शनिवार, 4 मार्च 2023

31/12/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक 31/12/2022 
💠 वार - शनिवार
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷 🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       *वर्षातील शेवटचा दिवस*
💥 ठळक घडामोडी :- 
● १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना.

💥 जन्म :-
● १८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव
● १९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर
● १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला
● १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान
● १९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स 

💥 मृत्यू :- 
● १९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे
● १९९७: स्वरराज छोटा गंधर्व

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक संकेतस्थळावर केलं जाहीर बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात सुरू होणार आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *नव वर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *हिवाळी अधिवेशनाचा समारोप, पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 पासून मुंबईत*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *केंद्राकडून नव वर्षाचं गिफ्ट, NSC, KVC सह पोस्टातील ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनाच्या व्याजात वाढ, सुकन्या समृद्धी योजना आणि PPF मात्र जैसे थे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21मार्च आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अहमदाबादमध्ये अंत्यसंस्कार, पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी दिला मुखाग्नी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन, फुटबॉल जगतावर शोककळा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*गोष्टींचा शनिवार-शोध चार मूर्खांचा👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/KKsc86pLWPU
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
 *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा*

अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू .........


वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html      

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       📙 *मुरमान्स्कचे बंदर* 📙

जगातील सर्वात उत्तरेकडचे बंदर म्हणजे मुरमान्स्कचे बंदर. रशियाच्या उत्तरेकडच्या भागातील बव्हंशी भाग कायमचा गोठलेला असतो. विशेषत: हिवाळ्यात तर विचारायलाच नको. बॅरेंट्स समुद्रातील कोला खाडीजवळील एक भाग मात्र तेथील समुद्रप्रवाहामुळे बाराही महिने गोठतच नाही. संपूर्ण उत्तरेकडील समुद्राचे निरीक्षण करताना हा न गोठणारा बिंदू शोधून काढला तो दुसर्‍या निकोलस झारने. १९१६ साली बंदराची जागा नक्की केली जाऊन बंदर उभारणीसाठी तंत्रज्ञ तेथे पाठवले गेले. या शेवटच्या झारला भूगोल व विज्ञान दोन्हींची विलक्षण जाण होती. देशाला बारमाही बंदर हवेच, या कल्पनेने त्याला पूर्ण झपाटले होते. त्यातूनच या बंदराची उभारणी त्याने सुरू केली. मात्र बंदर पूर्ण होण्यापूर्वीच त्याची सत्ता जाऊन क्रूर हत्या झाली.
१९१६ साली बंदरबांधणी झाली. त्या वेळी जेमतेम लाकडी घरातून उभारले गेलेले छोटेसे गाव आज आता मोठे शहर झाले आहे. सहा लाख वस्तीचे परिपूर्ण नांदते, रसरसते शहर ही सुद्धा या टोकाच्या हवामानातील एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणावी लागेल.
झारची सत्ता गेली, तरी बंदर मोठ्या चिकाटीने उभे राहिले. ६९ अंश उत्तर अक्षांश व ३३ अंश पुर्व रेखांशांवर हे बंदर उभे आहे. आसपासचे वातावरण बहुधा वर्षभर शून्याच्या आसपास असते. रात्रीच्या वेळी उणे पंधरा ते उणे तीस सेंटिग्रेड यादरम्यान ते खाली जाते. आर्क्टिक प्रदेशातील झोंबरे वारे सतत वाहत असतातच.
नोव्हेंबर महिन्यात इथला सूर्य शेवटचा मावळतो, तो एकदम संक्रांतीनंतरच उगवतो. प्रत्यक्ष बंदराच्या आसपास समुद्र जरी गोठत नसला तरी थोडा लांबचा टप्पा क्वचित गोठू लागतो. बंदरातील हिमफोड्या नौका ताबडतोब त्या दिशेने जाऊन रस्ते मोकळे करून देतात.
अन्नधान्य, इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बाहेरून आणावा लागतो. पण मुरमान्स्क येथे दोन गोष्टींची उणीव नाही. खनिज तेल व मासे यांची प्रचंड साठवण व निर्यात या बंदरातून जगभर होते. सैबेरियन भागातून तेलाच्या विहिरीतून काढलेले तेल पाइपातून येथे आणून मग ते ठिकठिकाणी पाठवले जाते. या बंदराची भरभराट याच कारणामुळे होत गेली आहे.
दोन्ही महायुद्धांमध्ये रशियाची रसद व नाविक हालचालींची ताकद मुरमान्स्क बंदरातच एकवटली होती. तिथपर्यंत पोहचायची सवय व या हवामानाला तोंड देण्याची ताकद फक्त रशियन नौदलातील नावीकांना होती. रशियाची पश्चिम बाजू जर्मनांनी व्यापली असल्याने या बंदरातून सर्व आवश्यक तो पुरवठा केला गेला व रशिया महायुद्धातून सुखरूप बाहेर येऊ शकला.
आज भौगलिक उपयुक्ततेनुसार मुरमान्स्कचे स्थान अढळ बनले आहे, ते युरोपकडून जपानकडे वा जपानकडून युरोपकडे होणाऱ्या मोठ्या जलवाहतुकीमुळे. या वाहतुकीला मार्ग दोन. दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून. मध्यंतरी अनेक वर्षे सुवेझचा कालवा बंद होता, तेव्हा ही वाहतूक उत्तरेकडून वळवली गेली होती. आजही जेव्हा जेव्हा मध्य आशियात अस्वस्थपणा येतो, तेव्हा हाच रस्ता वापरला जातो. त्या प्रत्येक वेळी रसदीसाठी, मधल्या मुक्कामासाठी, दुरुस्तीसाठी मुरमान्स्कचा थांबा अटळ राहतो.
दोन्ही ध्रुवांवर मानवाने पाय रोवला असला तरी जवळपास तितक्याच दुर्गम हवामानात पाय रोवून बारमाही व्यावहारिक जीवन जगायचे म्हणजे मुरुमान्स्कमध्ये काम करायचे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••

अडचणी येतात आणि जातात. फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात.
~ वपु काळे | पार्टनर

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) 'नगर जिल्ह्याची पर्यटन पंढरी' म्हणून कोणत्या परिसराला ओळखले जाते ?
२) आयपीएल २०२३ साठी पंजाब किंग्सने सॅम करनला किती बोली लावून खरेदी केले ?
३) द्रव आणि स्थायु यांचे मिश्रण कोणत्या नावाने ओळखले जाते ?
४) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे ?
५) वाळवंटामधील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात ?

*उत्तरे :-* १) भंडारदरा परिसर   २) १८.५० कोटी   ३) जेली   ४) नार्वे भुयार / सुरूंग   ५) ओॲसिस 

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
👤 अनिल पावसकर, लेखक
👤 रामचंद्ररेड्डी सामोड, येताळा
👤 ताहेर पठाण, धर्माबाद
👤 किरण अबुलकोड, समराळा
👤 अमोल बुरुंगुले
👤 शशांक पुलकंठवार
👤 सचिन चव्हाण
👤 करण यादव
👤 मारोती बोलेवाड

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••

*आपल्याला कोणी विचारले, कसे आहात, की आपले उत्तर असते "ठिक आहे, बरं चालले आहे" पण, झकास चालले आहे, मजेत आहोत." असे म्हणणारे कमीच असतात. परंतु शेजा-याचे, परिचिताचे कसे काय  चालले आहे, असे विचारले तर मात्र आपले उत्तर बदलते. अर्थात तेही शेजारी किती सख्खे आहेत, परिचित किती जवळचे आहेत वगैरेवर अवलंबून असते. "ते एकदम मजेत आहेत. त्यांना काय धाड भरली आहे." वगैरे उत्तरे आपण देतो. आपल्याबद्दल बोलताना असणारी सावधगिरी इतरांच्या बाबतीत फारशी नसते.*

*अर्थात हेही सारे सगळ्यांच्याच बाबतीत खरे असते असे नाही. स्वत:बद्दल गैरसमज असणारी मंडळीही असतात. आपण खूप विद्वान आहोत, खूप यशस्वी आहोत, खूप सुखी आहोत, असे मानणारे लोकही असतात. 'सुख' म्हणजे काय ? एक कल्पना? मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे, असे म्हटले जाते. पण सुखाच्या कल्पनेमागे धावणा-या माणसाला पाहून ते खरे वाटत नाही. समर्थ रामदास म्हणतात--*
  *"जगी सर्व सुखी असा कोण आहे.*
   *विचारी मना तूचि शोधूनी पाहे."*

