानेश्वर, रवींद्रनाथ टागोर,* *बहिणाबाई चौधरी यांनी कधी शाळेच* *तोंड पाहिले नव्हते पण* *आज पी.एच. डी. करणारे या महान* *व्यक्तीचा अभ्यास करतात.* 
 *तर मग एकच ठरवा मला माणसात* *रहायच , माझा आनंद* *माणूस आहे, माझं जीवन* *माणूस आहे,मी फ्लॅट मध्ये* *ब्लॉक होणार नाही,आणि* *ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार* *नाही.माणसात राहून माणूस बनेल.* 
 *माणसालाच सुखी करेल व सुखी* *राहील.* 
 
*अशोक कुमावत* 
( *राष्ट्रपती पुरस्कार  विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

ईश्वरावर श्रध्दा असणे काही चुकीचे नाही,पण ईश्वरच जे काही करेल ते मी स्वीकारेन असे म्हणून त्याच्यावर विसंबून राहणे मात्र चुकीचे ठरेल.ईश्वर ही आपल्यासाठी एक अप्रतक्ष प्रेरणा आहे.जेव्हा तुम्ही तुमच्या प्रयत्नाने आणि जिद्दीने प्रामाणिकपणे काम करता ते काम नक्कीच यशाकडे घेऊन जाते.त्या तुम्ही करत असलेल्या कामामध्ये ईश्र्वर नक्कीच प्रेरणा देतो.केवळ काम न करता मला माझ्या कामात नि जीवनात यश मिळू दे असं म्हणत असाल तर तो तुमचा विचार तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाणाराच ठरेल.म्हणून प्रथम आपल्या कामाचा प्रारंभ प्रसन्न मनाने आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करायला सज्ज राहिलातकी,मग तुम्हीच तुमच्या मनातून ईश्र्वराचे आभार मानायला विसरणार नाहीत हे मात्र खरेच आहे.

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
           *मातृभक्त लक्ष्मणदेव*

एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव. आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई. एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईचा ताप उतरेना. खांण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे. एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली. 'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस' लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली. गार वार्‍याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली. तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई म्हणाली 'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ? वेडया अरे मला उठवायचे नाही कां ? लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला, 'आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'. तिने त्याला पोटाशी धरले. तिच्या डोळयातले अश्रू त्याच्या मानेवर ओघळत होते.

*तात्पर्यः आईवडीलाची सेवा करणे हीच खरी पुण्याई आहे.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

26 डिसेंबर 2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 26/12/2019 वार - गुरूवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :- 
● २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.
● १९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.
● १९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार.

💥 जन्म :-
● १८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग 
● १९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे
१९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर 
● १९१७ - प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक.
● १९३५ - डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी)
● १९४८: डॉ. प्रकाश आमटे

💥 मृत्यू :- 
● १९७२ - हॅरी ट्रुमन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
● १९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा
● २०११ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *फडणवीसांच्या काळातच अजित पवारांना क्लीन चीट, सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीचे महासंचालक परमवीर सिंह यांचं हायकोर्टात शपथपत्र*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *मंत्रिमंडळ विस्तारात गृहखातं शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटलांमध्ये शर्यत*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *शालेय सहल घेऊन जाणाऱ्या ST बसला भीषण अपघात, 18 जण गंभीर जखमी, मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव एसटीची ट्रॉलीला धडक, जखमींना पवना रुग्णालयात उपचारासाठी दाखल*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *मुंबई : राज्यात थंडीचा जोर वाढत असतानाच पुढील दोन दिवसात महाराष्ट्रात काही भागांत पावसाची शक्यता, महाराष्ट्रात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत हलक्या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन, वसई, मुंबईत चर्चेसना रोषणाई, तर सुट्टीनिमित्त पंढरपूर, महाबळेश्वर आणि शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *नियम मोडणाऱ्या, कचरा करणाऱ्या मुंबईकरांवर 10 हजार कॅमेरांची नजर, बीएमसीकडून 'व्हिडीओ अॅनालिटिक्स टूल' तंत्राचा वापर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *राज्य सरकारकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत कपात, आदित्य ठाकरेंना मात्र 'Z' श्रेणी सुरक्षा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*विशेष बातमी :- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा उत्साहाच्या वातावरणात संपन्न*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
          *ग्रहण म्हणजे काय ?*

    २६ डिसेंबर २०१९, रोजी होणार सूर्य  ग्रहण  कंकणाकृती अथवा  खंडग्रास   दिसणार आहे, तुम्ही सर्वानी ते नक्की पाहावं. मुंबई मध्ये हे ग्रहण  खंडग्रास दिसणार असून  भारतीय प्रमाण वेळेनुसार  सकाळी ८. ०४ मिनिटांनी सुरु होईल, पुढे ९. २१  मिनिटांवर अधिकाधिक ७८. टक्के सूर्याला झाकेल, ११.५५ मिनिटांवर ग्रहण पूर्णतः संपेल. 

