गुरुवार, 14 नवंबर 2019

15/11/2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 15/11/2019 वार - शुक्रवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        
        *क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती*
💥 ठळक घडामोडी :- 
● १९८९ - सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

💥 जन्म :-
● १९५४ - आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की, पोलंडचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
● १९६१ - झहीद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
● १९६८ - पीटर मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.


💥 मृत्यू :-
● १९८२ - आचार्य विनोबा भावे (महाराष्ट्र) भारत

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दर हेक्टरी मदतीसह सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्ज माफीचे केले सूतोवाच*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *राष्ट्रपती राजवटीमुळे मंत्रालयातील वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला टाळं, नातेवाईकांवर रिकाम्या हाताने परतण्याची वेळ, राज्यभरात साडे पाच हजार रुग्ण मृत्यूच्या छायेत*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न, बच्चू कडूंच्या नेतृत्वात आंदोलन, नरिमन पॉईंटवर मोर्चा अडवून आमदार बच्चू कडूंना पोलिसांनी घेतलं ताब्यात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *हवामानातील बदलाचा सिंधुदुर्गच्या हापूसला फटका, हापूसचा हंगाम 40 दिवसांनी लांबणार, तर आफ्रिकेच्या मालावीतील हापूस पुण्यात दाखल*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *राफेलच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीची गरज नाही, राफेलविरोधी सर्व याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या तर प्रकरणाची नव्याने चौकशीची राहुल गांधींची मागणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *नाशिकच्या प्रसिद्ध गायिका गीता माळी मुंबईहून नाशिककडे जात असताना शहापूर येथे गॅस टँकर आणि कारची जोरदार धडक झाली. या अपघातात गीता माळी यांचे निधन झाले.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या कसोटीत बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांमध्ये आटोपला, टीम इंडियाची सावध सुरुवात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   *हेडफोनपासून दूर रहा*

वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      📙 *प्लॅस्टिक सर्जरी* 📙