            *॥ रामकृष्णहरी ॥*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
       *संजय नलावडे, मुंबई*
      *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••

     ज्याप्रमाणे प्रत्येक वस्त्रामध्ये आडवा आणि उभा तागा एकमेकांच्या साथीने मिळून घेतलेला असतो तेव्हा ते वस्त्र किंवा कापड तयार होते.त्याचप्रमाणे संसारातही पती-पत्नी आपल्या संसाररुपी वस्त्राला नेहमी जपत असतात.कुठे जरी फाटले तरी त्या संसाररुपी वस्त्राला आपल्या विचाररुपी सुईने आणि समजदारीच्या दो-याने सतत त्या संसाररुपी वस्त्राला शिवत राहतात.कितीही त्याला ठिगळ लागले तरी चालेल पण त्या ठिगळरुपी,वस्त्ररुपी संसारुपी गोधडी जीवनाच्या शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी ही दोन धागे कार्यरत असतात.जर का त्यापैकी एकजरी धागा कमकुवत झाला तर ते संसारुपी वस्त्र वस्त्र म्हणून राहत नाही किंवा त्याला वस्त्रही म्हणत नाही.मग त्याला वापरुन वापरुन राहिलेली चिंधी म्हणून बाजूला फेकून दिली जाते.मग संसाररुपी वस्त्र एकसंघ राहत नाही.संसारात दोघांनाही तेवढाच अधिकार आहे तेवढा वस्त्रामध्ये आडवा आणि उभा धागा एकमेकांत गुंतून आहे.

© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🏠🌷🏠🌷🏠🌷🏠🌷🏠
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
                     *परीस*

एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड
येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा
दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग
तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या
गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच गेले नाही....

तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी
परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या
नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी मार्गदर्शकाच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही
असतो किंवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो ....... पण फार कमी
लोक या परीसाला ओळखू शकतात.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

30/12/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 30/12/2022
💠 वार - शुक्रवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*रिझाल दिन - फिलिपाईन्स*

💥 ठळक घडामोडी :- 
● १८०३ - अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह.
● १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला.
● १९५३ - जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत - १,१७५ डॉलर.
● १९९६ - आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार.
● २००४ - भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार.

💥 जन्म :-
● १८६५ - रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म.
● १८७९ - रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञानी.
● १८८७ - कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.'भारतीय विद्याभवन' चे संस्थापक.

💥 मृत्यू :-
● १९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ.
● १९७४ - शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी.
● १९९२ - शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर.
● २००१ - हर्षद महेता, भारतीय शेअर दलाल.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात मविआकडून अविश्वास प्रस्ताव*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस; विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या किंवा इतर शहर आणि राज्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना निवडणूक आयोगाचा दिलासा, रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु, तर १६ जानेवारीला सर्वपक्षीय नेत्यांची बैठकी होणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'चीन, हाँगकाँग,जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड ' या सहा देशांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मराठवाड्यात आचारसंहिता लागू ! शिक्षक मतदारसंघासाठी मतदान 30 जानेवारी रोजी पार पडणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *बांगलादेशमध्ये पहिली मेट्रो रेल्वे सुरू, पंतप्रधान शेख हसीना यांनी दाखवला हिरवा झेंडा!*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *नवे वर्ष २०२३मधील फेब्रुवारी महिन्यात टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*वर्ग-8वा/ The vet कविता👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/CM2Hp0ZcRrE

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
 *गरज तेथे मदत करा*
     http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_8.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
📙 *किरणोपचार म्हणजे काय ?* 📙
***************************
अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसक अस्त्रामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गांपैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात.
क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही हे बघण्यासाठी होतो.
गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यत: शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
एका ओघळणाऱ्या थेंबामागे, न गाळलेले हजारो अश्रू असतात.
~ वपु काळे | काही खरं काही खोटं

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) एकाच स्पर्धेत सर्वाधिक १७२ गोल करण्याचा नवा विक्रम कोणत्या विश्वचषकात झाला ?
२) भारतातील पहिली सर्कस कोणी व केव्हा सुरू केली ?
३) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे ?
४) मराठी भाषेतून कोणत्या साहित्यकृतीला २०२२ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे ?
५) चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तरे :- १) कतार फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२   २) विष्णुपंत छत्रे, १८७८   ३) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका   ४) उजव्या सोंडेच्या बाहुल्या ( कादंबरी )   ५) ईरई नदी

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 किरण रणवीरकर, साधनव्यक्ती
      गटसाधन केंद्र, धर्माबाद
👤 मारोती छपरे, माध्यमिक शिक्षक, जिपहा धर्माबाद
👤 निवृत्ती लोखंडे
👤 राजेश्वर रामपुरे
👤 साहेबराव कांबळे
👤 आनंद यडपलवार, शिक्षक
👤 संजय भोसीकर
👤 भारत पाटील सावळे

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.*
*आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'*
       
        ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
      *श्री. संजय नलावडे, मुंबई*
      *मोबाइल  - 9167937040*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••

ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.

© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
 *अहंकार आणि गर्व असू नये.*

रामकृष्ण परमहंस आपल भक्तांसमोर प्रवचन देत होते. ते म्हणत होते, हे पहा, तुमच्यासमोर मी बसलेलो आहे, हे तुम्ही पाहता. पण मी एखादे वस्त्र माझसमोर धरले, तर मी तुम्हाला दिसणार नाही. तथापि, पूर्वीप्रमाणेच मी तुमच्याजवळ आहे. कपडय़ाआड असल्याने तुमच्या   दृष्टीस मात्र पडू शकणार नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने अदृश्य होईन. तसाच परमेश्वरसुद्धा तुमच्या-माझ्या सर्वांच्या जवळ असतो. परंतु अहंकाराच्या पडद्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. तुम्ही आपल्या डोळ्यांसमोर लहानसा कापडाचा तुकडा जरी धरला, तरी समोरचा मोठा पर्वत दृष्टीला अगोचर होईल.

तात्पर्यं - अहंकार आणि गर्व यांचा पडदा जोपर्यंत आपण बाजूला करीत नाही, तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार, ज्ञानप्राप्ती आपणाला होणार नाही.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* 
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

29/12/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 29/12/2022
💠 वार - गुरुवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
💥घडामोडी
● १९११ - सुन यात्सेन चीनच्या प्रजासत्ताकचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला.
● २००५ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी

💥जन्म
● १८४४ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील.
● १९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक.
● १९०४ - कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी
● १९१७ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.
● १९४२ - राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते.
● १९६० - डेव्हिड बून ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

💥मृत्यू
● १९६७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ.१९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
● १९७१ - दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी.
● २०१२ - टोनी ग्रेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू व समालोचक

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *वक्तृत्व स्पर्धा जिंकणाऱ्या तब्बल 50 विद्यार्थ्यांना घडवली दिल्लीवारी; हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा अनोखा उपक्रम*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 मुलाखतीत नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटच्या निकषांमुळे उमेदवार अपात्र, अट शिथिल करण्याची मागणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *लोकायुक्त विधेयक विधानसभेत बहुमतानं मंजूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले विरोधकांचे आभार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *वर्षभरानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहाबाहेर, कार्यकर्त्यांचा जल्लोष; सुप्रिया सुळे, अजित पवार उपस्थित*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *आयटीआर 31 डिसेंबरपर्यंत भरला नाही तर 10,000 रुपये दंड भरावा लागेल, तुरुंगवासही होऊ शकतो*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *रणजी ट्रॉफीत रियान परागचा कहर! 28 बॉलमध्ये कुटल्या 78 धावा, 4 विकेट्सही घेतल्या*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *हार्दिक पंड्या यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला ३ जानेवारीपासून होणार सुरू*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••

*वर्ग-6वा/ The man who never lied 👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/rTmgulFPx4Q

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
लेखाधिकारी संतोष कंदेवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माहितीपर लेख

https://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_26.html

माहिती वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
         *रामानंद सागर*

चंद्रमौली चोप्रा उर्फ रामानंद सागर ( जन्म - २९ डिसेंबर १९१७ - मृत्यू - १२ डिसेंबर २००५ ) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक होते. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामायण ह्या टिव्ही मालिकेसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात असत. २००० साली रामानंद सागरांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने स्न्मानित केले होते.
लाहोर येथे जन्मलेले रामानंद सागर १९४० च्या दशकात पृथ्वीराज कपूरसोबत सहाय्यक दिग्दर्शकाचे काम पाहत असत. १९५० साली त्यांनी स्वतःची सागर फिल्म्स नावाची कंपनी सुरू केली. ह्यादरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. १९६८ सालच्या आंखें ह्या सुपरहिट चित्रपटासाठी सागर ह्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळाला होता. १९८५ साली रामानंद सागरांनी दूरचित्रवाणीकडे लक्ष केंद्रीत केले. १९८६ सालची विक्रम और वेताल ही मालिका लोकप्रिय ठरली तर १९८७ सालापासून सुरू झालेली ७८ भागांची रामायण ही मालिका प्रचंड यशस्वी झाली.
सौजन्य :- विकिपीडिया
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••

*" ज्यांचा निर्धार व संकल्प अतूट आहे, तीच व्यक्ती जीवनात यशस्वी आहे. "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या लेखकाचे नाव काय आहे ?
२) भारताचा राष्ट्रीय ध्वजातील तीन रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील ?
३) आयपीएल २०२३ साठी सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ?
४) उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण जास्त असल्याने त्या गोलार्धला असेही म्हणतात ?
५) संगणकातील RAM चे फुल फॉर्म काय आहे ?

*उत्तरे :-* १) प्रवीण बांदेकर   २) केशरी, पांढरा, हिरवा   ३) सम करन, इंग्लंड   ४) भूगोलार्ध   ५) Random Access Memory 

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 संतोष ह. कंदेवार, लेखाधिकारी, नांदेड
👤 किशोर प्रभाकर पेंटे
👤 सुरेश सुतार
👤 विजय रणभीडकर, नांदेड

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*खूप हवे आहे. खूप गोष्टींचा हव्यास आहे. नाव पाहिजे. सन्मान पाहिजे. संपत्तीही हवीच आहे. समजा हे सर्व मिळाले तर त्यापेक्षा अधिक हवे आहे. पाहिजे ते मिळाले नाही तर स्वभाविकपणे निराशा आहे. मिळाले त्यापेक्षा अधिक मिळायला हवे होते. ते मिळाले नाही म्हणूनही निराशा आहे. अशा अवस्थेत,'ये सब मोह है, माया है' असे कोणी सांगतो. त्यातही दिलासा असतो. अखंड धडपड केल्यानंतरही कोल्ह्याला द्राक्ष मिळत नाहीत. त्याला कमालीची निराशा येते. त्या निराशेतून मुक्त होण्यासाठी मग तो त्या द्राक्षांनाच आंबट ठरवून मोकळा होतो. जे मिळत नाही ते 'आंबट' ठरवून मोकळे होणे काय किंवा त्याला 'मोह है, माया है' म्हणत बाद ठरविणे काय दोन्ही निराशेवर मात करण्यासाठी तेवढेच उपयोगी असतात.*

*अशा ताणाच्या, निराशेच्या वेळी थोडासा 'भ्रम' किंवा थोडीशी 'भूल' माणसांना हवी असते का? ती 'देव' आणि 'धर्म' यातून मिळते का? म्हणून देवधर्माचे व्यापारी नाडवणूक, शोषण करतात. हे उघड सत्य आहे. धर्म ही 'अफूची गोळी' आहे, असे मार्क्स म्हणतो. ऑपरेशनची वेदना नको म्हणून त्या दरम्यान भूल दिली जाते. तेवढ्यापुरत्या का होईना वेदना सुसह्य होतात. 'जगणे ते मरणे' या दरम्यानच्या आयुष्याचे जे ऑपरेशन होत असते. त्यासाठी तर 'देव' आणि 'धर्म' या कल्पनांची आवश्यकता नसेल.*
       
        ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
      *श्री. संजय नलावडे, मुंबई*
      *मोबाइल  - 9167937040*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*ज्यांच्या पाठीवर अपेक्षांचे ओझे आहे तो माणूस जीवनात कधीही सुखी आणि समाधानी होऊ शकत नाही.म्हणून माणसाने जीवनात निरपेक्ष वृत्तीने जीवन जगायला शिकले पाहिजे.*

© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
            *हुशार कावळा*

दुपारची वेळ होती, कडक ऊन पडले होते. एका कावळ्याला खूप तहान लागली होती. तो तहाने पोटी व्याकुळ झाला होता. तो इकडे तिकडे पाणीच शोधू लागला. दूर एक शेत होते. शेताच्या कडेला एक मडके होते. कावळा मडक्या जवळ गेला. मडक्याच्या तळाशी थोडे पाणी होते. कावळ्याने पाणी पिण्यासाठी आपले तोंड मडक्यात घातले, परंतु तरीही कावळ्याची चोच त्या पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. कावळ्याने थोडा विचार केला. इकडे तिकडे पाहिले. मग त्याला एक छोटीशी नळी दिसली. त्याने ती नळी चोचीत पकडली. व तो मडक्याजवळ गेला. एक नळीचे टोक मडक्यात बुडविले. चोचीने पाणी वर ओढले. हुशार कावळा पाणी प्याला. काव काव करत उडून गेला.

तात्पर्यः कोणतेही काम समय सूचकतेने व  युक्तिवादाने केले तर चांगले पार पडते.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* 
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

28/12/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 28/12/2022 
💠 वार - बुधवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
●१६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.
●१८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले.
● १८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले.
● १८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार.

💥 जन्म :-
● १८९९ - गजानन त्र्यंबक माडखोलकर, मराठी साहित्यिक व पत्रकार.
● १९३२ - धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती.
● १९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती.

💥 मृत्यू :-
● १९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय.
● १९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक.
● १९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी.
● २००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत.
● २००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक.
● २००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ.
● २००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे.
● २००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *राजधानी गारठली! तापमान 5 अंशांवर, दिल्ली धुक्यात हरवली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *तब्बल दोन वर्षांनंतर मुंबईत रंगणार माणदेशी महोत्सव; 5 जानेवारीपासून होणार सुरुवात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *2 जानेवारीपासून दहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा, CBSE बोर्डाकडून गाईडलाईन्स जारी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *अनिल देशमुखांची आज सुटका होणार, आर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिर बाईक रॅली काढण्यात येणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *शेतकऱ्यांची चिंता वाढली, 10 दिवसात कापसाच्या दरात दीड हजार रुपयांची घसरण*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *मुंबई - अहमदाबाद महामार्गावर केमिकल टँकरला भीषण आग, एकाच मार्गाने वाहतूक सुरु*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *टी-२० क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेण्याचा विराट कोहलीने घेतला निर्णय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••

*वर्ग-7वा/Two Fables गोष्ट The town mouse and country mouse👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/SvsWxV6eiuM

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                  *गुरुदक्षिणा*

मोटे सरांना मोबाईलवर बोलल्यापासून डॉ.गिरीश अस्वस्थ वाटत होता. त्यांच्या चेहर्‍यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदाच मोटे सरांनी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करणे डॉ.गिरीशच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्यासाठी मोटे सरांना डॉ.गिरीश ज्या दाते मेमोरियल ............

वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html     

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?* 🔬

जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.
पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.
*असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.*

*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

१) जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?
२) वनस्पतींना संवेदना असतात हा शोध कोणी लावला ?
३) फोर्ब्सने जारी केलेल्या २०२२ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांमध्ये प्रथम स्थान कोणी पटकावले ?
४) मराठी अभिजात भाषा समितीच्या अहवालानुसार कोणता ग्रंथ आद्यग्रंथ ठरतो ?
५) बुद्धिबळाच्या पटावर एकूण किती घरे किंवा चौकोन असतात ?

*उत्तरे :-* १) जिल्हाधिकारी ( कलेक्टर )   २) जगदीशचंद्र बोस   ३) नाओमी ओसाका ( टेनिसपटू ), जपान   ४) गाथा सप्तशती   ५) चौसष्ट 

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 साई पाटील, धर्माबाद
      श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस
👤 वृषाली वानखडे, अमरावती
      सामाजिक कार्यकर्ती & साहित्यिक
👤 श्रीधर सुंकरवार, नांदेड
👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद
👤 अजय तुम्मे
👤 योगेश शंकर ईबीतवार, येवती
👤 नंदकिशोर सोवनी, पुणे
👤 ओमसाई सितावार, येवती
👤 ओमकार ईबीतवार

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*रंग, शब्द, स्वरास एकाग्रचित्ताची समाधी लागली की, अवीट सौंदर्याचा आविष्कार घडतो. राष्ट्रे मोठी होतात ती एकाग्रचित्तानं, प्रामाणिकपणे काम करणा-या माणसांच्या बळावर; आळशी माणसांवर नव्हे. जीवन सुखाने जगण्यासाठी, आनंदासाठी, हसण्यासाठी, गाण्यासाठी, खेळण्यासाठी आहे; रडण्यासाठी नव्हे. आळशी माणसांवर रडण्याची वेळ येते. आळसाची सवय झाली की, माणूस आळशीपणाचा गुलाम बनतो. खरंतर आळशी माणूस बंद पडलेल्या घड्याळासारखाच असतो. परमेश्वराने माणसाला दोन हात आणि एक तोंड दिले आहे. याचाच अर्थ, दोन हातांनी काम करा आणि तोंडाची भूक भागवा.*

*माणसाच्या हाताची पाच बोटे म्हणजे एक सुंदर महाकाव्यच ! बोटांचा जिथं स्पर्श होईल तिथं स्वर्ग निर्माण होईल. यासाठी आळसाला कायमची सुट्टी द्या. आळशीपणा हेच अनेक दुर्गुणांचं उगमस्थान असतं. प्रेमाने प्रेम वाढते, द्वेशाने द्वेष, यशाने यश, विश्वासाने विश्वास वाढतो; तसे आळसाने आळस वाढतो. आपल्यासाठी कोणीतरी काम करावे आणि आपल्याला आरामात जगता यावे, ही आळशी माणसाची वृत्ती. आळशीपणाने सतत आराम करण्यात वेळ घालवणे म्हणजे जिवंतपणी आत्महत्या करण्यासारखे आहे. आळस माणसाच्या मनाला जडलेला कर्करोग आहे, असे हेडवूड नावाच्या विचारवंताने म्हटले आहे. 'दैव देईल ते मी घेईल' असे म्हणणारे लोक आळशीच. कष्ट करून मला मिळेल ते घेईन असे म्हणणारे लोक उद्योगी असतात.*
         *'हे ईश्वरा माझे हाती काम दे*
         *परी ते करण्याची शक्ती दे.'*

       ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
   ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
           *--संजय नलावडे, मुंबई*
         *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी किंवा त्या संकटाला तोंड देण्यासाठी जी व्यक्ती सदैव तयार असते तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होते. संकटं ही प्रत्येकाच्या जीवनात कमी-जास्त तर असणारच.... पण संकटाला पाहून दूर पळून जाणारी फार असतात.कारण एकीकडे  त्यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता नसते,ते हतबल होतात,त्यांची मानसिकता नसते,दूरचा विचार करत नाहीत त्यामुळे त्यांचा जगण्याचा त्यांच्यावरच विश्वास नसतो.त्यामुळे संकटासमोर शरण जातात.तर दुसरीकडे काही व्यक्ती कोणत्याही संकटाला तोंड द्यायला तयार असतात.काही असो आपण त्या संकटाला तोंड दिलेच पाहिजे जर नाही दिले तर आपण जगणार कसे ? आपल्यासमोर उभे आयुष्य आहे ते कसे जगणार ?आज आपण सामोरे नाही गेलो तर जगण्याला अर्थच काय राहणार ? नाही आपल्याला जगायचे तर मग पुढे कसे जीवन जगणार ? जगायचेच असेल तर पहिल्यांदा आपला आपल्यावर आत्मविश्वास ठेवायला हवा आणि त्या आत्मविश्वासावरच पुढे पुढे पाऊल टाकायला हवे आणि त्याप्रमाणे जगायला हवे अशी सकारात्मक विचार घेऊन जगणारी व्यक्तीच जीवन चांगल्याप्रकारे जगू शकते. अशा आशादायी, ध्येयवादी असणा-या व्यक्तींचे अनुकरण करायला हवे  आणि  कोणत्याही संकटाला तोंड देणा-या अशा व्यक्तीकडे पाहिले तर अनुकरण करणा-या व्यक्तीला अधिक बळ मिळते आणि पुढील संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार होते.
म्हणून कोणत्याही संकटाला न घाबरता सामोरे जाऊन जीवन जगायला शिकले पाहिजे.तरच जीवन जगण्याला अर्थ आहे.
अन्यथा जीवन व्यर्थच आहे असे समजावे.

© व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                 *समाधान*

मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'
तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला.
माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..!

तात्पर्यः शक्य तेवढया मिळालेल्यात समाधानी राहणे हेच योग्य.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~

27/12/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 27/12/2022
💠 वार - मंगळवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*डॉ पंजाबराव देशमुख जयंती*
💥 ठळक घडामोडी :-
●१७०३ - पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) इंग्लंडमध्ये प्राधान्य.
● १८३१ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला.
●१९४५ - २८ देशांनी जागतिक बँकेची स्थापना केली.
● १९४५ - कोरियाची फाळणी.
●१९४९ - इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.
● १९७८ - ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक.

💥 जन्म :-
● १८९८ - पंजाबराव देशमुख, विदर्भातील सामाजिक नेता, शिक्षण प्रसारक, केंद्रीय कृषिमंत्री.
● १९६५ - सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.

💥 मृत्यू :-
● १९६५ - देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय.
● १९९७ - मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका.
● २००२ - प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *पोटदुखीच्या त्रासामुळं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल, एम्समध्ये उपचार सुरु*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक; आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कारवाई*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *कृषी महोत्सवाच्या नावाने वसुली; अजित पवारांचा अब्दुल सत्तारांवर आरोप, राजीनाम्याची मागणी; फडणवीसांकडून आरोपांची गंभीर दखल*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *आयटीआय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 40 रुपयांऐवजी 500 रुपये विद्यावेतन मिळणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *कर्नाटकात शाळा,कॉलेज, सिनेमागृह, पब अन् बारमध्ये मास्कसक्ती, नव्या वर्षाच्या स्वागतासाठीही नियमावली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ, फुल क्रीम दूध आता 66 रुपये लिटर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांची आई मीनल गावस्कर यांचे मुंबईत निधन, ते 95 वर्षाच्या होत्या*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
 *मरावे परी अवयवरूपी उरावे*

जन पळभर म्हणतील हाय हाय ! 
मी जाता राहील कार्य काय ?

गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना .............

वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       🦈🐟 *मासे* 🐟🦈
       ********************
मासे हे जलचर प्राणी आहेत. श्वसनासाठी त्यांना कल्ले असतात. शरीरामध्ये जवळपास संपूर्ण लांबीचे पाठीच्या कण्याचे हाड असतेच असते. या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्याही माशात आढळणारच.
सजीवांची उत्पत्ती पाण्यात झाली. त्यांतील अनेक पाण्याबाहेर पडले, पण मासे पाण्यातच राहिले. जगातील पृष्ठवंशीय प्रकारच्या एकूण प्राण्यांतील निम्म्याहून अधिक जाती मासेच आहेत. पाण्यातून बाहेर पडलेले अनेक प्राणी वेगाने हालचाल करू शकतात. पण पाण्याच्या घनतेमुळे, वजनामुळे मासे त्या मानाने खूपच कमी वेगवान असतात.
माशांचे शरीर खवल्यांनी भरलेले असते. हे खवलेच त्यांच्या पृष्ठभागाचे संरक्षण करतात. झीज झाल्यावर पुन्हा नवीन खवले येण्याची क्रिया सतत चालूच असते. खवल्यांमुळे माशांच्या हालचाली चमकदार दिसतात. माशांच्या हालचाली मुख्यत: शरीरातील स्नायूंच्या वेड्यावाकड्या आकुंचन प्रसारणातून होतात. यालाच मदत म्हणून त्रिकोणी पंखाकृतीच्या (फिनच्या) जोड्या काम करतात. माशाच्या छातीजवळचा भाग, तेथीलच तळाजवळचा भाग व पाठीवरचा भाग येथे एकेक पंखांची त्रिकोणी जोडी आढळते. माशांच्या जातीनुसार व आकारमानानुसार या पंखांची ताकद बदलत जाते. मुख्य पंख म्हणजे शेपटीचे. त्यांचा वापर सुकाणूसारखा तर केलाच जातो, पण खेरीज वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठीही हे पंख वापरले जातात.
माशांची श्वसनक्रिया कल्ल्यांमार्फत होते. एखादा लांबलचक कंगवा असावा, तशी त्यांची रचना असते. तोंडातून घेतलेले पाणी या कल्ल्यांतून सतत बाहेर टाकले जाते. या क्रियेत येथील रक्तवाहिन्या पाण्यातून प्राणवायू शोषून घेतात. तोंडावाटे घेतलेले अन्न मात्र या कल्ल्यातून बाहेर पडू नये, अशी व्यवस्था आतील कडा वळवून केलेली असते. श्वसनक्रिया व अन्न गिळणे या दोन्ही गोष्टी एकदमच केल्या जाऊ शकतात. त्यामुळे अनेक मासे तोंडाने पाणी घेतानाच येणारे पदार्थ म्हणजे लहान मासे, प्लांक्टन वनस्पती, शेवाळे गिळतात व उरलेले पाणी कल्ल्यांवाटे बाहेर टाकतात.
माशांचे खाद्य मुख्यतः मासेच. पण या खेरीज अनेक अन्य जलचरांची अंडी, अळ्या, शेवाळी या खाद्यांचीसुद्धा सर्व लहान माशांना गरज भासते. समुद्रातील प्रवाळांच्या खडकांमध्ये शिरून तेथील हे आयते खाद्य पटकावणे हा लहान माशांचा दिवसभरचा उद्योगच असतो. हे सर्व खडक ठराविक आकाराचे असल्याने त्यात शिरकाव करणे व बाहेर पडणे यासाठी ठराविक आकाराची जाडीच चालू शकते. पण याखेरीज काही अगडबंब मासे फारसे कष्ट न करता फक्त आ वासून वाटेत येणारे सर्व लहान मासे फस्त करत जातात. एखादा मध्यम आकाराचा शार्क दिवसभरात एखादा टन मासे सहज संपवतो. यावरून त्यांच्या भुकेची कल्पना येऊ शकेल.
मासे व पृथ्वीवरचे अन्य प्राणी यांच्या संवेदना इंद्रियांत फारसा फरक नाही. डोळे तर नेहमीप्रमाणेच काम करतात. कान दिसत नाहीत, पण अन्य प्राण्यांप्रमाणेच तोल सावरणे, ऐकणे या गोष्टींसाठी माशांचे कान उपयुक्त ठरतात. आणखी एका प्रकारे संवेदना जाणवतात. आपल्या कातडीला हात लावल्यावर जशा संवेदना मिळतील, तशाच संवेदना पाण्यातील तरंगांच्या हालचालीतून संपूर्ण लांबीमधील पृष्ठभागातून माशाला मिळतात. याचा वापर करूनच लांबवरचा शत्रू, भक्ष्य, पाण्यावरील अन्य जलचरांचा वावर याचे ज्ञान मासा मिळवत राहतो.
माशाचे आयुष्य किती ? मासे पाळले, तर सांगता येईल, अन्यथा अवघडच. पण मोठे मासे कित्येक म्हणजे पन्नासच्या वर वर्षे जगत असावे. लहान मासे मात्र जेमतेम वर्षभरातच आयुष्य संपवतात. याच काळात वाढ, अंडी घालणे वगैरे सर्व गोष्टी घडतात. पृथ्वीवरील सजीवांमध्ये आकारमान व आयुष्य यांची सांगड निसर्गाने घालून ठेवली आहे. मासे गोड्या पाण्यात असतात, समुद्रात, पाणथळीच्या जागी असतात, तसेच खोल डोहात, चिखलाच्या पाण्यात असतात, तसेच नितळ अशा सरोवरात. अत्यंत आकर्षक माशांप्रमाणेच अत्यंत बोजड विचित्र तोंडाचे माशांचे प्रकारही पाहायला मिळतात. जेमतेम चार ते पाच मिली ग्रॅम वजनाच्या छोटय़ा माशांपासून पस्तीस ते चाळीस टन वजनाच्या शार्क माशांपर्यंत माशांचे वजन आढळते.
मासे खाणे हा मानवी आहाराचा एक नित्याचा भाग आहे. किंबहुना याचा फायदा म्हणून पृथ्वीवर, जमिनीवर निर्माण होणाऱ्या अन्नात आपण बचत करू शकतो आहोत. अत्यंत पौष्टिक असा आहार माशांपासून मिळू शकतो. या सागरी संपत्तीचा पूर्ण विनियोग करणे माणसाला शक्यच होणार नाही, इतकी ती अफाट आहे. जगातील ज्ञात आकडे एकत्र केले, तर वर्षांकाठी दहा कोटी टन मासे समुद्रातून पकडले जातात. यात गोड्या पाण्यातील माशांचा समावेश नाही.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) ख्रिसमसचा शब्दश: अर्थ काय आहे ?
२) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ चा 'गोल्डन बुट'चा पुरस्कार कोणी पटकावला ?
३) एका झाडाच्या अन्नरसावर जगणाऱ्या दुसऱ्या झाडास काय म्हणतात ? 
४) मांजर नराला बोका तर मांजर मादीला काय म्हणतात ?
५) इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे ?

उत्तरे :- १) क्राइस्टस मास अर्थात येशूच्या जन्मनिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना   २) किलियन मबापे   ३) परजीवी   ४) भाटी   ५) ऑक्सफर्ड विद्यापीठ 

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 पूजा बागूल, साहित्यिक, नाशिक

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*'आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.* 
*परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.*
       
        ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
      *श्री. संजय नलावडे, मुंबई*
      *मोबाइल  - 9167937040*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात.असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत.अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे.अशाठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी   कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे.ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो.या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत.हे कधीही विसरुन चालणार नाही.

© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
 *यशाचे बिजगणित*

आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न?
'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, आजोबानी  टाइमपास म्हणून उत्तर दिले. 
'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली. 
आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!' 
'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली.
'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?' 
'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे. 
'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले. 
'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली. 
'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का? 
अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली.
'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते. 
'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्‍या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते. 
''खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे.
पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* 
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

26/12/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 26/12/2022
💠 वार - सोमवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
💥 ठळक घडामोडी :- 
● २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.
● १९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.
● १९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार.

💥 जन्म :-
● १८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग 
● १९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे
१९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर 
● १९१७ - प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक.
● १९३५ - डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी)
● १९४८: डॉ. प्रकाश आमटे

💥 मृत्यू :- 
● १९७२ - हॅरी ट्रुमन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
● १९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा
● २०११ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *2022मध्ये देशाला मिळाली गती, लोकांनी रचला इतिहास ; भारताची अर्थव्यवस्था 2022 मध्ये पाचव्या क्रमांकावर 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींकडून देशवासियांच्या पाठीवर शाबासकीची थाप*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *मुंबईत हुडहुडी वाढली, पारा 15 अंशावर ; यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रातही पारा घसरला*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *औरंगाबादेतील कचनेरच्या जैन मंदिरातील दोन किलो सोन्याची मूर्ती बदलली; रंग फिकट पडल्याने घटना उघडकीस, पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी पाहणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयाच्या मास्क लावणे बंधनकारक, मात्र हे विनंती स्वरूपात असल्याचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांचे म्हणणे आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिल्लीकरांना दोन दिवसीय शास्त्रीय संगीताची मेजवानी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *देशभरात नाताळचा उत्साह, मध्यरात्री साजरा करण्यात आला प्रभु येशु ख्रिस्ताचा जन्मदिवस.. राज्यभरातील चर्च आकर्षक रोषणाईने सजल्या*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *बांग्लादेशला क्लिन स्वीप देत टीम इंडियानं रचला इतिहास, आशियामध्ये सलग 18 वा कसोटी मालिका विजय, सामनावीर आर. अश्विनची ऐतिहासिक कामगिरी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••

*वर्ग-7वा/Two Fables गोष्ट Two Friends and bear👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/MR09Z6mlqx0
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे*

( जन्म २६ डिसेंबर १९१४ - मृत्यू ९ फेब्रुवारी ९ २००८ ) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपू, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचे आश्रम सुरू केले. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत होते. याशिवाय 'वन्य जीवन संरक्षण',  'नर्मदा बचाओ आंदोलन' अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे 'संत' या नावाने गौरवले आहे.
अधिक माहिती मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. 
https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%87
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ संकलन :- 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      💉 *लस म्हणजे काय ?* 💉
*अनेकदा लस लसीकरण वा व्हॅक्सीनेशन हे शब्द आपण वाचतो. टीव्हीवर याच्या जाहिरातीही पाहत असतो. पण लस म्हणजे नक्की काय या विषयी शास्त्रीय माहिती आपल्याला नसते.*
*बर्‍याचदा आपण बघतो की उन्हात जर एखादा दिवस खूप फिरलो तर लगेच डोकेदुखी, अंगदुखी, इत्यादींचा त्रास होतो. आपण त्याला ऊन बाधले असे म्हणतो. पण जर रोज उन्हात जायला लागलो तर मात्र उन्हाचा तेवढा त्रास होत नाही. नेहमी घरचेच वॉटरबॅगचे पाणी पिणारा मुलगा बाहेरचे पाणी प्यायला तर त्याच्या पोटात दुखते, संडास लागते. शरीराला एखाद्या गोष्टीची सवय झाली तर नंतर त्रास होत नाही, असे साध्या भाषेत म्हणता येईल. पण शरीराला जीवजंतूंची सवय होते का ? सवय म्हणण्यापेक्षा जीवजंतूंचा अनुभव येतो असे म्हणता येईल. एकदा अनुभव पाठीशी असला म्हणजे शरीर दुसऱ्यांदा त्या जीवजंतूंशी चांगला लढा देऊ शकते. एकदा गोवर झाल्यावर सहसा परत होत नाही, ते याचमुळे. हे का होते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.*
*शरीरात रोगप्रतिकार शक्ती दोन प्रकारे निर्माण होते. जंतू शरीरात शिरल्यानंतर त्यांच्यातील प्रथिन वा कर्बोदक घटकांसाठी शरीरात प्रतिकार करणारी द्रव्ये (अँटीबॉडीज) तयार होतात किंवा जंतूंना मारण्यासाठी पेशींचे प्रशिक्षण होते. या दोन्ही मार्गांनी जीवजंतू पुढच्यावेळी आले तर त्यांना मारून टाकता येते. पण प्रत्येक वेळी आधी जीवजंतूंचा शरीरात प्रवेश करून घेऊन रोगाला सामोरे जाणे परवडण्याजोगे नसते. यासाठी शास्त्रज्ञ जंतूंना अर्धमृत (Attenuate) करतात वा पूर्णपणे मारतात. असे अर्धमृत वा मृत जंतू शरीरात गेल्यावर रोग निर्माण करू शकत नाहीत. पण त्यांच्याविरुद्ध प्रतिकार करणारी द्रव्ये आणि प्रशिक्षित पेशी तयार होतात. लसी अशाच अर्धमृत वा मृत जंतू किंवा त्यांच्यातील घटकांपासून बनवलेल्या असतात. लस देण्याच्या क्रियेला लसीकरण म्हणतात. ५००० वर्षांपूर्वी चिनी लोक देवी रोग होऊ नये म्हणून लसीकरण करत. अशी वैद्यक इतिहासात नोंद आहे. पहिले शास्त्रोक्त लसीकरण करण्याचा मान एडवर्ड जेन्नरकडे जातो. त्याने १७९६ मध्ये देवी रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केले.*
*आज आपल्याकडे क्षयरोग, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, कॉलरा, रेबीज, विषमज्वर, कावीळ तसेच गालफुगी अत्याधिक रोगांवरील प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. लसीकरणामुळे बऱ्याच गंभीर रोगांचा प्रतिबंध आपण करू शकलो आहोत.*

*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*" परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) बाबा आमटे यांचा जन्म कोठे व केव्हा झाला ?
२) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे ?
३) 'आधुनिक भारताचे संत' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
४) बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या शुश्रुषेसाठी कोणत्या आश्रमाची स्थापना केली ?
५) बाबा आमटे यांना समाजसेवेसाठी कोणकोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?

*उत्तरे :-* १) हिंगणघाट, वर्धा ( २६ डिसेंबर १९१४ )   २) मुरलीधर देवीदास आमटे   ३) बाबा आमटे   ४) आनंदवन   ५) डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण 

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 नरसिंग जिड्डेवार, भोकर
👤 नागराज राजेश्वर डोमशेर
👤 आकाश सरकलवाड, धर्माबाद
👤 कपिल जोंधळे
👤 अशोक लंघे
👤 शाडूल शेख

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••
*मानवाचं मन... अनेक प्रकारचे सुखदु:खात्म प्रसंग, विवंचना, काळजा, आसूया, स्पर्धा, द्वेष, मत्सर, उत्सुकता आणि कुतूहल...यांनी सदैव त्याचे मन 'पिसाट' झालेले. अप्राप्याचा ध्यास म्हणजे आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा अथक प्रयत्न आपण सारे करीत असतो; पण 'मन:शांती' चा शोध घ्यायला नेमके विसरतो. 'मन:शांती' हे महत्वाचे जीवनसूत्र आहे, हेच आपण या सा-या धबडक्यात हरवून जातो. 'निरंजनी आम्ही बांधियेले घर' असे संतवचन आहे. ही निरांजनावस्था महत्वाची. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काही करावे लागते. यातून त्याची सुटका नाही. मनाची सर्वार्थाने मुक्तता तशी कठीणच. कारण वैयक्तिक भावभावना, विकार-विचार आणि अहंकार यापासून स्वत:ला अलग करणे जवळजवळ अशक्यप्राय.* 
*पाण्यात पडले म्हटले की कोणीही ओलाचिंब होणारच. मात्र एखादा खडक त्या जलाशयात असेल तर तो पाण्यात राहून अलिप्तच की ! अशी अलगता संसारात राहून साधायची, म्हणजे शरीरक्रिया चालू आहे पण मन मात्र अलिप्त आहे. त्याच्या पृष्ठभागावर कोणत्याच लहरी नाहीत, तरंग नाहीत. मनाच्या समधात अवस्थेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी 'नुरोनिया ठेला' असे केले आहे. म्हणजे बाह्यस्वरूपी तो इतका निश्चल की जिवंत आहे का, हा इतरांना प्रश्न पडावा, आणि तो जिवंत असला तरी जणूकाही जिवंत नाही, असे वाटावे असा... त्याच्या मनाच्या या अवस्थेला 'सहजस्थिती किंवा 'निजस्थिती' असेही त्यांनी म्हटले आहे. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...' नामापरते सुख नाही रे सर्वथा !' हाच तो सद्रगुरूपदेश...*

        ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
      *श्री. संजय नलावडे, मुंबई*
      *मोबाइल  - 9167937040*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
नशिब आणि परिश्रम हे जीवनाचे वेगवेगळे दोन भाग आहेत.पण जीवनात नशिबापेक्षा परिश्रमालाच अधिक महत्त्व द्यायला हवे.नशिब हे माणसाला परिश्रम करु देत नसल्याने तो फक्त आणि फक्त न्यूनगंडपणा निर्माण करतो त्यामुळे त्याच्या जीवनाची काहीच प्रगती होत नाही.तर परिश्रमाचे तसे नाही.परिश्रमाने माणूस काही ना काहीतरी करुन जीवन घडवण्याचा प्रयत्न करतो.त्यामुळे त्याच्या जीवनात आपण काहीतरी करत असल्याची जाणीव निर्माण होते आणि चांगले जीवन जगण्याची आणि जीवनात परिश्रमाशिवाय प्रगती होत नाही असे कळायला लागते.म्हणून जीवनात नशिबापेक्षा परिश्रमालाच महत्वाचे स्थान द्यायला हवे तरच मग आपल्या नशिबाचे दार आपोआपच खुलते.

© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
              *वडिलांना मदत*
भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.
ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.
तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.
आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली. 

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* 
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~

24/12/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 24 डिसेंबर 2022
💠 वार - शनिवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       *भारतीय ग्राहक दिन.*

💥 ठळक घडामोडी :- 
१२९४ - पोप सेलेस्टीन पाचव्याने राजीनामा दिल्यावर पोप बॉनिफेस आठवा सत्तेवर.
१७७७ - जेम्स कूकला किरितिमाती तथा क्रिसमस द्वीप पहिल्यांदा दिसले.
१८५१ - लायब्ररी ऑफ काँग्रेसला आग.
१८६५ - अमेरिकेच्या दक्षिणेतील सेनापतींनी कु क्लुक्स क्लॅन या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली.
१९२४ - आल्बेनिया प्रजासत्ताक झाले.

💥 जन्म :-
१८९९ - पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी, मराठी लेखक.
१९२५ - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक.
१९५९ - अनिल कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता.

💥 मृत्यू :- 
१८७३ - जॉन्स हॉपकिन्स, अमेरिकन उद्योगपती व दानशूर.
१९१४ - जॉन मुइर, अमेरिकन निसर्गसंवर्धक.
१८६३ - एम.जी. रामचन्द्रन, तमिळनाडूचा मुख्यमंत्री.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *उत्तर सिक्कीम मध्ये भीषण अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू; आर्मी ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *कोरोनामुळे चिंता वाढली! आजपासून मुंबई विमानतळावर प्रवाशांची कोविड चाचणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीत वाढ, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढच्या एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मोदी सरकारचा मोठा निर्णय,  वन रँक वन पेन्शन योजनेत सुधारणा, 25 लाख जणांना होणार फायदा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'; सेन्सेक्स 60 हजार अंकाखाली, 8.20 लाख कोटींचा चुराडा, घसरणीमुळे गुंतवणूकदार रडकुंडीला*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरल सॅम करन, 18.50 कोटींना पंजाबमध्ये सामिल*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••

*गोष्टींचा शनिवार-रोज व रॉकी बनवतात निसर्गमित्र👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/I-kl1IrukTM

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*साने गुरुजी जयंतीनिमित्त प्रासंगिक लेख*

मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजी

पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण सर्वजण साने गुरुजी या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. सदाशिवराव व यशोदाबाई यांच्या पोटी जन्मलेला दुसरा मुलगा असून तिसरे अपत्य म्हणजे साने गुरुजी. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांचे वडील सारा गोळा करण्याचे काम करीत होते. साने गुरुजी यांची आई त्यांना श्याम या नावाने प्रेमाने ........

वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_23.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
            *मोहम्मद रफी*

मोहम्मद रफी हिंदी सिनेमातील महान प्लेबॅक गायक होता.नाटकांच्या आवाजाचा आणि त्यांच्या आवाजाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी आपल्या समकालीन गायिकांबरोबर ओळखले. त्यांना शायनशाह-ए-तारानुम असेही म्हटले जाते. मोहम्मद रफीच्या आवाजात त्यांच्या आगामी काळात अनेक गायकांनी प्रेरित केले. हे सोनू निगम , मोहम्मद अजीज आणिउदित नारायण च्या नाव आहे - या आता अनेक त्याच्या स्वत: च्या ओळख आहे तरी. 1 9 40 ते 1 980 पर्यंत सुरूत्याने एकूण 26,000 गाणी गायली. [2]मुख्य प्रवाहात हिंदी अतिरिक्त गीते गझल , भजने , देशभक्तीपर गीत, कव्वाली समावेश आणि इतर भाषांमध्ये गाणे गायली. कलाकार त्यांच्या संगीत चित्रित आहेत कोठे गुरु दत्त , दिलीप कुमार , देव आनंद , भारत भूषण , Johnnie वॉकर , जॉय मुखर्जी , शम्मी कपूर , राजेंद्र कुमार , राजेश खन्ना ,अमिताभ बच्चन ,  धर्मेंद्र ,  जितेंद्र  आणि  ऋषी कपूर ते गायक अभिनेता व्यतिरिक्त किशोर कुमारदेखील नाव समाविष्ट आहे.

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*"कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही."*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ चा 'गोल्डन बॉल' विजेता कोण ? 
२) अर्जेंटिना या देशाची राजधानी कोणती ?
३) भारतातील सर्कसीचे उगमस्थान कोणते ?
४) 'गुळाचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ?
५) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण ?

*उत्तरे :-* १) लिओनेल मेस्सी, अर्जेंटिना   २) ब्यूनस आयर्स   ३) सांगली, महाराष्ट्र   ४) कोल्हापूर   ५) सिकंदर 

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   

👤 साईनाथ नुतिवाड, पेंटर, धर्माबाद
 👤 निर्मला बोधरे, सहशिक्षिका, पुणे
👤 विठ्ठल मुजळगे, सहशिक्षक, धर्माबाद
👤 रणजित बाळासाहेब गुंजाळ, पत्रकार,
👤 शिवकुमार शिंदे, धर्माबाद
👤 नितेश पांचाळ, नांदेड

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       *बायबलमध्ये एक महान बोधकथा आहे. एका अविवाहित स्त्रीच्या हातून घडलेल्या चुकीचा आपल्या सोयीचा अर्थ लावून नादान लोक तिला दगड-धोंड्यांनी ठेचून मारायला धावतात. ती जीवाच्या आकांताने पळत सुटते, खाली कोसळते तेव्हा तिच्यासमोर महाकारूणिक प्रभू येशू उभा असतो. ती त्यांचे पाय धरून आपले प्राण वाचविण्यासाठी गयावया करते. प्रभू तिला अभय देत उभं करतात आणि लोकांना विचारतात 'लोक हो., आपण हिच्या जीवावर का उठलात?' लोकातून क्रोधाने तप्त लाल झालेली वाक्य उत्तरतात 'हि पापीण आहे. हिने फार मोठे पाप केले आहे. हिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, पुन्हा घोळका ओरडतो..मारा..मारा धोंड्यांनी मारा हिला..*
*तितक्यात प्रभू पुन्हा धीरगंभीर अन् शांत मुद्रेने त्यांना म्हणतात 'बाबांनो, हिने खरोखरच पाप केले असेल तर तुम्ही मानता त्या कायद्याप्रमाणे ती दोषी आहे आणि दोषीला तुम्हीच शिक्षा देणारे असाल तर पहिला दगड फक्त त्यानेच उचलावा, ज्याने आयुष्यात चुकूनसुद्धा एकही पाप केले नाही. असा प्रस्ताव मांडताच सर्वजण परस्परांच्या नजरा चुकवत एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या हातातील दगडांची पकड सैल झाली. सर्वांच्या हातातले दगड धरतीवर लोळत येशूला शरण गेले. कारण त्या लोंढ्यात एकही निष्पाप नव्हता. प्रत्येकाचे हातून लहान-मोठी पापे झालेलीच होती. ते सर्व माना खाली घालून पराभूतागत पाठमोरे झाले. त्या स्त्रीचे प्राण वाचले. तिने तिची चूक मान्य केली, ती प्रभुभक्त झाली...*
*"लोकांच्या हातुन गळून पडलेले दगड आजही पूर्ण निष्कलंक माणसाच्या हाताच्या स्पर्शाची वाट पहात तिथेच पडून आहेत..पण निष्पाप हात त्यांना स्पर्शायला पुढे धजले नाहीत."*
        ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
      *श्री. संजय नलावडे, मुंबई*
      *मोबाइल  - 9167937040*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
ईश्वरावर श्रध्दा असणे काही चुकीचे नाही,पण ईश्वरच जे काही करेल ते मी स्वीकारेन असे म्हणून त्याच्यावर विसंबून राहणे मात्र चुकीचे ठरेल.ईश्वर ही आपल्यासाठी एक अप्रतक्ष प्रेरणा आहे.जेव्हा तुम्ही तुमच्या प्रयत्नाने आणि जिद्दीने प्रामाणिकपणे काम करता ते काम नक्कीच यशाकडे घेऊन जाते.त्या तुम्ही करत असलेल्या कामामध्ये ईश्र्वर नक्कीच प्रेरणा देतो.केवळ काम न करता मला माझ्या कामात नि जीवनात यश मिळू दे असं म्हणत असाल तर तो तुमचा विचार तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाणाराच ठरेल.म्हणून प्रथम आपल्या कामाचा प्रारंभ प्रसन्न मनाने आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करायला सज्ज राहिलातकी,मग तुम्हीच तुमच्या मनातून ईश्र्वराचे आभार मानायला विसरणार नाहीत हे मात्र खरेच आहे.

© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
 *सुई आणि वाघ*

एक सुई चालली असते वाघाचा बदला घ्यायला. वाटते तिला शेण भेटते शेण म्हाणते, 'सुई ताई कुठे चाललीस? मी येऊ?'
सुई म्हणते, 'हटकलेस का मला. मी चालले वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे सुई व शेण यांचा विंचु भेटतो. विंचू दोघांना विचारतो. 'सुई ताई व शेणा कुठे चाललात ? आम्ही येऊ कां ?
विंचवाला सुई म्हणते... 'हटकलेस का मला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे ह्या तिघांना एक काठी भेटते. ती ही विचारते.
'सुईताई, शेणा, विंचवा.. कुठे चाललात? मी येऊ का?
सुई म्हणते 'हटकलेस का आम्हाला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल.
सर्वजण वाघांच्या घरात येतात. शेण दारातच बसते. सुई कपाटात बसते. काठी बाथरूम मध्ये बसते, व विंचु तेलाच्या बाटलीत. असे सर्व बसतात.
थोडयावेळाने वाघ येतो. दारात शेणावर आपटतो. त्याचे कपडे मळतात. ते धुण्यासाठी बाथरूम मध्ये येतो. तेथे सपासप काठीचा मार बसतो. कपडे पार फाटून जातात. ते व्यवस्थित ठेवण्यासाठी वाघ कपाटाचे दार उघडतो. तेथे सुई वाघाला टोचतच रहाते. सर्व अंग रक्ताने भरलेले असते. म्हणून तेलाच्या बाटलीत वाघोबा आपली शेपूट घालतात. तर विंचू शेपटीला कचाकच चावतो. वाघ मरून जातो.

शेण-काठी-विंचू-सुई सर्व आनंदी होतात. वाघाचा बदला घेतात.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* 
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

23/12/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 23/12/2022
💠 वार - शुक्रवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*आज वेळ अमावस्या आहे. याला येळावस असंही म्हणतात. हा सण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.*

💥घडामोडी
● १९२१ - शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.
● १९२२- बीबीसी रेडिओचे दैनिक बातम्यांचे प्रसारण सुरू
● १९७० - वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला
● २००० - कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी

💥जन्म
● १८४५ -- रासबिहारी घोष, प्रसिद्ध कायदेपंडित, देशभक्त. काँग्रेस पक्षाचे नेते आणि अध्यक्ष
● १९०२ - चौधरी चरण सिंग, भारताचे पाचवे पंतप्रधान

💥मृत्यू
● २००४ - पी. व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान.
● २००८ - गंगाधर महांबरे, मराठी साहित्यिक.
● २०१० - ज्ञानेश्वर नाडकर्णी, मराठी कला समीक्षक व लेखक.
● २०१० - के. करुणाकरन, केंद्रीय उद्योगमंत्री, केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *कोल्हापूरमध्ये आजपासून अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. मास्क, सॅनिटायजर वापरा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलं आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलंय.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *जेईई अडव्हान्स 2023 चे वेळापत्रक IIT गुवाहाटीने जाहीर केले आहे. यंदा ही परीक्षा 4 जून रोजी होणार आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *लहान मुले व वृद्ध नागरिकांनी शक्यतो मास्क वापरावा, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' कादंबरीसाठी प्रवीण बांदेकर यांना ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन, त्या आजारी असल्यानं त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *टीम इंडियाच्या आर. अश्विन आणि उमेश यादवच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेश संघाचा पहिला डाव 227 धावावर संपुष्टात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••

*वर्ग-1ला/Let's know new words👇*
*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/irTKkYVGU6U
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   *राष्ट्रीय किसान दिनानिमित्त*
*शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर .....!*

वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

https://nasayeotikar.blogspot.com/2016/02/blog-post_20.html?m=1

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
     *राष्ट्रीय किसान दिन*

किसान दिन हा दरवर्षी भारतात २३ डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा हा जन्मदिवस संपूर्ण भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेती संबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*" घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये. "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) ३५ वे राज्यस्तरीय महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे यजमानपद कोणत्या संस्थेला देण्यात आले आहे ?
२) 'सम्राट अलेक्झांडरचे वंशज आम्हीच' असे हिमाचल प्रदेशमधील कोणत्या गावाने दावा केला आहे ?
३) 'हळदीचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ?
४) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता ?
५) सर्वाधिक घनदाट जंगलाच्या बाबतीत पहिले तीन देश कोणते ?

*उत्तरे :-* १) इको - प्रो संस्था, चंद्रपूर   २) मलाणा, शिमला   ३) सांगली   ४) चीन   ५) रशिया, ब्राझील, कॅनडा 

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 मोहन बारदवार, धर्माबाद
👤 सार्थक सुगंधे, धर्माबाद
👤 चिं. श्रीपाद हणमंलू शंकरोड, येवती
👤 गंगा देवके
👤 प्रवीण गुंटोड
👤 ज्ञानेश्वर ताटीकुंडलवार
👤 राजू पाटील कुरुंदे

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*आपल्या मुखावाटे आपल्या शरीरात जे अन्न जाते, त्यावर आपण खूप नियंत्रण ठेवतो. आपण आपला आहार सदोदित संतुलित ठेवायचा प्रयत्न करतो. वैद्दकिय सल्ल्यानुसार आवश्यक ते पथ्य पाळतो. जेवायच्या आधी आपण दररोज स्वच्छ हात धुतो. शुद्ध पाणी पितो. वेळोवेळी आपण उपवास करतो. आपल्या तोंडातून जे काही आत जाते ते पोटात जाते आणि शेवटी ते शरीराबाहेर टाकले जाते. हे आपल्याला माहित असूनसुद्धा ही सगळी काळजी आपण घेतोच.*
*पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणा-या शब्दांची तशाच प्रकारची काळजी आपण घेत नाही. ज्या मुखातून आपण परमेश्वराचे गुणगान करतो, त्याच मुखातून आपण खुशाल अपशब्द उच्चारतो. ज्या झ-यातून केवळ निर्मळ पाणी झरले पाहिचे, तो झरा आपणच प्रदूषित करतो. आपल्या अमंगल वाणीने तो झरा आपणच विटाळून टाकतो.*

        ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
      *श्री. संजय नलावडे, मुंबई*
      *मोबाइल  - 9167937040*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
एखाद्याच्या जीवनाचा जीवनसंघर्ष म्हणजे एक चित्रपटच असतो. त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग सुखदु:खाच्या खाचखळग्यांनी ओतप्रोत भरलेले असते. तरीही ते डगमगत नाहीत. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन जीवन जगण्याचे खरे ध्येय ते गाठतातच. परिस्थिती कशीही असो त्याला हाताळण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी ठायी वसलेले असते. म्हणूनच त्यांच्या आदर्शाचा परिपाठ आपण आपल्या जीवनात अनुसरायला हवा. तरच आपल्याला जीवन जगण्याची चांगली प्रेरणा मिळेल.

© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
    *सिंहाचा जावई*
एकदा एक सिंह जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे सिंह उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, "तुला हवं ते मागं. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.' सिंहाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, "महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?' यावर सिंह म्हणाला, "अरे नाही रे, मी राजा आहे आणि राजा आपले वचन कधीच मोडत नाही. माग तुला काय हवे ते'. यावर उंदीर म्हणाला, "मला तुमचा जावई करून घ्या.' सिंहाने ते मान्य केले. त्याप्रमाणे सिंहाने आपल्या मुलीशी उंदराचे लग्न लावून दिले. सर्व विधी झाले. पण सप्तपदीच्या वेळी नवरीच्या पायाखाली नवरदेव सापडले व चिरडून ठार झाले.
तात्पर्यः
*आपल्या कुवती बाहेरच्या एखाद्या गोष्टीची हाव धरलीतर स्वत:चाच नाश ओढवतो.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* 
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~