ग्रहणा विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://fmbuletin2019.blogspot.com/2019/12/blog-post.html         

~~~~~~~~~~~~~~~~~~~
*✍ स्तंभलेखक नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      💉 *लस म्हणजे काय ?* 💉

*अनेकदा लस लसीकरण वा व्हॅक्सीनेशन हे शब्द आपण वाचतो. टीव्हीवर याच्या जाहिरातीही पाहत असतो. पण लस म्हणजे नक्की काय या विषयी शास्त्रीय माहिती आपल्याला नसते.*
*बर्‍याचदा आपण बघतो की उन्हात जर एखादा दिवस खूप फिरलो तर लगेच डोकेदुखी, अंगदुखी, इत्यादींचा त्रास होतो. आपण त्याला ऊन बाधले असे म्हणतो. पण जर रोज उन्हात जायला लागलो तर मात्र उन्हाचा तेवढा त्रास होत नाही. नेहमी घरचेच वॉटरबॅगचे पाणी पिणारा मुलगा बाहेरचे पाणी प्यायला तर त्याच्या पोटात दुखते, संडास लागते. शरीराला एखाद्या गोष्टीची सवय झाली तर नंतर त्रास होत नाही, असे साध्या भाषेत म्हणता येईल. पण शरीराला जीवजंतूंची सवय होते का ? सवय म्हणण्यापेक्षा जीवजंतूंचा अनुभव येतो असे म्हणता येईल. एकदा अनुभव पाठीशी असला म्हणजे शरीर दुसऱ्यांदा त्या जीवजंतूंशी चांगला लढा देऊ शकते. एकदा गोवर झाल्यावर सहसा परत होत नाही, ते याचमुळे. हे का होते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.*
*शरीरात रोगप्रतिकार शक्ती दोन प्रकारे निर्माण होते. जंतू शरीरात शिरल्यानंतर त्यांच्यातील प्रथिन वा कर्बोदक घटकांसाठी शरीरात प्रतिकार करणारी द्रव्ये (अँटीबॉडीज) तयार होतात किंवा जंतूंना मारण्यासाठी पेशींचे प्रशिक्षण होते. या दोन्ही मार्गांनी जीवजंतू पुढच्यावेळी आले तर त्यांना मारून टाकता येते. पण प्रत्येक वेळी आधी जीवजंतूंचा शरीरात प्रवेश करून घेऊन रोगाला सामोरे जाणे परवडण्याजोगे नसते. यासाठी शास्त्रज्ञ जंतूंना अर्धमृत (Attenuate) करतात वा पूर्णपणे मारतात. असे अर्धमृत वा मृत जंतू शरीरात गेल्यावर रोग निर्माण करू शकत नाहीत. पण त्यांच्याविरुद्ध प्रतिकार करणारी द्रव्ये आणि प्रशिक्षित पेशी तयार होतात. लसी अशाच अर्धमृत वा मृत जंतू किंवा त्यांच्यातील घटकांपासून बनवलेल्या असतात. लस देण्याच्या क्रियेला लसीकरण म्हणतात. ५००० वर्षांपूर्वी चिनी लोक देवी रोग होऊ नये म्हणून लसीकरण करत. अशी वैद्यक इतिहासात नोंद आहे. पहिले शास्त्रोक्त लसीकरण करण्याचा मान एडवर्ड जेन्नरकडे जातो. त्याने १७९६ मध्ये देवी रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केले.*
*आज आपल्याकडे क्षयरोग, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, कॉलरा, रेबीज, विषमज्वर, कावीळ तसेच गालफुगी अत्याधिक रोगांवरील प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. लसीकरणामुळे बऱ्याच गंभीर रोगांचा प्रतिबंध आपण करू शकलो आहोत.*

*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *रक्तातील तांबड्या पेशींची निर्मिती शरीरात कोठे होते ?*
        अस्थीमज्जा

2)  *ऍनिमिया हा आजार कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो ?*
        लोह

3)  *लिलीचे फुल हे कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे ?*
        फ्रान्स

4)  *डॉ विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र कोठे आहे ?*
        थूम्ब

5)  *भारताच्या कोणत्या सरन्यायाधीशानी राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला होता ?*
         एम. हिदाय तुला

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    
   
👤 नरसिंग जिड्डेवार, भोकर
👤 आकाश सरकलवाड, धर्माबाद
👤 कपिल जोंधळे
👤 अशोक लंघे

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*मानवाचं मन... अनेक प्रकारचे सुखदु:खात्म प्रसंग, विवंचना, काळजा, आसूया, स्पर्धा, द्वेष, मत्सर, उत्सुकता आणि कुतूहल...यांनी सदैव त्याचे मन 'पिसाट' झालेले. अप्राप्याचा ध्यास म्हणजे आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा अथक प्रयत्न आपण सारे करीत असतो; पण 'मन:शांती' चा शोध घ्यायला नेमके विसरतो. 'मन:शांती' हे महत्वाचे जीवनसूत्र आहे, हेच आपण या सा-या धबडक्यात हरवून जातो. 'निरंजनी आम्ही बांधियेले घर' असे संतवचन आहे. ही निरांजनावस्था महत्वाची. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काही करावे लागते. यातून त्याची सुटका नाही. मनाची सर्वार्थाने मुक्तता तशी कठीणच. कारण वैयक्तिक भावभावना, विकार-विचार आणि अहंकार यापासून स्वत:ला अलग करणे जवळजवळ अशक्यप्राय.* 

*पाण्यात पडले म्हटले की कोणीही ओलाचिंब होणारच. मात्र एखादा खडक त्या जलाशयात असेल तर तो पाण्यात राहून अलिप्तच की ! अशी अलगता संसारात राहून साधायची, म्हणजे शरीरक्रिया चालू आहे पण मन मात्र अलिप्त आहे. त्याच्या पृष्ठभागावर कोणत्याच लहरी नाहीत, तरंग नाहीत. मनाच्या समधात अवस्थेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी 'नुरोनिया ठेला' असे केले आहे. म्हणजे बाह्यस्वरूपी तो इतका निश्चल की जिवंत आहे का, हा इतरांना प्रश्न पडावा, आणि तो जिवंत असला तरी जणूकाही जिवंत नाही, असे वाटावे असा... त्याच्या मनाच्या या अवस्थेला 'सहजस्थिती किंवा 'निजस्थिती' असेही त्यांनी म्हटले आहे. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...' नामापरते सुख नाही रे सर्वथा !' हाच तो सद्रगुरूपदेश...*

   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
    🚩‼🚩‼🚩‼🚩‼🚩
        *--संजय नलावडे, मुंबई*
     *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

 *मित्रांनो,* 
 *काल आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव घेतला.* 
 *अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा, चंद्रपूर येथे 12 वाजता पोहचलो.जातांना* *200 की मी पूर्ण जंगलातून सफर अगोदरच भामरागडची करून आलो.आणि आता* *12 ते सायंकाळी  8 वाजेपर्यंत ताडोबात चित्तथरारक* *अनुभव घेतला. माहिती घेतली आणि* *2 वाजेपासून 6.30 वाजेपर्यंत जंगल सफारी केली.किर्रर्र* *झाडी,निर्मनुष्य जंगल,भयाण शांतता.जितेंद्र आणि* *सचिन असे 2 सफारी गाईड गाडी चालवणाऱ्याची कमाल म्हणावी* *लागेल,झाडाझुडुपांमध्ये गाडी चालतांना जीव मुठीत धरून सगळे* *शांत बसले होते.* 
 *या प्रकल्पात जनगणना  नुसार 96 वाघ ,लेफर्ड आहेत. जंगल 1100 चौ* *की मी ,600 कोअर जंगल,या मोसमात प्राणी जास्त बाहेर येत नाही,त्यांचा एकत्र राहण्यासाठी* *चा हा  काळ असतो,प्रेग्नन्ट एरिया अस म्हणतात त्याला. 3 महिने बांधलेला* *असतो,उन्हाळ्यात पाण्यासाठी वाघ दुपारी जास्त बाहेर* *पडतात,उन्हल्यात स्थलांतरित होतात म्हणून जास्त* *दिसतात,जंगलात लोकवस्ती अगदी तुरळक आहे,कर्मचारी वर्ग जादाकरुन* *येथे राहतात. उंचावर त्यांच्या 2 ठिकाणी कुटी आहेत.सिंह* *आणि हत्ती सोडून जंगलात सर्व प्रकारचे प्राणी आहे,* *फिरण्याचा एरिया टोटल 42 की मी आहे ,4 तास फिरण्यासाठी मुभा* *दिली होती.* 
 *कुणबी तेली माळी समाज या जंगलात पूर्वीपासून राहतात,सुधीर मुनगंटीवार यांची शेती जंगलात* *आहे,आत जंगलात गाव नाही,चिमूर पर्यंत परिसर आहे,आत प्राण्यांसाठी* *18* *ठिकाणी सोलर बोअरवेल बसवलेले आहे* *प्राणी इथे पाणी पिण्यासाठी येतात.* 
 *वाघ समोर दिसला तरी ऍटॅक करत नाही, त्यांना त्रास दिला तरच प्राणी* *हल्ला करतात.* 
: *पर्यटक नियमित चालू असतात,मोहाची फुले वेचने, पर्यटक* *त्यांची सेवा,एवढाच या लोकांचा व्यवसाय ,पण अगदी आनंदी* *आणि काटक,शिक्षणा साठी मूल चंद्रपूर येथे पाठवतात, गाईड* *एम.ए.झालेला,पण रोजगार नाही म्हणून काम करतात. सचिन* *गाऊत्रे, माळी समाजाचा सुशिक्षित मुलगा,मुली मिळताना अडचणी येतात,नोकरीच्या शोधात भरपूर फिरलो पण नोकरी नाही,शेवटी स्थानिक व्यवसाय करतो.* 
 *बुध्दापौर्णिमेल प्राणी पाणी पिण्यासाठी तळ्यावर येतात,तेव्हा* *रात्रभर येथे पर्यटक आधीपासूनच बुकिंग करून ठेवतात.* 
 *2 कुटी वर आधिकारी असतात.* 
 *मोहूर्ली गेट ,मामला गेट, असे दोन गेट आहेत.आजच्या सफरीत आम्ही* *अगदी नशीबवान ठरलो,कारण* *अस्वल,लांडगे,गवे,मोर,रानमांजर ,कोल्हे सोडून कुणालाही वाघ दिसले* *नाहीत,मात्र आम्हाला घनदाट जंगलात गाडी चिखलात गेल्याने सर्वांच्या हृदयाचे ठोके चुकले.कुणी गाडी सोडून खाली उतरायला तयार नव्हते,शेवटी एकमेकांच्या आधाराचे धाडस करून गाडी चिखलातून उचलून,काही लोटून बाहेर काढली.आयुष्यातील सर्वात खतरनाक शॉट अनुभवल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.पुढे गेल्यावर काही अवधीतच लांबलचक* *तब्बेतशीर चित्ता, आणि बिबट्या यांचे जवळून* *दर्शन झाले.सगळा ताण तिथेच विसरलो.प्राणी कितीतरी वेळ ते जंगलात घाबरून पळत गेले,तो* *पर्यंत आम्ही त्यांना नेहाळत बघत होतो.आयुष्यातील एक* *अनमोल क्षण ताडोबात घातला.* 

 *अशोक कुमावत* 
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

संकल्प असतात तरी काय ? हे कळायला खूप अवघड आहे.नवे वर्ष लागले की,लोकांचे कितीतरी संकल्प करताना सुरुवातीला जाहीर करतात आणि काही दिवस गेले की,कोणते संकल्प केले हेही विसरुन जातात.वर्ष संपत आले की,मग पुन्हा संकल्प करणार याचे नियोजन करतात.पण हे जे काही संकल्प करणारे आहेत ना ते सगळे जगाला बनवायला काही कमी नाहीत.उगीचच आम्ही काहीतरी करत असल्याचा भास लोकांना भासवितात पण प्रत्यक्षात काहीच करत नाही.अशा बनवना-या लोकांपासून सावध रहायला हवे.यांच्या ओठांवर एक आणि प्रत्यक्षात करायचे एक..! 
संकल्प केल्याने पूर्ण होत नाही किंवा सांगितल्याने पूर्ण करावेत असेही नाही.तर नेहमीच चांगले काम करण्यासाठी संकल्प करणा-याला येणारा प्रत्येक दिवस हा चांगला च असतो.तो कधीही सांगत सुटत नाही.मनामध्ये दृढ विश्वास असला आणि चांगले काम करण्याची प्रबळ इच्छा झाली की,तो निश्चितच स्वत:साठी व इतरांसाठी कल्याणकारी संकल्प करतोच.त्याला नवीन वर्षाची किंवा नवीन दिवसाच्या मुहर्ताची काहीच गरज नाही.संकल्प असे करावे की,आपले हित कमी व इतरांचे जास्त असायला हवे.त्यातून काहीतरी नवीन शिकले पाहिजे.ज्यामुळे स्वत:ला मानसिक समाधान आणि इतरांना काहीतरी वाममार्गाला लागलेल्यापासून दूर करण्यासाठी आपण काहीतरी केल्याचा आनंद निर्माण होईल असा काहीतरी उद्देश आपल्यासमोर ठेवून केलेले एखादे कार्य म्हणजेच माझ्यामते खरा संकल्प होईल अन्यथा संकल्पच्या ठिकाणी संकल्पनाच एक वल्गनाच होईल.मग तुम्हीच संकल्पाची संकल्पना कशी निर्माण करायची ते ठरवावी.चांगल्या संकल्पाला मुळीच काळ, वेळ आणि वर्ष याची काहीच गरज नाही.

© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🌞🌜🌞🌜🌞🌜🌞🌜🌞🌜
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
               *वडिलांना मदत*

भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.
ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.
तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.
आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली. 

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~