सर्जरी किंवा शस्त्रक्रिया याचे कितीतरी पोटविभाग गेल्या ३०-४० वर्षात प्रगत होत गेले आहेत. कान नाक घसा यांसाठीचे तज्ज्ञ, पोटाच्या व आतडय़ाच्या विकाराचे तज्ज्ञ, मूत्रशल्यविशारद, मेंदू व मज्जारज्जू शल्यविशारद, अस्थिरोगतज्ञ अशा विविध अवयवांनुसार त्यांची विभागणी होत गेली आहे. मात्र गेली साठएक वर्षे जनरल सर्जरीच्या बरोबरीने, पण स्वतःचे वेगळेपण राखणारी शाखा म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी होय. भारतीय शल्यकर्म परंपरेतील सुश्रुतसंहितेमध्ये सुद्धा प्लास्टिक सर्जरीच्या आज केल्या जाणाऱ्या चेहऱ्यावरच्या नाकाच्या ठेवणीबद्दलच्या शस्त्रक्रियेसंदर्भात उल्लेख सापडतात. अर्थातच तंत्रांमध्ये खूप बदल होत गेला आहे.
प्लॅस्टिक सर्जरी असे विचित्र नाव पडण्याचे कारण म्हणजे विद्रुप झालेला शरीराचा भाग वळूवून लवचिकपणे त्यात बदल करून त्याला आकार देण्याचे अवघड काम या शस्त्रक्रियेत अपेक्षित असते. आजकाल जरी प्लास्टिक सर्जरी ही खूपदा सौंदर्य वाढवण्याकरता केली जात असली तरी तिचा मूळ गाभा विद्रूपता दूर करणे व शरीररक्षणाला उपयुक्त ठरणे हाच आहे.
जन्मत: दुभंगलेला वरचा ओठ व टाळू, बसके व अपरे नाक, पुरुषांच्या मूत्रमार्गातील जन्मतः असलेले दोष, हाताची पायाची सहा वा जास्त बोटे यांसारख्या जन्मजात दोषांवर शस्त्रक्रिया करून त्या व्यक्तीला सामान्यपण देऊ करणे हा प्लास्टिक सर्जरीच्या कामाचा मोठा भाग. पण अनेकदा भाजल्यामुळे काही मोठ्या भागातील त्वचा जळून जाते किंवा अाकसून त्या अवयवाची हालचाल कमी होते. (उदारणार्थ मान वळवणे, कोपरामधील त्वचा जळल्याने हात लांब न होणे इत्यादी) त्यावेळी अन्य भागातून त्वचा काढून त्या जागी तिचे रोपण करण्याचे काम प्लॅस्टिक सर्जन करतात. प्लास्टिक सर्जरीचा वापर १९५० नंतरच्या दशकात गुप्त हेरगिरीसाठी चेहरेपट्टी बदलून घेण्यासाठीही केला गेला आहे. असाच उपयोग वृद्धत्वाच्या खुणा झाकून चेहर्यावरील नको त्या सुरकुत्या काढण्यासाठी अनेक व्यक्तींनी, नटनट्यांनी केला आहे. डोक्यावरचे टक्कल कमी करण्यासाठी केशारोपण करून तेथे केस वाढवणे हा सुद्धा या शस्त्रक्रियेचाच एक भाग समजला जातो.
सूक्ष्मदर्शक यंत्राचा सरसहा वापर अतिशय नाजूक सुया, अगदी पातळ तंतूवजा रेशमी धागे आणि तासनतास चिकाटीने चालणारे काम हा प्लास्टिक सर्जरीचा अत्यावश्यक भाग. प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करताना शरीराची ठेवण बदलताना, त्वचेची अदलाबदल करताना त्या भागात होणारा रक्तपुरवठा अबाधित राखणे हा नियोजनाचा, आरेखनाचा अत्यंत कौशल्याचा भाग असतो. यामध्ये जरा जरी चूक झाली तरी आरोपण केलेली त्वचा निरुपयोगी ठरते.
कॅन्सरसंदर्भातील विविध शस्त्रकर्मे केल्यावर काही भाग काढून टाकणे अत्यावश्यक ठरते. उदारणार्थ, चेहऱ्याच्या जबड्याचा निम्मा भाग, छातीच्या काही फासळ्या. अशा वेळी प्लॅस्टिक सर्जरीने अशा रुग्णाला शक्यतो नेहमीचे रूप देण्यासाठी कित्येक महिने प्रयत्न करावे लागतात. प्लॅस्टिक सर्जनचे कामाचे स्वरूप त्यामुळे सध्याच्या काळात प्लास्टिक, रिकन्स्ट्रक्टिव्ह व कॉस्मेटिक असे तिहेरी झाले आहे.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

समता ही आजची हाक आहे. ती आपणास आवडो वा ना आवडो, समता आजचा युगधर्म आहे याची जाणीव ठेवली पाहिजे - विनोबा भावे

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा झाला ?*
       15 नोव्हेंबर 1875

2)  *बिरसा मुंडा यांचा जन्म कोठे झाला ?*
       उलिहातु , झारखंड

3)  *बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला ?*
       जननायक

4)  *भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप कोण करते ?*
       केंद्रीय सांख्यिकी संस्था

5)  *'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?*
       पं जवाहरलाल नेहरू ( अहमदनगरच्या तुरुंगात )

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

👤 व्यंकटेश विरेश पाटील, येवती
👤 सुनील शिंदे, पांगरी
👤 राहुलकुमार सातव, कुपटी, माहूर
👤 भगवान भूमे, देगलुर
👤 अशोक चिंचोलीकर, धर्माबाद
👤 दिनेश येवतीकर, येवती
👤 कमलेश परब
👤 मारोती कानगुलवार, येवती
👤 गंगाधर मरकंठवाड, येवती
👤 सोनाली कडवईकर, रत्नागिरी

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*ग्रंथपारायणात रस नसलेलो आम्ही पुस्तकांची पानं फाडून, होड्या बनवून पावसात सोडायचो. काही दु:ख वाटायचं नाही उलट मौज वाटायची. पुस्तकाची किती पानं फाडलीत हे कुठं कळायचं, आई-बापांना ! अशा पुरात सोडलेल्या होड्या वाहुन समुद्राला गेल्या; पण डोळ्यातील स्वप्नांना मात्र त्यांनी बुडू दिलं नाही. पुस्तकांच्या पानांच्या होड्या, विमानं, पतंग बनवायला मिळतात म्हणून शाळेची वाट गोड. मजबुरीने धरलेल्या वाटेवर याच ग्रंथाच्या होडीने अथांग दर्यावर हुकूमत गाजवणारा नावाडी बघता बघता कधी बनवून टाकले, कळलेच नाही. तेंव्हा वाटले नव्हते, की या कागदी नावेला स्वप्नांची वल्हं आणि स्वप्नांचा अमर्याद धागा जोडला आहे ते.!*
*आज ग्रंथांविषयी निराशापूर्ण वातावरण दिसते. ग्रंथांकडे समाज दुर्लक्ष करतोय, पण "किताबों पर धूल जम जाने से, कहानी थोडेही खत्म हो जाती है!" कुठल्याही काळात ही धूळ झटका, पुस्तकं पुन्हा भरभरून बोलतील. प्रत्येकाला ही कागदाची नाव आणि शाईचं इंधन पुरेसं आहे ; हा जीवनाचा अथांग दर्या तरून जायला.*

  ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌸●••
            🌸🌸🌸🌸🌸🌸
         *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
               📱 9167937040
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

जीवनात तुम्हाला चांगले जगायचे तर येणा-या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.कारण कोणतीही परिस्थिती चांगली असतेच असे नाही.कधी कधी वाईट आणि बिकट परिस्थितीतून ही मार्ग काढून सुखी जीवन जगण्यासाठी एखादा आशेचा किरण सापडत असतो.पण आता आपल्याला आपल्या जीवनात दु:खच आहे आणि दुःखच भोगावे लागणार त्याच्याशिवाय आता दुसरा पर्यायच नाही असे जर म्हटले तर मग जीवनात दु:खाशिवाय दुसरे काहीच भोगायला मिळणार नाही.
उलट जर तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे असेल आणि सुखाने जीवन जगायचे असेल तर हातपाय तर हलवावेच लागतील.
मेहनत करावी लागेल,
काहीतरी काम शोधावे लागेल,आपले निराशावादी मन आशेकडे न्यावे लागेल, नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांकडे न्यावे लागेल तर तुम्हाला सुखी जीवन जगण्याचा मार्ग सापडेल.
अन्यथा मग आपल्या जीवनाच्या जीवनशैलीला आहे तसेच स्वीकारुन जीवनभर यातना,दु:ख यांना जवळ करावे लागेल.

*व्यंकटेश काटकर,नांदेड.*
  संवाद...९४२१८३९५९०.
🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                *गरुड व घुबड*
एक गरुड आणि घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत. परंतु, एक दिवस, त्यांनी एकमेकांशी मैत्रीने वागण्याचे ठरविले, तसेच एकमेकांची पिल्ले खाऊ नये असेही ठरवले. तेव्हा घुबड गरुडाला म्हणाले, ''मित्रा! परंतु, माझी पिल्ले कशी आहेत ते तुला माहीत आहे का? नाहीतर दुसर्‍याचीच आहेत असे म्हणून तू त्यांना खाऊन टाकशील.'' गरुड म्हणाला, ''माझी पिल्ले खूप सुंदर आहेत. त्यांचे डोळे, पिसे, आवाज सगळेच खूप सुंदर आहे. आता येईल ना तुला ओळखता?'' पुढे एके दिवशी, झाडाच्या ढोलीत गरुडाला घुबडाची पिल्ले सापडली. ती पाहून तो म्हणाला, ''किती घाणेरडी आणि कुरूप पिल्ले आहेत ही. घुबडाची पिल्ले तर खूप सुंदर आहेत. म्हणजे ही काही घुबडाची पिल्ले नसणार. यांना मारून टाकावे. असे म्हणून त्याने सगळ्या पिलांचा फडशा उडवला.'' नंतर घुबडाने येऊन पाहिले तो ढोलीत पिल्ले नाहीत. ते गरुडास म्हणाले, ''मित्रा, तूच माझी पिल्ले खाल्लीस.'' गरुड म्हणाला, ''हो, मी खाल्ली; पण मला काय माहीत की ही कुरूप पिल्ले तुझी आहेत म्हणून ? तू तर म्हणालास की, माझी पिल्ले खूप सुंदर आहेत. मला वाटले ती दुसर्‍याच पक्ष्याची आहेत. आता यात माझी काय चूक?

तात्पर्य: स्वत:ची खरी माहिती लपवून खोटी माहिती सांगितली असता मनुष्य संकटात सापडतो

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें